शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

शहापुरात मान्सूनपूर्व पावसाचे दोन बळी

By admin | Updated: June 3, 2017 06:21 IST

गुरु वारी सायंकाळी वीज आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने खर्डीमध्ये अक्षरश: थैमान घातले. यात लग्न समारंभासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कखर्डी : गुरु वारी सायंकाळी वीज आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने खर्डीमध्ये अक्षरश: थैमान घातले. यात लग्न समारंभासाठी आलेल्या दोघांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. खर्डी विभागातील आंबिवली गावातील अदिवासीपाड्यावर लग्न सोहळा होता. यासाठी डिंभे, ता. शहापूर येथून पाहुणे म्हणून आलेले बुधाजी लडकू अगिवले (५०) यांच्यासह त्यांची पत्नी इंदिरा बुधाजी अगिवले (४०) तसेच खडीचापाडा येथील सरिता चौधरी (११) हे तिघे आंबिवली गावाजवळील जांभूळपाडा आणि ठाकूरपाडा येथील बंधाऱ्याजवळून जात असताना विजेचा लोळ या तिघांच्या अंगावर पडल्याने यात बुधाजी अगिवले आणि सरिता चौधरी हे जागीच ठार झाले. तर, इंदिरा अगिवले या गंभीर जखमी झाल्या. त्यांना खर्डी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी आणले असता त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रु ग्णालयात हलवण्यात आले. परिसरात वीज नसल्याने शवविच्छेदन खर्डी सरकारी रुग्णालयात होऊ न शकल्याने आ. पांडुरंग बरोरा यांनी या घटनेची दखल घेत शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था केली. या घटनेची माहिती मिळताच खर्डी महसूल विभागाचे मंडल अधिकारी पी.जे. कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दुसरीकडे पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. खर्डीतील प्रवीण अधिकारी यांची पोल्ट्री तसेच आमराईचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्रीची भिंत कोसळली आणि शेडचा भाग पक्ष्यांवर पडल्याने जवळपास २०० हून अधिक कोंबड्या ठार झाल्या. यात जवळपास २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्याच आमराईतील हापूस आंब्याची अनेक झाडे वाऱ्यामुळे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. वैतरणा रस्त्यावरील चंदन पार्क येथील इमारतीवरील पाण्याच्या सिंटेक्सच्या चार टाक्या जोरदार वाऱ्यामुळे खाली पडल्याने नुकसान झाले. तर दहिगाव, भोसपाडा, टेंभा या परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही भागात वीजपुरवठा खंडित झाला.शहापूर शहरासह ग्रामीणमध्ये पावसाची दमदार हजेरीआसनगाव : उन्हाने कासावीस झालेल्या शहापूरकरांना शुक्रवारी पावसाने सुखद गारवा देत दमदार हजेरी लावली. काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या लहानांसह मोठ्यांनीदेखील या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. ग्रामीण भागातील शेतकरीवर्गदेखील सुखावला आहे. पाऊस आल्याने अनेक दिवसांपासून भेडसावणारे पाणीटंचाईचे भयावह संकट आता दूर होणार असल्याने महिलावर्गातही आनंद आहे. मात्र, बेगमीचे म्हणून शेतकऱ्यांनी गुरांसाठी साठवलेली वैरण, सरपण, गोवऱ्या भिजल्याने त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. अनेकांच्या नवीन घरांची कामे अद्याप सुरू असल्याने ते मात्र चिंतातुर झाले आहेत. शहापूरसह नडगाव, शिरगाव, नेहरोली, दहिवली, बावघर, कलगाव, अल्याणी, गेगाव परिसरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. किन्हवलीत वादळाने घरांचे नुकसानलोकमत न्यूज नेटवर्ककिन्हवली : गुरुवारी झालेल्या वादळामुळे किन्हवली परिसरात अनेक घरांचे छप्पर उडाले. वृक्ष उन्मळून पडले असून विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.सोसाट्याच्या वादळामुळे किन्हवली परिसरातील मळेगाव येथील रवी पडवळ या पेपर स्टॉल विक्रेत्याच्या घरावरील पत्रे उडून खूप नुकसान झाले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय, नथू सदू जाधव, रामचंद्र पोसू शिर्के यांच्या घरावर वीज कोसळून उपकरणांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले. परिसरातील अनेक गावांना या वादळाचा तडाखा बसला. शेणवे-किन्हवली मार्गावरील विजेचे खांब कोसळल्याने किन्हवली परिसरात वीजपुरवठा खंडित झाला.