शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे एकूण १६ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 05:15 IST

नवे ३९७ रुग्ण । मृतांची संख्या पोहोचली २३९ वर

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी ही ३९८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्याचा आकडा हा सात हजार ७७१वर गेला आहे. त्याचबरोबर १६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ही २३९ इतकी झाली आहे. शनिवारी नवी मुंबईत सर्वाधिक ७ जण दगावले असून एकूण रुग्णांनी दोन हजारांचा आकडा पार केल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.

नेहमीप्रमाणे शनिवारीही ठाण्यात सर्वाधिक १५१ नवीन रुग्ण सापडल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ही दोन हजार ९०१ वर पोहोचली आहे. तसेच ५जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ८४ झाला आहे. त्या खालोखाल नवी मुंबईतील एकूण रुग्ण संख्या आता दोन हजार ११० तर मृतांचा आकडा ७० झाला आहे. कल्याण डोंबिवलीत ३८ रुग्णांची नोंद झाली असून येथील एकूण रुग्णांचा आकडा ९८० वर गेला आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या २८ इतकी झाली आहे. या ३८ रुग्णांमध्ये ९ रुग्ण डोंबिवलीतील असून उर्वरित रुग्ण हे कल्याणमधील आहेत. उल्हासनगरमध्ये ही ३० नवीन रुग्ण सापडल्याने तेथील एकूण रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे. १८ रुग्ण मीरा-भार्इंदर येथे सापडल्याने तेथील रुग्ण संख्या ही ६४९ वर गेली आहे. तसेच तेथे दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४ झाला आहे.भिवंडीत मृतांची संख्या सहाअंबरनाथ येथे १७ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १३१ झाली आहे. १६ नवीन रुग्ण हे ठाणे ग्रामीण येथे सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा ३४३ वर गेला आहे. भिवंडी आणि बदलापूर येथे प्रत्येकी ७ नविन रुग्ण मिळाले आहेत. तेथील एकूण रुग्णसंख्या अनुक्रमे ११९ आणि २१३ झाली आहे. भिवंडीत एकाचा मृत्यू झाल्याने तेथील मृतांची संख्या ही ६ वर गेल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस