शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस नाही, मजुरी नाही; मग पोटाकरिता गाठतो मुंबई

By admin | Updated: April 15, 2016 01:25 IST

गेल्या २-३ वर्षांत समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पिण्यासाठी पाणी नाही, तर शेतीसाठी पाणी आणणार कुठून? मजुरी मिळते, तीसुद्धा आठवडा-पंधरवड्यातून एकदाच.

- स्रेहा पावसकर,  ठाणे गेल्या २-३ वर्षांत समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पिण्यासाठी पाणी नाही, तर शेतीसाठी पाणी आणणार कुठून? मजुरी मिळते, तीसुद्धा आठवडा-पंधरवड्यातून एकदाच. त्याच्या आधारावर घरखर्च, मुलांचे शिक्षण कसे होणार, कर्ज कसे फिटणार? आणि बचत ती काय होणार? दिवाळीनंतर तर हाताला कामच नाही? निव्वळ बसून करायचे काय? अशा असंख्य समस्यांचा सामना करीत असलेल्यांनी पोटाची वितभर खळगी भरण्याकरिता ठाण्यातील रामनगर परिसरातील मदत छावणीत आसरा घेतला आहे. नांदेड, लातूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांनी आपल्या व्यथा भरभरून सांगितल्या.नांदेडमधील मुखेड तालुक्यातील सुमारे २०० दुष्काळग्रस्त सध्या या छावणीत वास्तव्याला आहेत. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आठ दिवसांतून एकदा टँकर येतो, पण तोही गावात. रानमाळावर राहणाऱ्या लोकांपर्यंत टँकरचे पाणी पोहोचतच नाही. पाण्याअभावी शेती करपून गेली. याही परिस्थितीत कुणी शेती केलीच तरी पिकं चांगली येत नाही. पाणी विकत घ्यायचे म्हटले तर २ रुपये १ घागर असा सध्या भाव सुरू असल्याचे बाराळी गावातील दुष्काळग्रस्त बजरंग चव्हाण यांनी सांगितले. ज्यांच्याकडे बोअरने थोडेफार पाणी येते. अशांच्या शेतात मजुरी करायची म्हटले तरी ती रोज मिळत नाही. त्यामुळे घरातील वयोवृद्ध आणि शिक्षण घेणाऱ्या मुलांना मागे ठेवून रोजगारासाठी आम्ही मुंबई गाठतो. इथे इमारत बांधकाम, पेव्हरब्लॉक बसवणे, कचरा साफ करणे अशाप्रकारे २०० ते ३०० रुपये रोजंदारीवर काम केल्यावर अन्नधान्याचा खर्च वगळता उरलेले पैसे गावी पाठवतो, असे अनेकांनी सांगितले. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे आल्यावर ३-४ महिने रोजंदारी करतो आणि पाऊस आल्यावर पुन्हा गावाकडे जातो. काहींनी दरवर्षी येणेजाणे टाळण्याकरिता मुंबईतच संसार थाटला, असे गुजाबाई चव्हाण यांनी सांगितले. छावणीत असलेल्यांपैकी काही प्रथमच मुंबईत आले असले तरी अनेकजण सलग २-३ वर्षे याच काळात येत आहेत. त्यामुळे बदलत्या ऋतुचक्राप्रमाणे त्यांचेही स्थलांतर सुरू आहे.यंदा प्रसिद्धिमाध्यमातून मुखेड तालुक्याची परिस्थिती समजल्यावर आमच्या गावात असलेल्या माणसांना दोन-तीन दिवसाआड का होईना, पण टँंकरचे पाणी मिळू लागल्याचेही त्यांनी सांगितले. मुलांचे शिक्षण असल्यामुळे त्यांना तेथेच सोडून येतो. त्यांनी भरपूर शिकून चांगली नोकरी करावी. त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नकार्यासाठी जास्तीतजास्त पैसे बचत करावेसे वाटतात, असे सुशीलाबाई राठोड यांनी सांगितले. जनावरे दिली सोयऱ्यांकडेमाणसांना पिण्यासाठी पाणी नाही. अशावेळी जनावरांसाठी पाणी,चारा मिळवणे कठीण असते. त्यातच आता रोजगाराच्या शोधात आम्ही मुंबईला आल्यावर जनावरांना नातेवाइकांच्या घरी त्यांच्या ताब्यात देऊन त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय करून आलो आहोत, असेही येथील लोकांनी सांगितले.सामाजिक संस्था, नागरिकही सरसावलेमुंबईत आणि नंतर ठाण्यात स्थलांतरित झालेल्या दुष्काळग्रस्तांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मंडळांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी बातचीत केली. विदर्भ समाज संघ, शेअर सामाजिक संस्था, भोजा एज्युकेशनल आणि सोशल ट्रस्ट यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने तर कोणी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर, काही सर्वसामान्य ठाणेकरांनी या छावणीमध्ये उत्स्फूर्तपणे धान्य,कपड्यांचे वाटपही केले.