शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

साडेतीन हजार विद्यार्थी ‘आधारकार्ड’विना

By admin | Updated: May 7, 2017 05:57 IST

शालेय साहित्यखरेदी करण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला शनिवारी शिक्षण समितीने हिरवा कंदील दाखवला. साहित्यखरेदीस

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : शालेय साहित्यखरेदी करण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला शनिवारी शिक्षण समितीने हिरवा कंदील दाखवला. साहित्यखरेदीस लागणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु, खाते काढण्यासाठी लागणाऱ्या आधारकार्डापासून महापालिकेच्या शाळांतील साडेतीन हजार विद्यार्थी वंचित असल्याचे समितीच्या बैठकीत समोर आले. यावर आधारकार्ड काढण्याची प्रक्रि या सुरू राहील, तोपर्यंत बँक खाते उघडण्यासाठी बोनाफाइडचा आधार घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्याचे स्पष्टीकरण शिक्षण अधिकारी जे.जे. तडवी यांनी दिले. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जूनअखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत, असे आदेश सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी दिले.शालेय साहित्यखरेदीसाठी लागणारा विलंब आणि यात चव्हाट्यावर येत असलेल्या भोंगळ कारभाराला चाप लागावा, यासाठी सरकारने काढलेला अध्यादेश समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. शालेय साहित्यखरेदीसाठी एकूण २ कोटी ४६ लाखांचा खर्च येणार असून ही रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या विषयावरील चर्चेच्या वेळी सदस्या वीणा जाधव यांनी किती विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले आहे, असा सवाल केला. अनेक विद्यार्थी निराधार आहेत, तसेच मजुरांची मुले आहेत. त्यामुळे त्यांचे बँक खाते उघडण्यास अडचण येणार आहे. परिणामी, विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे, याकडेही या वेळी जाधव यांच्यासह सदस्या आशालता बाबर यांनी लक्ष वेधले. यावर, महापालिकेचे ९ हजार ११८ विद्यार्थी आहेत. यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांची आधारकार्डे काढलेली नाहीत. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, आधारकार्ड काढण्यासाठी यंत्रे उपलब्ध न झाल्याने बोनाफाइडद्वारे विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.७० टक्के विद्यार्थ्यांची बँक खाती उघडल्याचा दावाही तडवी यांनी या वेळी केला. सरकारी अध्यादेशामुळे ही प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. परंतु, काही त्रुटी आढळल्यास आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळण्यास विलंब झाला, तर निविदा प्रक्रिया पुन्हा अमलात आणली जाईल, असे घोलप यांनी सुनावले. २७ गावांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निधी ठेवला असून त्यांनाही तातडीने शालेय साहित्य मिळाले पाहिजे, असेही त्यांनी आदेश दिले. आधी पैसे खात्यात जमा कराखरेदी केल्यावरच खात्यात पैसे जमा होतील, असे सरकारचे धोरण आहे. परंतु, महापालिकेचे विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना खरेदी करणे शक्य होणार नाही. पैसे मिळाल्यावरच खरेदी करणे शक्य होईल, ही बाब लक्षात घेता सरकारला त्याप्रमाणे विनंती करून पैसे आधी जमा करा, अशी सूचनाही घोलप यांनी केली.