शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

प्रदूषणाचा विषय फोरमच्या गळ्यात

By admin | Updated: August 18, 2016 05:12 IST

रासायनिक कारखान्यातून होणारे प्रदूषण आणि धोकादायक कारखान्यांवर कारवाई करायची असेल तर पाहणी करून रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांची यादी सिटीझन

डोंबिवली : रासायनिक कारखान्यातून होणारे प्रदूषण आणि धोकादायक कारखान्यांवर कारवाई करायची असेल तर पाहणी करून रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांची यादी सिटीझन फोरम फॉर पोल्यूशन फ्री डोंबिवली या संस्थेने सादर करावी. त्यांच्या अहवालानंतर या कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. त्यामुळे या कारखान्यांचा विषय मांडणाऱ्या व त्यासाठी झगडणाऱ्या संस्थेच्याच गळ््यात हा विषय पडला आहे.हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ कुचकामी ठरल्याने मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी एमआयडीसीच्या गळ््यात टाकली होती. ती आता या संस्थेच्या गळ््यात पडली आहे. फोरमने सर्वेक्षण करुन प्रदूषण करणारे कारखाने व धोकादायक कारखान्यांची यादी सादर करावी. त्यानुसार संबंधित कारखान्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी फोरमच्या शिष्टमंडळाला दिले. फोरमला विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. फोरमतर्फे अश्वीन अघोर, राजू नलावडे, माधव जोशी, अजित अभ्यंकर आणि अनिल त्रिवेदी यांनी देसाई यांची भेट घेतली. प्रदूषण रोखण्यात नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. एमआयडीसीही त्याला तितकीच जबाबदार आहे. प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे धोकादायक कारखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. नियमांचे उल्लंघन करुन कारखानदारांनी उभारलेल्या बॉयलरचा विषय एमआयडीसीकडे मांडूनही त्यांनी काही केले नसल्याकडे त्यांनी उद्योगमंत्र्यांचे लक्ष वेधले. औद्योगिक सुरक्षा विभाग आणि आरोग्य संचालनालयाने नलावडे यांना माहितीच्या अधिकारात पाच धोकादायक कारखान्यांची माहिती दिली. मात्र कारवाईच न झाल्याने शहराचा धोका कमी झालेला नाही, हे लक्षात आल्यावर फोरमने प्रदूषणकारी व धोकादायक कारखान्यांचे सर्वेक्षण करुन त्याची यादी उद्योग मंत्रालयाला सादर करावी. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देसाई यांनी दिले. (प्रतिनिधी)नेमके काय घडले?सांडपाणी प्रक्रियेचा विषय हरीत लवादाकडे आहे. लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दणका दिल्याने त्यांनी डोंबिवली आणि अंबरनाथमधील १४२ कारखाने बंद करण्याची नोटीस दिली आहे. त्यावर दाद मागूनही अद्याप लवादाने कारखानदारांना दिलासा दिलेला नाही. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. तोवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखानाबंदी उठवली. त्यामुळे प्रदूषणानाने त्रस्त असलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.