शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

पाऊस नाही, मजुरी नाही; मग पोटाकरिता गाठतो मुंबई

By admin | Updated: April 15, 2016 01:25 IST

गेल्या २-३ वर्षांत समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पिण्यासाठी पाणी नाही, तर शेतीसाठी पाणी आणणार कुठून? मजुरी मिळते, तीसुद्धा आठवडा-पंधरवड्यातून एकदाच.

- स्रेहा पावसकर,  ठाणे गेल्या २-३ वर्षांत समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पिण्यासाठी पाणी नाही, तर शेतीसाठी पाणी आणणार कुठून? मजुरी मिळते, तीसुद्धा आठवडा-पंधरवड्यातून एकदाच. त्याच्या आधारावर घरखर्च, मुलांचे शिक्षण कसे होणार, कर्ज कसे फिटणार? आणि बचत ती काय होणार? दिवाळीनंतर तर हाताला कामच नाही? निव्वळ बसून करायचे काय? अशा असंख्य समस्यांचा सामना करीत असलेल्यांनी पोटाची वितभर खळगी भरण्याकरिता ठाण्यातील रामनगर परिसरातील मदत छावणीत आसरा घेतला आहे. नांदेड, लातूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांनी आपल्या व्यथा भरभरून सांगितल्या.नांदेडमधील मुखेड तालुक्यातील सुमारे २०० दुष्काळग्रस्त सध्या या छावणीत वास्तव्याला आहेत. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आठ दिवसांतून एकदा टँकर येतो, पण तोही गावात. रानमाळावर राहणाऱ्या लोकांपर्यंत टँकरचे पाणी पोहोचतच नाही. पाण्याअभावी शेती करपून गेली. याही परिस्थितीत कुणी शेती केलीच तरी पिकं चांगली येत नाही. पाणी विकत घ्यायचे म्हटले तर २ रुपये १ घागर असा सध्या भाव सुरू असल्याचे बाराळी गावातील दुष्काळग्रस्त बजरंग चव्हाण यांनी सांगितले. ज्यांच्याकडे बोअरने थोडेफार पाणी येते. अशांच्या शेतात मजुरी करायची म्हटले तरी ती रोज मिळत नाही. त्यामुळे घरातील वयोवृद्ध आणि शिक्षण घेणाऱ्या मुलांना मागे ठेवून रोजगारासाठी आम्ही मुंबई गाठतो. इथे इमारत बांधकाम, पेव्हरब्लॉक बसवणे, कचरा साफ करणे अशाप्रकारे २०० ते ३०० रुपये रोजंदारीवर काम केल्यावर अन्नधान्याचा खर्च वगळता उरलेले पैसे गावी पाठवतो, असे अनेकांनी सांगितले. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे आल्यावर ३-४ महिने रोजंदारी करतो आणि पाऊस आल्यावर पुन्हा गावाकडे जातो. काहींनी दरवर्षी येणेजाणे टाळण्याकरिता मुंबईतच संसार थाटला, असे गुजाबाई चव्हाण यांनी सांगितले. छावणीत असलेल्यांपैकी काही प्रथमच मुंबईत आले असले तरी अनेकजण सलग २-३ वर्षे याच काळात येत आहेत. त्यामुळे बदलत्या ऋतुचक्राप्रमाणे त्यांचेही स्थलांतर सुरू आहे.यंदा प्रसिद्धिमाध्यमातून मुखेड तालुक्याची परिस्थिती समजल्यावर आमच्या गावात असलेल्या माणसांना दोन-तीन दिवसाआड का होईना, पण टँंकरचे पाणी मिळू लागल्याचेही त्यांनी सांगितले. मुलांचे शिक्षण असल्यामुळे त्यांना तेथेच सोडून येतो. त्यांनी भरपूर शिकून चांगली नोकरी करावी. त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नकार्यासाठी जास्तीतजास्त पैसे बचत करावेसे वाटतात, असे सुशीलाबाई राठोड यांनी सांगितले. जनावरे दिली सोयऱ्यांकडेमाणसांना पिण्यासाठी पाणी नाही. अशावेळी जनावरांसाठी पाणी,चारा मिळवणे कठीण असते. त्यातच आता रोजगाराच्या शोधात आम्ही मुंबईला आल्यावर जनावरांना नातेवाइकांच्या घरी त्यांच्या ताब्यात देऊन त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय करून आलो आहोत, असेही येथील लोकांनी सांगितले.सामाजिक संस्था, नागरिकही सरसावलेमुंबईत आणि नंतर ठाण्यात स्थलांतरित झालेल्या दुष्काळग्रस्तांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मंडळांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी बातचीत केली. विदर्भ समाज संघ, शेअर सामाजिक संस्था, भोजा एज्युकेशनल आणि सोशल ट्रस्ट यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने तर कोणी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर, काही सर्वसामान्य ठाणेकरांनी या छावणीमध्ये उत्स्फूर्तपणे धान्य,कपड्यांचे वाटपही केले.