शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

महामार्गावरील वाहतूक अखेर सुरू

By admin | Updated: November 15, 2015 23:53 IST

मुंबई - गोवा : अपघातग्रस्त टँकरमधील गॅस गळती रोखण्यात यश

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस भरून वेर्णे-गोवा येथे निघालेल्या टँकरला अपघात झाल्याने गळती झाली. यामुळे महामार्गासह परिसरातील मानवी वस्तीला धोका निर्माण झाला होता. मात्र, लोटे येथील घरडा केमिकल कंपनी आणि विनीत आॅरगेनिक कंपनीच्या रसायनतज्ज्ञांनी तसेच उरण येथील न्हावा शेवा येथील पेट्रोलियम कंपनीच्या गॅसविरोधकतज्ज्ञांनी सुमारे २१ तास शर्थीचे प्रयत्न केल्यांनतर रविवारी सकाळी पावणेआठ वाजता ही गॅस गळती थांबवण्यात यश मिळवले. शनिवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास दोन आयशर टेम्पोला बाजू देण्याच्या प्रयत्नात टँकरचालक रवी मच्छिंद्र विटकर (अहमदनगर) याचे टँकरवरील नियंत्रण सुटले. यामुळे गाडी रस्त्यांच्या बाजूला गेली आणि उलटली. गॅसची टाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दगडावर आपटल्याने गॅस गळती सुरू झाली. टँकरच्या पुढील बाजूस असलेला हौदा रस्त्यावरच पडला.यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो बचावला. अपघाताचे वृत्त समजताच कशेडीचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आऱ व्ही. माने, पोेलीस हेडकॉन्स्टेबल आर. के. कांबळे, बी. आर. कांबळे, चालक आर. एस. हसबे, खेड येथील पोलीस निरीक्षक अशोक जांभळे आणि सहकारी यांनी तत्काळ दोन्ही बाजूच्या सर्व वाहनांना १ किमी अंतरावरच थांबण्यास सांगितले.ठिकठिकाणी पोलिसांनी गांभीर्याने ही परिस्थिती हाताळली. तसेच आसपासच्या मानवी वस्तीस इजा होऊ नये, याकरिता गावातील ग्रामस्थांकरवी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. याचा चांगला परिणाम झाला. महामार्गावरील ही अवघड परिस्थिती लक्षात घेता अनिश्चित काळासाठी वाहने थांबवली. पोलिसांनी लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा कंपनी आणि विनीत कंपनीच्या पथकाला पाचारण केले.हे पथक दुपारी ३ वाजता दाखल झाले. मात्र हे पथक रसायनतज्ज्ञांचे असल्याने या तज्ज्ञांनी गॅस गळती थांबवण्यास असमर्थता दर्शवली. तरीही त्यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपले शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले.काही अंशी त्यांचे प्रयत्न सफल ठरले. मात्र पूर्णत: गॅस गळती न थांबल्याने उरण येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या विशेष गॅस तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. हे पथक सायंकाळी ६ वाजता दाखल झाले. तेव्हापासून या पथकांनी आपले शर्थीचे प्रयत्न करीत तब्बल १३ तासानंतर रविवारी सकाळी ७.४५ वाजता ही गॅस गळती पुर्णपणे थांबवली. यामध्ये घरडा कंपनी आणि विनीत कंपनीच्या पथकाचे 4 तासाचे प्रयत्न आणि उरण येथील या पथकाचे १३ तासाचे प्रयत्न म्हणजेच एकूण १७ तासानंतर ही गळती थांबवण्यात या सर्व पथकाना यश मिळाले आहे. उरण येथील पेट्रोलियम कंपनीचा एक रिकामा टँकर सायंकाळी ६ वाजताच कशेडी येथे दाखल झाला. याच रिकाम्या टँकरमध्ये हा गॅस भरण्यात आला. मात्र गॅस अन्य टँकरमध्ये भरण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागले. टाकीमधील गॅस काढण्यासाठी ५ अग्निशमन दलाच्या गाड्यातील २० हजार लिटर पाणी खर्च झाले. टाकीतील वरवरचा गॅस अन्य टँकरमध्ये घेतल्यानंतर तळाशी राहिलेला गॅस बाहेर काढणे आवश्यक होते. याकरीता टाकीच्या तळाशी साचलेला गॅस काढण्यासाठी या टाकीमध्ये २० हजार लिटर पाण्याचा वापर करावा लागल्याची माहीती कशेडी पोलीसांनी दिली़ गॅस संपूर्णपणे अन्य टँकरमध्ये घेतल्यानंतर पोलिसांसह उपस्थित तज्ज्ञांनी आजुबाजुच्या गवतावर व रस्त्यावर पसरलेल्या गॅसची पाहणी केली. तसेच असलेला गॅस तज्ज्ञांच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला. परिसर रिकामा केल्यानंतर तब्बल २१ तासानंतर रविवारी सकाळी ८.४५ वाजता दोन्ही बाजूची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दोन वर्षापूर्वी कशेडी घाटातच गॅस वाहुन नेणाऱ्या टँकरला अपघात होवून गॅस गळती झाली होती. त्यावेळीही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी एवढी भीषणता नव्हती. मात्र शनिवारच्या या अपघातानंतर झालेली गॅसगळती भयानक आणि दिर्घकाळपर्यंत थांबल्याने मोठी भिती निर्माण झाली होती.(प्रतिनिधी)वाहनचालकांचा निश्वास : रिकाम्या टँकरमध्ये भरला गॅसवायूगळती कमी करण्यासाठी एक रिकामा टँकर मागवण्यात आला होता. या टँकरमध्ये गळती होणारा वायू सोडण्यात आला. हे जोखमीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही गळती आटोक्यात आली. त्यामुळे एक संकट टळले.जीव होता मुठीतएकवीस तास परिसरातील ग्रामस्थांनी तसेच वाहनचालकांनी अक्षरश: जीव मुठीत धरून काढले. कारण वायूगळतीमुळे कोणत्याही क्षणी त्रास होऊ शकणार होता. अखेर हे संकट टळल्याने परिसरातील ग्रामस्थांनी निश्वास टाकला.२१ तासांच्या प्रयत्नांना यश.पोलिसांसह अग्निशमन दल आणि उरण येथील तज्ज्ञांचे अथक प्रयत्न.२० हजार लीटर पाण्याचा वापर.