शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

रेंटलच्या घरांचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:45 IST

निकृष्ट बांधकामामुळे एमएमआरडीएने बांधलेल्या रेंटलच्या घरांचे चार वर्षांत तीनतेरा वाजले असून त्यांच्या दुरुस्तीवर महापालिकेने दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : निकृष्ट बांधकामामुळे एमएमआरडीएने बांधलेल्या रेंटलच्या घरांचे चार वर्षांत तीनतेरा वाजले असून त्यांच्या दुरुस्तीवर महापालिकेने दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. हा खर्च प्रकल्पातील १२ ठिकाणांवर झाला आहे. वाढीव एफएसआय पदरी पाडून घेणाºया विकासकांनी रेंटलची ही घरे निकृष्ट बांधल्याचा आरोप होऊ लागला असून याप्रकरणी एमएमआरडीएच्या तत्कालीन दोषी अधिकाºयांसह विकासकांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाईची मागणी जोर धरते आहे.ठामपा हद्दीत एमएमआरडीएच्या माध्यमातून रेंटलची घरे बांधण्यात आली आहेत. मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भाडेपट्ट्यावरील घरांची उभारणी व्हावी, यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने वाढीव चटईक्षेत्राची महत्त्वाकांक्षी योजना पुढे आणली. या माध्यमातून चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर तब्बल चार चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर करून बांधकाम करण्याची मुभा खासगी विकसकांना देण्यात आली. या वाढीव चटईक्षेत्राच्या मोबदल्यात बिल्डरने भाडेपट्ट्यावर घरांची उभारणी करावी, असे ठरवण्यात आले. ठाणे शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून तब्बल १२ ठिकाणी भाडेपट्टा योजनेद्वारे घरउभारणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या बांधकामांना बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी ठाणे महापालिका हे नियोजन प्राधिकरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार, एमएमआरडीएने ही घरे बांधून २०१३ च्या सुमारास ती पालिकेच्या ताब्यात दिली. ती ताब्यात देताना लिफ्ट, जिने, आगप्रतिबंधक योजना, सोलर, इलेक्ट्रिक सबस्टेशन, आदींसह इतर सर्व सुविधा पुरवण्यात आल्याचे ताबा प्रमाणपत्रही पालिकेला देण्यात आले होते. परंतु,अवघ्या चारच वर्षांत यातील बहुतेक इमारती निकृष्ट दर्जाच्या ठरल्या आहेत.ठाणे महापालिकेस रेंटलच्या माध्यमातून आतापर्यंत ३२६७ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. शहरातील रस्ते रु ंदीकरण तसेच इतर विकास प्रकल्पांमधील विस्थापितांना ही घरे रेंटल स्वरूपात देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यानुसार धोकादायक इमारतींमधील २२७२ बाधितांना, तर रस्ता रु ंदीकरणातील ९३४ बाधितांना आतापर्यंत ती वितरित करण्यात आली आहेत. असे असले तरी त्यांची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्र ारी सातत्याने पुढे येत आहे.यामुळे वाढीव चटईक्षेत्राचा लाभ घेऊन उभारलेल्या या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे पत्र शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी महापालिका आयुक्तांना पाठवल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ठाण्यातील वर्तकनगर या अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात चार चटईक्षेत्राचा वापर करून उभारलेल्या दोस्ती विहार या नावाजलेल्या प्रकल्पातील भाडेपट्ट्यावर घरांच्या दुरु स्तीसाठी महापालिकेस पहिल्याच वर्षात तब्बल ५० लाखांपेक्षा अधिक करावा लागला आहे. तसेच प्रत्येक वर्षी या प्रकल्पासह मानपाडा येथील प्रकल्पावरदेखील खर्च केला असून आतापर्यंत विविध स्वरूपांच्या कामांवर तब्बल २ कोटी ८१ लाख ६२ हजार ३५४ रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या १२ प्रकल्पांमधील रेंटलवर हस्तांतरित झालेल्या घरांची महापालिकेने तपासणी करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी वैती यांनी केली आहे.