शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

‘त्या’ नियमावलीने सहलीच होणार बंद!

By admin | Updated: February 8, 2016 02:39 IST

पुण्याच्या शाळेतील १४ विद्यार्थी मुरुड जंजिरा समुद्र किनारी बुडून मरण पावल्यानंतर शिक्षण विभागाने सहली नेण्यावर लावलेले निर्बंध पाळायचे ठरवले

जान्हवी मोर्ये ,  ठाणेपुण्याच्या शाळेतील १४ विद्यार्थी मुरुड जंजिरा समुद्र किनारी बुडून मरण पावल्यानंतर शिक्षण विभागाने सहली नेण्यावर लावलेले निर्बंध पाळायचे ठरवले तर शालेय सहली बंद कराव्या लागतील, असे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांचे म्हणणे आहे.शिक्षण विभागाने उंच टेकड्या, समुद्र किनारे, अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहीरी आदी ठिकाणी सहली काढू नये, असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सहली दरम्यान अपघात घडल्यास त्याला प्राचार्य व शिक्षक यांना जबाबदार धरण्याचे निश्चित केले आहे. ही जाचक नियमावली पाहता शालेय विद्यार्थ्यांमध्ये साहस, शौर्य वगैरे गुण वृद्धींगत झाले नाही तरी चालेल. परंतु सहलीच्या फंदात पडायचे नाही, अशी अनेक शाळांची मानसिकता तयार झाली आहे.कल्याणमधील मातोश्री रखमाबाई गायकवाड सेमी इंग्लीश शाळेचे संस्थापक दत्तात्रय दळवी यांनी सांगितले की, १० मुलांमागे एक शिक्षक नसून आमची शाळा २० मुलांमागे एक शिक्षक नेते. तसेच १५ पालक व १५ माजी विद्यार्थीही सहलीकरिता सोबत नेले जातात. शिक्षण अधिकाऱ्यांकडून परवानगी मागितली असता परवानगी मिळत नाही. २००६ सालच्या सहल विषयक जीआरचे पालन शिक्षण विभागाकडून होत नाही. परवानगीची वाट पाहत बसलो तर शैक्षणिक सहलच होणार नाही. सरकार प्रत्येक घटना घडल्यानंतर नियमावली काढते. नियमावलीवर बोट ठेवून काम करायचे म्हटले तर मुलांना घराबाहेर पडणे कठीण होऊन बसेल. मुलांना सहलीच्या निमित्ताने किल्ले, समुद्र पाहावयास मिळतो. त्यांनी शाळकरी वयातच गड चढण्याचे धाडस केले नाही तर त्यांच्यात साहसी वृत्ती वाढीस लागणार नाही. एकाद्या विद्यार्थ्याने समुद्रच पाहिला नसेल तर तो मरिन इंजिनीअरींगचे शिक्षण कसे घेणार असा प्रश्न उपस्थित होतो. डोंबिवलीतील टिळकनगर शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पुणतांबेकर यांनी सांगितले की, आमच्या शाळेतील सगळ््याच इयत्तेचे विद्यार्थी एकाच वेळी सहलीला नेले जात नाही. सहल नेताना शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी वेळेत मिळत नाही. मुलांना कितीही सूचना दिल्या तरी आनंदाच्या भरात कशी वागतील हे नेमके सांगता येत नाही. मात्र, एखादी घटना घडली की, मुख्याध्यापक व शिक्षकांना जबाबदार धरण्याची पद्धत चांगली नाही. डोंबिवलीतील एका शाळेच्या सहलीदरम्यान एक अपघात झाला. त्या शाळेची सहल गेली दहा वर्षे गेलेली नाही. त्या विद्यार्थ्यांना सहलीचा आनंदच मिळालेला नाही. आता तर सरकारने अशी नियमावली केली आहे की, कोणी सहली काढणारच नाही. त्यामुळे मुलांना वेगवेगळ््या ठिकाणांची माहिती होणार नाही. प्रत्यक्ष ज्ञानापासून ती वंचित राहतील. डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी. दावणे यांनी सांगितले की, सहलीसाठी शाळा परवानगी मागते. ही परवानगी मिळण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात. सहलीचा उद्देशा नीट जोपासला गेला पाहिजे. मुले सहलीसाठी जातात. त्याठिकाणी त्यांना साहसी अनुभव यावा हा उद्देश असतो. साहस हा उद्देश मागे पडून मौजमजा हाच उद्देश प्रमुख ठरतो. सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. पण सरसकट सगळ््यांसाठी एखादा नियम लागू केल्यामुळे काळजीपूर्वक वागणाऱ्यांची पंचाईत होते. डोंबिवलीतील डीएनसी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका विजया महाजन यांनी सांगितले की, १९८७ साली बंगलोर-ऊटी येथे आमच्या शाळेची सहल गेली असताना अपघात झाला होता. त्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता आम्ही सहल घेऊन जात नाही. एखादी घटना घडायची असेल तर घडतेच पण आपण काळजी घेतलेली बरी. विद्यार्थी बऱ्याच वेळेला शिक्षकांचे ऐकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतच शक्य तेवढी माहिती उपलब्ध करून देत असतो.