शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांसाठी एकही योजना नाही

By admin | Updated: May 24, 2017 01:02 IST

स्वत:चे प्राण धोक्यात घालून इतरांच्या चांगल्या आरोग्यासाठी सफाई कामगार काम करतो. मात्र त्यांच्यासाठी महापालिकेने एकही योजना राबवली

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : स्वत:चे प्राण धोक्यात घालून इतरांच्या चांगल्या आरोग्यासाठी सफाई कामगार काम करतो. मात्र त्यांच्यासाठी महापालिकेने एकही योजना राबवली नसल्याची खंत राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी व्यक्त केली. सफाई कामगारांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या आयोगाला पालिकेच्या अनास्थेचे दर्शन घडले असून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.उल्हासनगर महापालिका सफाई कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी कुठली योजना राबवते. तसेच सरकारच्या विविध योजनेचा कितपत लाभ घेते, याचा आढावा घेण्यासाठी आयोगाने महापालिकेचा दौरा केला होता. पालिका आयुक्त सुधाकर शिंदे, अतिरीक्त आयुक्त विजया कंठे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, कामगार नेते चरणसिंग करोतिलया, राधाकृष्ठ साठे, राजेंद्र अंडागळे, कन्नू करोतिया, दिलीप थोरात यांच्यासह सफाई कामगारांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. सफाई कामगारांसाठी आजपर्यंत किती घरे बांधून दिली. या प्रश्नाचे उत्तर पालिका आयुक्त देऊ शकले नाही. यावेळी पालिकेच्या विविध योजनेचा बुरखा आयोगाने फाडला.महापालिकेच्या लोकसंख्येनुसार २५०० पेक्षा अधिक सफाई कामगार हवेत. मात्र प्रत्यक्षात १२५० सफाई कामगार आहेत. १५ वर्षापासून ३०५ कंत्राटी कामगारांना पालिका सेवेत नियमित करण्याचे न्यायालयासह राज्य सरकारचे आदेश असताना त्यांना पालिका सेवेत घेतलेले नाही. याबाबत आयोगाने नाराजी व्यक्त केली. तसेच पदोन्नतीचा प्रश्न अनेक वर्षापासून धूळखात आहे. सफाई कामगारांच्या विकासासाठी अंदाजपत्रकाच्या ५ टक्के रक्कम राखीव ठेवण्याचा नियम आहे. मात्र ४० वर्षाच्या इतिहासात सफाई कामगारांसाठी एकही योजना राबवली नाही. तसेच कायमस्वरूपी मालकीचे घर दिले नाही, असे पवार यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारकडून सफाई कामगारांसाठी विविध योजनेद्बारे अनुदान येते. मात्र किती अनुदान त्यांच्यासाठी खर्च झाले, किती परत गेले याचे आॅडिट होत नाही. त्याचे विशेष आॅडिट करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. १० वर्ष बंद पडलेला सफाई आयोग पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केल्याची महिती त्यांनी दिली. सफाई कामगारांसाठी राबवत असलेल्या योजना, अधिकारी राबवत नसल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. मात्र आता पर्यंत एकही कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले.