शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या प्रभाग प्रारूप यादीचा पत्ताच नाही

By admin | Updated: June 28, 2017 03:16 IST

मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश असताना अद्याप महापालिकेने मतदारांची प्रारुप यादीच प्रसिध्द केली नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेने प्रारुप यादीच प्रसिध्द न केल्याने त्यावर हरकती, सूचना घेण्याची मुदत कमी होणार आहे. मीरा- भार्इंदर महापालिकेची निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १३ जून रोजी प्रसिध्द झालेल्या विधानसभा मतदारयादीचा वापर महापालिका निवडणुकीसाठी करण्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. आयोगाने दोन जून रोजी आदेश काढून ५ जानेवारी ते १३ जून दरम्यान मतदारनोंदणी अधिकारी यांनी दाखल केलेली नवीन नावे व दुरुस्त्या महापालिकेने प्राप्त करून मतदारांचे प्रभागानुसार विभाजन करण्यास आयोगाने सांगितले हते. मीरा- भार्इंदर महापालिकेला प्रभाग निहाय प्रारूप यादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्यास सांगितले होते. तर ७ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यावर २५ जून ते १ जुलैपर्यंत हरकती व सूचना द्यायच्या आहेत. हरकती वा सूचनांमध्ये केवळ लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदारांचा चुकून झालेला समावेश तसेच विधानसभा मतदारयादीत नाव असताना प्रभागाच्या यादीत वगळले असल्यास त्याचा समावेश करुन घेणे या दुरुस्त्या करता येणार आहेत. मुदत उलटून दोन दिवस उलटले तरी मीरा- भार्इंदर महापालिकेने अद्यापही प्रारूप यादीच जाहीर केलेली नाही. वास्तविक महापालिकेने आयोगाच्या आदेशानुसार २५ जून रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय व अन्य कार्यालयांमधील सूचनाफलकांवर तसेच पालिकेचे संकेतस्थळ, वृत्तपत्र व केबलवाहिनीवर प्रसिध्द करणे आवश्यक होते. पण २६ जून होऊनही अजून महापालिकेने प्रारूप यादीच प्रसिध्द केलेली नाही. पालिकेच्या या सावळ्यागोंधळामुळे निवडणूक आयोगाचे आदेश केराच्या टोपलीत गेले आहेत. शिवाय मतदारयादीबाबत हरकती, सूचना घेण्याची मुदत १ जुलै पर्यंत असली तरी यादीच प्रसिध्द न झाल्याने प्रारूपयादीत नव्याने दाखल नावे, दुरूस्त्या यांची काटेकोर छाननी करण्यास इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांना कमी दिवस मिळणार आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सुमारे ५० हजार नवीन नावे मतदारयादीत नोंदवण्यात आली आहेत.