शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सफाई कामगारांसाठी एकही योजना नाही

By admin | Updated: May 24, 2017 01:02 IST

स्वत:चे प्राण धोक्यात घालून इतरांच्या चांगल्या आरोग्यासाठी सफाई कामगार काम करतो. मात्र त्यांच्यासाठी महापालिकेने एकही योजना राबवली

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : स्वत:चे प्राण धोक्यात घालून इतरांच्या चांगल्या आरोग्यासाठी सफाई कामगार काम करतो. मात्र त्यांच्यासाठी महापालिकेने एकही योजना राबवली नसल्याची खंत राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी व्यक्त केली. सफाई कामगारांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या आयोगाला पालिकेच्या अनास्थेचे दर्शन घडले असून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.उल्हासनगर महापालिका सफाई कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी कुठली योजना राबवते. तसेच सरकारच्या विविध योजनेचा कितपत लाभ घेते, याचा आढावा घेण्यासाठी आयोगाने महापालिकेचा दौरा केला होता. पालिका आयुक्त सुधाकर शिंदे, अतिरीक्त आयुक्त विजया कंठे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, कामगार नेते चरणसिंग करोतिलया, राधाकृष्ठ साठे, राजेंद्र अंडागळे, कन्नू करोतिया, दिलीप थोरात यांच्यासह सफाई कामगारांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. सफाई कामगारांसाठी आजपर्यंत किती घरे बांधून दिली. या प्रश्नाचे उत्तर पालिका आयुक्त देऊ शकले नाही. यावेळी पालिकेच्या विविध योजनेचा बुरखा आयोगाने फाडला.महापालिकेच्या लोकसंख्येनुसार २५०० पेक्षा अधिक सफाई कामगार हवेत. मात्र प्रत्यक्षात १२५० सफाई कामगार आहेत. १५ वर्षापासून ३०५ कंत्राटी कामगारांना पालिका सेवेत नियमित करण्याचे न्यायालयासह राज्य सरकारचे आदेश असताना त्यांना पालिका सेवेत घेतलेले नाही. याबाबत आयोगाने नाराजी व्यक्त केली. तसेच पदोन्नतीचा प्रश्न अनेक वर्षापासून धूळखात आहे. सफाई कामगारांच्या विकासासाठी अंदाजपत्रकाच्या ५ टक्के रक्कम राखीव ठेवण्याचा नियम आहे. मात्र ४० वर्षाच्या इतिहासात सफाई कामगारांसाठी एकही योजना राबवली नाही. तसेच कायमस्वरूपी मालकीचे घर दिले नाही, असे पवार यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारकडून सफाई कामगारांसाठी विविध योजनेद्बारे अनुदान येते. मात्र किती अनुदान त्यांच्यासाठी खर्च झाले, किती परत गेले याचे आॅडिट होत नाही. त्याचे विशेष आॅडिट करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. १० वर्ष बंद पडलेला सफाई आयोग पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केल्याची महिती त्यांनी दिली. सफाई कामगारांसाठी राबवत असलेल्या योजना, अधिकारी राबवत नसल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. मात्र आता पर्यंत एकही कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले.