शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

मार वाचवण्यासाठी त्यांनी केले पलायन

By admin | Updated: February 17, 2017 02:03 IST

ज्या पालकांच्या भीतीने घर सोडले, त्यांचाच सहवास आणि मायेच्या उबेपासून पोरके झाल्यावर जणू त्यांच्यावर आभाळ कोसळल्याने

ठाणे : ज्या पालकांच्या भीतीने घर सोडले, त्यांचाच सहवास आणि मायेच्या उबेपासून पोरके झाल्यावर जणू त्यांच्यावर आभाळ कोसळल्याने रडणाऱ्या १० आणि १२ वर्षीय दोन चिमुरड्यांना ठाणे गुन्हे शाखेच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला स्वगृही धाडण्यात यश आले आहे. ही मुले ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता झाली असतानाही हे आपले काम नाही, असे न म्हणता, ठाणे शहराने आपली जबाबदारी ओळखून त्यांची त्यांच्या पालकांशी पुन:र्भेट घडवून आणली. यानिमित्ताने शहर पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन पाहण्यास मिळाले.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथील म्हारळ हे गाव. या गावातील गरीब कुटुंबातील दोन मुले ३ फेब्रुवारी रोजी अचानक बेपत्ता झाली. शोध घेऊनही सापडत नसल्याने त्यांच्या पालकांनी ५ फेब्रुवारीला टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. याचदरम्यान, ठाणे शहर पोलिसांचे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट मानखुर्द येथील बालसुधारगृहात दुसऱ्या एका प्रकरणी तपास कामी गेले असताना, ही मुले रडताना, या पथकाला दिली. पथकाने त्यांच्याबद्दल विचारणा केली असता, ते काही सांगत नसल्याचे बालगृहाकडून सांगण्यात आले. या वेळी पथकाने त्यांची चौकशी करताना, ते पोपटाप्रमाणे बोलू लागले. अवघ्या चार दिवसांत ती मुले स्वगृही परतली आहेत. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अडसुळे, पोलीस उपनिरीक्षक एस.जे. सोनावणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार एच.एस. घोरपडे, पोलीस नाईक प्रमोद पालांडे आणि रोशनी सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)