शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वाढतोय चिरलेल्या रेडिमेड भाज्यांचा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:42 IST

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ‘रेडी टू कुक’ ही संकल्पना चांगलीच रुजते आहे. पाकिटबंद वस्तुंप्रमाणेच तो ट्रेंड भाज्यांमध्येही दिसून येऊ लागला असून मंडईत मिळणाऱ्या भाज्यांप्रमाणे ठाण्यात काही मोक्याच्या ठिकाणी छान चिरलेल्या भाज्यांची पाकिटे मिळू लागली आहेत.

ठाणे : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ‘रेडी टू कुक’ ही संकल्पना चांगलीच रुजते आहे. पाकिटबंद वस्तुंप्रमाणेच तो ट्रेंड भाज्यांमध्येही दिसून येऊ लागला असून मंडईत मिळणाऱ्या भाज्यांप्रमाणे ठाण्यात काही मोक्याच्या ठिकाणी छान चिरलेल्या भाज्यांची पाकिटे मिळू लागली आहेत. त्यांना ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्यासाठी पुढे आलेल्या महिलांचा हुरूप वाढतो आहे. काही तासांतच या भाज्या हातोहात संपत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.या चिरलेल्या, सोललेल्या, कापलेल्या भाज्यांच्या पाकिटासोबतच किसलेले ओले खोबरे, कोशिंबिरीचे साहित्य, चायनीजसाठी वेगळ््या आकारात कापलेल्या भाज्या, सांबारासाठी लागणाºया भाज्यांची पाकिटेही पाहायला मिळतात. त्यामुळे ठाणेकरांच्या बदलत्या खाद्यसवयी यातून दिसतात. नोकरदार स्त्रियांची घर आणि नोकरी सांभाळताना होणारी कसरत लक्षात घेत चिरलेल्या भाज्या, फळांचीही खरेदी करण्याचा ट्रेण्ड वाढतो आहे. ठाणे-डोंबिवलीसारख्या शहरात तो प्रामुख्याने दिसतो. दररोज हॉटेलचे खाणे नको वाटते. बºयाचदा ते परवडतही नाही. स्वत: घरी पदार्थ तयार करायचे असतात. पण सवड मिळत नाही. शिवाय पिशवी घेऊन बाजारात गेल्यावर भाज्या खरेदी करताकरता नाकीनऊ येतात. त्या घरी नेऊन निगुतीने साठवणे, धुवून-चिरुन ठेवण्यास वेळ लागतो. या तारेवरच्या कसरतीतून थोडा ब्रेक घेण्यासाठी स्त्री-पुरूष, ज्येष्ठ नागरिक, एकटे राहणारे चिरलेल्या भाज्यांच्या खरेदीकडे वळू लागले आहेत. यात केवळ फळभाज्याच नव्हे, तर मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, फळेही मिळत आहेत. लोकांच्या गरजांचा विचार करून ही पाकिटे साधारण १५० ग्रॅम, २०० ग्रॅममध्ये मिळतात. साधारण २० ते ३० रुपये असा त्याचा दर आहे. फळे व कोशिंबिरीचे साहित्य साधारण ३० रुपये आणि खोवलेले खोबरे ४० रुपयांना पाकिट या दराने मिळते.सध्या कच्च्या फणसाची अधिक विक्री होते; तर आॅल टाईम फेव्हरेटमध्ये गवार, फरसबी आणि पालेभाज्या जास्त खरेदी केल्या जातात. सूपसाठी मिक्स भाज्या, चायनीजसाठी मिक्स भाज्या आणि सलाडचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होते.कडधान्यामध्ये चवळी, काबुली चणे (छोले), हिरवा वाटाणा, पांढरा वाटाणा, मूग, मटकी, मिश्र कडधान्ये, मसूर, कडवे वाल असे साधारण १५ प्रकार मिळतात. फळांमध्ये पपई, टरबूज, कलिंगड, डाळिंबाचे दाणे; तर कोशिंबिरीसाठी चोचलेली काकडी, गाजर, बीट, सलाड मिळतात. चिरलेल्या फळभाज्यांमध्ये किसलेले गाजर, काकडी, वांगी, भेंडी, कैरी, मुळा, चिरलेला मुळा, फ्लॉवर, कोबी, तोंडली, फरसबी, गवार, लाल भोपळा, सुरण, शेवग्याच्या शेंगा, मक्याचे दाणे, सिमला मिरची उपलब्ध आहेत. सिझननुसार कच्चा फणस, केळफुल मिळते.शिवाय तळण्यासाठी सुरणचे चौकोनी काप, फ्राईड राईससाठी वेगळ््या चिरलेल्या भाज्या; सूपसाठी भाज्या, मशरुम, गाजर, ब्रोकोली व काकडीचे काप मिळतात. सांबारसाठी वांगी, टोमॅटो, लाल भोपळा, दोडका, शेवग्याच्या शेंगांची पाकिटे तयार असतात. चिरलेल्या पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, चवळी, शेपू, लाल माठ, मायाळू, अळू अशा विविध भाज्यांचे पाकीट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे रवि कुर्डेकर यांनी सांगितले.खोवलेल्या खोबºयाची दिवसाला १०० पाकिटेसंपत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. दररोज साधारण दुपारी तीन-साडेतीनला वाजता या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध होण्यास सुरूवात होते. पण खरेदीसाठी सायंकाळी पाचनंतर गर्दी होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या भाज्या सकाळी पुणे, नाशिकवरुन येतात. त्या साफ करून चिरण्याची तयारी सकाळी सहा वाजल्यापासून होते. चिरुन, वजन करुन त्यांचे पॅकिंग केले जाते, असे कुर्डेकर कुटुंबाने सांगितले. यात त्यांना मनोहर कुर्डेकर, मालन तांबे, मंगेश यादव, राजू येन्बर यांचीही मदत होते.ग्राहकांना चिरलेली भाजीत दर्जा आणि स्वच्छता या दोन गोष्टी मिळाल्या, की ते पैशांकडे पाहत नाहीत. आमच्याकडून केवळ ठाणे परिसरातून नव्हे, तर पश्चिम रेल्वेवर राहणारे ग्राहकही आठ दिवसांच्या भाज्या एकदम घेऊन जातात. सध्या प्लास्टिक बंदी केल्याने यापुढे या भाज्या कागदी पिशव्यांमध्ये दिल्या जाणार आहेत.- रवि कुर्डेकरपालिकेने माझे भाजीचे दुकान तोडल्यानंतर उपजीविकेसाठी दुसरे कोणते साधन शोधायचे असा विचार सुरू होता. एरव्ही भाजी खरेदी करताना ग्राहक कोबी-फ्लॉवर कापून मागत, घेवडा साफ करुन द्यायला सांगत ते आठवले. आपणच त्यांना या भाज्या चिरुन, सोलून किंवा कापून द्याव्या असा विचार मनात आला आणि सहा वर्षांपूर्वी तशी विक्री सुरू केली. सुरूवातीला तीन- चार दिवस प्रतिसाद नव्हता. मग त्या भाज्या आम्हीच घरी जाऊन शिजवून खात असू. त्यानंतर हळूहळू प्रतिसाद वाढला. सुरूवातीला या व्यवसायात ३०० रुपयांची गुंतवणूक केली होती. आज तेवढ्या संथ्येची भाज्यांची पाकिटेच असतात. ती सर्व संपतात.- सुरेखा कुर्डेकर

टॅग्स :thaneठाणे