शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

टीएमटीच झाली पंक्चर

By admin | Updated: December 16, 2015 00:35 IST

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणेकरांना आधुनिक ठाण्याचे भव्य स्वप्न दाखविणाऱ्या ठाणे महापालिकेची रडतखडत सुरू असलेली परिवहन सेवा दीर्घकाळ झाला, पंक्चर असूनही

- अजित मांडके,  ठाणे

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणेकरांना आधुनिक ठाण्याचे भव्य स्वप्न दाखविणाऱ्या ठाणे महापालिकेची रडतखडत सुरू असलेली परिवहन सेवा दीर्घकाळ झाला, पंक्चर असूनही त्यात हवा भरण्याचे काम नेमके कधी करणार, हा ठाणेकरांचा मुख्य प्रश्न आहे. रेल्वेच्या विस्ताराला असलेल्या मर्यादा, वाहतुकीच्या पर्यायी मार्गांना राजकारणातून घातलेला खोडा, रिक्षा संघटनांतील राजकीय हस्तक्षेप यामळे ठाणे शहराच्या वाहतुकीचे आधीच तीन तेरा वाजले आहेत. त्यात पालिकेची परिवहन सेवा हा आधार ठरण्यापेक्षा मन:स्तापाचे कारण होते आहे. परिवहनच्या ताफ्यात ३१३ बस असतांनाही सध्या अवघ्या १३० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. दुरूस्ती-देखभालीसाठी निम्म्याहून अधिक म्हणजे १८३ बस ठिकठिकाणच्या आगारात पडून आहेत. बेभरवशी सेवेमुळे दिवसेंदिवस प्रवासी घटत आहेत. परिवहन सेवेचे उत्पन्नही तीन लाखांनी घटले आहे. काही मार्गावर तर प्रवाशांना अर्धा-अर्धा तास बसची वाट पाहावी लागत आहे. नव्या बसचे दिवास्वप्न मागील तीन वर्षापासून ठाणेकरांना दाखविले जात आहे. परंतु आजही या बस परिवहनमध्ये दाखल होऊ शकलेल्या नाहीत.१९८९ मध्ये ठाणे परिवहन सेवा सुरु झाली. सुरवातीला ५० बस या सेवेत होत्या. टप्याटप्याने बस वाढत गेल्या. सध्या परिवहनच्या ताफ्यात ३१३ बस असून, त्यामध्ये २५०० कर्मचारी काम करीत आहेत. मुंबईप्रमाणे बेस्ट होणे सोडा, पण टीएमटीच्या मागून सुरु झालेल्या नवी मुंबई, वसई विरार महापालिकेच्या सेवांनी ठाणे काबीज केले असतांनाही वेगवेगळे प्रयत्न करूनही परिवहन सेवा कात टाकू शकलेली नाही. परिवहनच्या वागळे आगारात ७५ हून अधिक बस टायर बदलणे, ट्यूब बदलणे, तुटलेल्या काचा, खराब आसने, टीपीएस केबल टाकणे अशा कराणांसाठी धूळ खात पडल्या आहेत. यापूर्वीचे फसलेले प्रयोग वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाहतूक कशी सुधारता येईल, यासाठी पालिकेने कोट्यवधींची उधळपट्टी करुन ठाणेकरांना अनेक दिवास्वप्ने दाखविली. ते सर्वच प्रयोग फसले. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी रिंंग रुटची संकल्पना पुढे आणली होती. त्याचे मार्ग अंतिम झाले, कुठे-कितीबांधकामे बाधित होतील, ते निश्चित झाले. त्याचा खर्च काढण्यात आला. पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेच नाही. त्यानंतर बीआरटीएसची संकल्पनाही काही वर्षापूर्वी ठाणे महापालिकेने पुढे आणली. त्याचेही मार्ग, खर्च आदींसह सल्लागार नेमून ही सेवा कशी असेल याचाही आराखडा तयार झाला. परंतु तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी लाईट रेल ट्रान्सपोर्टची संकल्पना पुढे आणली आणि ठाणेकरांना या ट्रेनच्या सुखद प्रवासाचा आल्हाददायी आनंद दिला. त्यामुळे बीआरटीएसची संकल्पना बासनात गुंडाळली गेली. केवळ १८ महिन्यात ही सेवा ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तीन वर्षे उलटूनही ही सेवा कागदावरुन पुढे सरकलेली नाही. या तिन्ही स्वप्नांच्या पाहणी-आराखड्यासाठीच पालिकेने कोट्यवधींची उधळपट्टी केली. आयुष्य संपलेल्या बस रस्त्यावरताफ्यातील बसची संख्या कमी असल्याने आयुर्मान संपलेल्या १५ ते २० बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या आहेत. किरकोळ दुरुस्ती केल्यास नव्या बस सहज रस्त्यावर उतरू शकतात. मात्र वागळे आगारात त्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत. आयुर्मान संपलेल्या बस रस्त्यावर उतरवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे काम मात्र परिवहन करीत आहेत.उत्पन्न आणि प्रवाशांत घटपरिवहन सेवेच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर सुरूवातीचे काही महिने टीएमटीला दिवसाला २६ लाखापर्यंतचे उत्पन्न मिळत होते. सध्या हेच उत्पन्न २२ ते २३ लाखांवर आले आहे. तसेच प्रवाशांची संख्याही लाखाने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या १९० बस कधी येणार?टीएमटी सुधारण्यासाठी पालिकेने जेएनएनयुआरएमअंतर्गत २३० नव्या बस घेण्याचे ठरविले होते. त्यातील ४० एसी बस दाखल झाल्या, उरलेल्या १९० बसचा मार्ग तीन वर्षापासून रखडला आहे. या बस उभ्या करण्यासाठी जागा नसल्याचे कारण परिवहन प्रशासन देत आहे. या बस खाजगी ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार असून त्यावर फक्त वाहक परिवहनचा असेल. त्यातून किलोमीटरमागे परिवहनला उत्पन्न मिळेल. पण या बस दाखल होऊ शकलेल्या नाहीत. नव्या वर्षात बस दाखल होतील, असे नवे आश्वासन सध्या मिळते आहे. जलवाहतूक प्रत्यक्षात येणार? रस्त्यावरील सार्वजनिक वाहतुकीची सेवा कागदावर राहिल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जल वाहतुकीचा पर्याय दाखविला. वॉटर फ्रन्ट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जलवाहतुकीची सेवा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. १०० इलेक्ट्रिक बसचे स्वप्न : मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना स्मार्ट बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी १०० पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची संकल्पना पुढे आणली आहे. या बस पीपीपी तत्वावर चालविल्या जाणार आहेत. ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार अधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गावर या बस धावतील.