शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वनविधेयकास आदिवासींचा विरोध; केंद्र सरकार भांडवलदारधार्जिणे असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:36 IST

श्रमजीवींचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

ठाणे : केंद्र सरकारच्या प्रस्तावित ‘भारतीय वन कायदा सुधारणा-२०१९’ या विधेयकाच्या सद्यातील तरतुदी या आदिवासी, कष्टकरी, वन हक्क दावेदारांना उद्ध्वस्त करणाऱ्या असल्याचा आरोप करून श्रमजीवी संघटनेच्या शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाव मोर्चा काढून या विधेयकास तीव्र विरोध दर्शवला.

या मोर्चातील काही पुरुष कार्यकर्ते वृक्षवल्लीची पालखी, हातात भाले, अंगाला झाडांचा फांद्या लावून या मोर्चात सहभागी झाले होते. साकेत मैदानावरून निघालेल्या या श्रमजीवींच्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ‘जंगल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ या घोषणांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त कार्यालय दणाणून गेला होता. या विधेयकाच्या अन्यायकारक तरतुदींना विरोध करणारे निवेदन यावेळी केंद्र सरकारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुपूर्द केले. यावेळी मोर्चात आणलेली आदिवासींच्या पारंपरिक ‘हिरव्या देवाची पालखी ’ लक्षवेधी होती. श्रमजीवीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्तवाखाली हा धडक मोर्चा आदिवासींनी काढला. या मोर्चात संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, उप कार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आदिवासी श्रमजीवी महिला पुरु ष युवक मोठ्यासंख्येने सहभागी होऊन त्यांनी वन कायदा सुधारणा विधेकाला कडाडून विरोध केला आहे.

केंद्र सरकारने तापमान वाढीच्या नावाखाली जंगलातील आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा सुधारित वन कायदा तयार करण्याचे ठरविले आहे. उपजिविकेसाठी जंगलावर निर्भर असलेल्या आदिवासींच्या हातातून जंगलचे अधिकार काढून घेणार असल्याचा आरोप या मोर्चेकºयांकडून करण्यात आला आहे. वनक्षेत्र वाढविण्याच्या नावाखाली बड्या भांडवलदरांना ‘कॅशक्रॉप’ची वनशेती करता यावी यासाठी रान मोकळे करण्यासाठीचे धोरण सरकार अवलंबून पाहत आहे. आदिवासी पारंपारिक वननिवासींच्या हिताविरोधी भूमिका शासन घेत आहे. व्यापारी वनशेतीला उत्तेजन देणाºया , वनअधिकाºयांना अमर्याद अधिकार देवून आदिवासींचे वन हक्क डावलू पाहणाºया, ग्रामसभेचे अधिकार कमी करून ग्रामवनांची समांतर पद्धत आणू पाहणाºया सरकारच्या या भूमिकेला श्रमजीवी संघटनेने विरोध दर्शवून हा मोर्चा काढला.

आदिवासींच्या मागण्या : या मोर्चाव्दारे आदिवासी आणि अन्य पारंपरिक वननिवासी बांधवाना उद्धवस्त करणाºया तरतुदी या मसुद्यातून वगळाव्यात या मागणीसह वन अधिकाºयांना दिलेले जुलमी अधिकार काढून घ्यावेत. वनांचे खाजगीकरण करण्याचे धोरण बदलावे अशा मागण्या करून हे विधेयक मागे घेण्याची मागणी श्रमजीवीने केली.