शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रेंटलच्या घरांचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:45 IST

निकृष्ट बांधकामामुळे एमएमआरडीएने बांधलेल्या रेंटलच्या घरांचे चार वर्षांत तीनतेरा वाजले असून त्यांच्या दुरुस्तीवर महापालिकेने दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : निकृष्ट बांधकामामुळे एमएमआरडीएने बांधलेल्या रेंटलच्या घरांचे चार वर्षांत तीनतेरा वाजले असून त्यांच्या दुरुस्तीवर महापालिकेने दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. हा खर्च प्रकल्पातील १२ ठिकाणांवर झाला आहे. वाढीव एफएसआय पदरी पाडून घेणाºया विकासकांनी रेंटलची ही घरे निकृष्ट बांधल्याचा आरोप होऊ लागला असून याप्रकरणी एमएमआरडीएच्या तत्कालीन दोषी अधिकाºयांसह विकासकांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाईची मागणी जोर धरते आहे.ठामपा हद्दीत एमएमआरडीएच्या माध्यमातून रेंटलची घरे बांधण्यात आली आहेत. मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भाडेपट्ट्यावरील घरांची उभारणी व्हावी, यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने वाढीव चटईक्षेत्राची महत्त्वाकांक्षी योजना पुढे आणली. या माध्यमातून चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर तब्बल चार चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर करून बांधकाम करण्याची मुभा खासगी विकसकांना देण्यात आली. या वाढीव चटईक्षेत्राच्या मोबदल्यात बिल्डरने भाडेपट्ट्यावर घरांची उभारणी करावी, असे ठरवण्यात आले. ठाणे शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून तब्बल १२ ठिकाणी भाडेपट्टा योजनेद्वारे घरउभारणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या बांधकामांना बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी ठाणे महापालिका हे नियोजन प्राधिकरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार, एमएमआरडीएने ही घरे बांधून २०१३ च्या सुमारास ती पालिकेच्या ताब्यात दिली. ती ताब्यात देताना लिफ्ट, जिने, आगप्रतिबंधक योजना, सोलर, इलेक्ट्रिक सबस्टेशन, आदींसह इतर सर्व सुविधा पुरवण्यात आल्याचे ताबा प्रमाणपत्रही पालिकेला देण्यात आले होते. परंतु,अवघ्या चारच वर्षांत यातील बहुतेक इमारती निकृष्ट दर्जाच्या ठरल्या आहेत.ठाणे महापालिकेस रेंटलच्या माध्यमातून आतापर्यंत ३२६७ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. शहरातील रस्ते रु ंदीकरण तसेच इतर विकास प्रकल्पांमधील विस्थापितांना ही घरे रेंटल स्वरूपात देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यानुसार धोकादायक इमारतींमधील २२७२ बाधितांना, तर रस्ता रु ंदीकरणातील ९३४ बाधितांना आतापर्यंत ती वितरित करण्यात आली आहेत. असे असले तरी त्यांची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्र ारी सातत्याने पुढे येत आहे.यामुळे वाढीव चटईक्षेत्राचा लाभ घेऊन उभारलेल्या या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे पत्र शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी महापालिका आयुक्तांना पाठवल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ठाण्यातील वर्तकनगर या अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात चार चटईक्षेत्राचा वापर करून उभारलेल्या दोस्ती विहार या नावाजलेल्या प्रकल्पातील भाडेपट्ट्यावर घरांच्या दुरु स्तीसाठी महापालिकेस पहिल्याच वर्षात तब्बल ५० लाखांपेक्षा अधिक करावा लागला आहे. तसेच प्रत्येक वर्षी या प्रकल्पासह मानपाडा येथील प्रकल्पावरदेखील खर्च केला असून आतापर्यंत विविध स्वरूपांच्या कामांवर तब्बल २ कोटी ८१ लाख ६२ हजार ३५४ रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या १२ प्रकल्पांमधील रेंटलवर हस्तांतरित झालेल्या घरांची महापालिकेने तपासणी करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी वैती यांनी केली आहे.