शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

मतदारांच्या प्रभाग प्रारूप यादीचा पत्ताच नाही

By admin | Updated: June 28, 2017 03:16 IST

मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश असताना अद्याप महापालिकेने मतदारांची प्रारुप यादीच प्रसिध्द केली नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेने प्रारुप यादीच प्रसिध्द न केल्याने त्यावर हरकती, सूचना घेण्याची मुदत कमी होणार आहे. मीरा- भार्इंदर महापालिकेची निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १३ जून रोजी प्रसिध्द झालेल्या विधानसभा मतदारयादीचा वापर महापालिका निवडणुकीसाठी करण्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. आयोगाने दोन जून रोजी आदेश काढून ५ जानेवारी ते १३ जून दरम्यान मतदारनोंदणी अधिकारी यांनी दाखल केलेली नवीन नावे व दुरुस्त्या महापालिकेने प्राप्त करून मतदारांचे प्रभागानुसार विभाजन करण्यास आयोगाने सांगितले हते. मीरा- भार्इंदर महापालिकेला प्रभाग निहाय प्रारूप यादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्यास सांगितले होते. तर ७ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यावर २५ जून ते १ जुलैपर्यंत हरकती व सूचना द्यायच्या आहेत. हरकती वा सूचनांमध्ये केवळ लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदारांचा चुकून झालेला समावेश तसेच विधानसभा मतदारयादीत नाव असताना प्रभागाच्या यादीत वगळले असल्यास त्याचा समावेश करुन घेणे या दुरुस्त्या करता येणार आहेत. मुदत उलटून दोन दिवस उलटले तरी मीरा- भार्इंदर महापालिकेने अद्यापही प्रारूप यादीच जाहीर केलेली नाही. वास्तविक महापालिकेने आयोगाच्या आदेशानुसार २५ जून रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय व अन्य कार्यालयांमधील सूचनाफलकांवर तसेच पालिकेचे संकेतस्थळ, वृत्तपत्र व केबलवाहिनीवर प्रसिध्द करणे आवश्यक होते. पण २६ जून होऊनही अजून महापालिकेने प्रारूप यादीच प्रसिध्द केलेली नाही. पालिकेच्या या सावळ्यागोंधळामुळे निवडणूक आयोगाचे आदेश केराच्या टोपलीत गेले आहेत. शिवाय मतदारयादीबाबत हरकती, सूचना घेण्याची मुदत १ जुलै पर्यंत असली तरी यादीच प्रसिध्द न झाल्याने प्रारूपयादीत नव्याने दाखल नावे, दुरूस्त्या यांची काटेकोर छाननी करण्यास इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांना कमी दिवस मिळणार आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सुमारे ५० हजार नवीन नावे मतदारयादीत नोंदवण्यात आली आहेत.