शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

टीएमटी वाहतूक रिक्षाचालकाने रोखली

By admin | Updated: May 9, 2017 01:06 IST

कल्याण व ठाणे येथून होणारी केडीएमटी व टीएमटी बसची वाहतूक बंद पाडण्याकरिता येथील बागे फिरदोस येथे एका रिक्षाचालकाने

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : कल्याण व ठाणे येथून होणारी केडीएमटी व टीएमटी बसची वाहतूक बंद पाडण्याकरिता येथील बागे फिरदोस येथे एका रिक्षाचालकाने बसच्या मार्गात आपली रिक्षा आडवी घातली आणि चक्क बसची चावी काढून घेतली. रिक्षाचालक मोहम्मद हानीफ सलीम शेख व युसुफ सलीम शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.गेल्या काही दिवसांपासून शिवाजी चौकातून टीएमटी बसची वाहतूक सुरू झाली असून त्याविरोधात स्थानिक रिक्षाचालकांमध्ये असंतोष खदखदत आहे. सोमवारी दुपारी बागे फिरदोस येथे एका रिक्षाचालकाने आपली रिक्षा आडवी घालून टीएमटी बस अडवून त्यामधील प्रवाशांना बसखाली उतरवले. बसची चावी काढून घेतली, अशी माहिती बसचालक व वाहकाने दिली. त्यांनी या रिक्षाचालकाविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी रिक्षाचालक मोहम्मद हानीफ सलीम शेख व युसुफ सलीम शेख यांना ताब्यात घेतले आहे.टीएमटी बसचालकाने दिलेल्या माहितीनुसार, एसटी स्थानकाजवळ टीएमटीचा थांबा असून त्यास रिक्षाचालकांचा विरोध आहे. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या केल्या जातात. परिणामी, टीएमटी बसला पुढे जाण्यास नेहमी अडथळा होतो. रिक्षाचालकांशी वादविवाद होतात. तीनचार दिवसांपासून काही रिक्षाचालक सकाळच्या वेळेस टीएमटी बस शिवाजी चौकापर्यंत पोहोचू न देता त्यांना वंजारपाटीनाका येथे वळवण्यास सांगत असल्याची तक्रार बसचालक-वाहकांनी केली. टीएमटीच्या बस शिवाजी चौकातून सुटत असल्याने तेथे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांनी बस न आल्याबद्दल टीएमटी नियंत्रण कक्षाकडे तक्रारी केल्या आहेत. यापूर्वी केडीएमटीच्या नारपोलीकडून शिवाजी चौकात येणाऱ्या बसगाड्या रोखण्याकरिता काही रिक्षाचालकांनी त्यांच्या काचा फोडल्या होत्या. परिणामी, केडीएमसीच्या बस गोपाळनगर येथे, तर टीएमटी बस नारपोली पोलीस ठाणे येथे उभ्या राहत असल्याने प्रवाशांना तेथपर्यंत जाण्याकरिता आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.