शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मार वाचवण्यासाठी त्यांनी केले पलायन

By admin | Updated: February 17, 2017 02:03 IST

ज्या पालकांच्या भीतीने घर सोडले, त्यांचाच सहवास आणि मायेच्या उबेपासून पोरके झाल्यावर जणू त्यांच्यावर आभाळ कोसळल्याने

ठाणे : ज्या पालकांच्या भीतीने घर सोडले, त्यांचाच सहवास आणि मायेच्या उबेपासून पोरके झाल्यावर जणू त्यांच्यावर आभाळ कोसळल्याने रडणाऱ्या १० आणि १२ वर्षीय दोन चिमुरड्यांना ठाणे गुन्हे शाखेच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला स्वगृही धाडण्यात यश आले आहे. ही मुले ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता झाली असतानाही हे आपले काम नाही, असे न म्हणता, ठाणे शहराने आपली जबाबदारी ओळखून त्यांची त्यांच्या पालकांशी पुन:र्भेट घडवून आणली. यानिमित्ताने शहर पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन पाहण्यास मिळाले.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथील म्हारळ हे गाव. या गावातील गरीब कुटुंबातील दोन मुले ३ फेब्रुवारी रोजी अचानक बेपत्ता झाली. शोध घेऊनही सापडत नसल्याने त्यांच्या पालकांनी ५ फेब्रुवारीला टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. याचदरम्यान, ठाणे शहर पोलिसांचे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट मानखुर्द येथील बालसुधारगृहात दुसऱ्या एका प्रकरणी तपास कामी गेले असताना, ही मुले रडताना, या पथकाला दिली. पथकाने त्यांच्याबद्दल विचारणा केली असता, ते काही सांगत नसल्याचे बालगृहाकडून सांगण्यात आले. या वेळी पथकाने त्यांची चौकशी करताना, ते पोपटाप्रमाणे बोलू लागले. अवघ्या चार दिवसांत ती मुले स्वगृही परतली आहेत. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अडसुळे, पोलीस उपनिरीक्षक एस.जे. सोनावणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार एच.एस. घोरपडे, पोलीस नाईक प्रमोद पालांडे आणि रोशनी सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)