शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

तालुक्यांना होतोय कमी अन्नधान्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:47 IST

ठाणे : शहापूर तालुक्यात अंत्योदय २९ हजार व प्राधान्य २७ हजार असे ५६ हजार रेशनिंग कार्डधारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय ...

ठाणे : शहापूर तालुक्यात अंत्योदय २९ हजार व प्राधान्य २७ हजार असे ५६ हजार रेशनिंग कार्डधारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय कार्डधारकांना २५ कि.तांदूळ, १० कि. गहू तर प्राधान्यधारकांना प्रतिव्यक्ती ३ कि.तांदूळ, २ कि. गहू शासनाकडून वितरण करण्यात येतो.

या अंत्योदय कार्डधारकांना ऑनलाइन पावती दिली जात नाही. धान्य देताना २५ किलो लिहिले जाते. परंतु, प्रत्यक्षात २३ किलो तांदूळ व गहूची कपात दाखवून ५ ते ६ किलो दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एका लाभार्थ्यांमागे दोन ते चार किलो ते तांदूळ- गहू उरवून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते असे श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी म्हटले आहे. नंग दुकानदार बहुतांश गहू हा जिल्ह्यातील आटामिल व्यापाऱ्यांसह अन्य लोकांना विकतात. रेशन दुकानदार खानावळीवाले, तबेलेचालकांना ते वीस ते बावीस रुपये किलोने विकत असल्याचे वास्तव ऐकवले जात आहे.

..........

भिवंडी तालुक्यातील धान्य शिधावाटप दुकानातून घेतल्यानंतर त्याची विक्री व्यापाऱ्यांना केली जाते. हे स्थानिक व्यापारी नागरिकांकडून शिधावाटप दुकानातून मिळालेला गहू आठ रुपये किलो तर तांदूळ दहा ते बारा रुपये किलो दराने खरेदी करतात. त्यानंतर ते मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. हे धान्य स्थानिक व्यापारी भातगिरणीत तांदूळ पॉलिश करून तो २५ ते ३० रुपये किलो दराने घाऊक बाजारात विकतात. तर शिधावाटप दुकानातून आणलेला गहू साफ करून निवडून तोच गहू बाजारात १२ ते १५ रुपये किलो दराने विकतात. पीठ गिरणीत दळून गहू व तांदळाचे पीठ २० ते २२ रुपये किलो दराने विकले जात आहे.

........

प्रतिक्रिया -

लाभार्थ्यांनी दुकानातून घेतलेले अन्नधान्य त्याने स्वत:साठीच वापरायला पाहिजे; पण काही व्यसनी व जुगारी लोक या अन्नधान्याला काळ्या बाजारात विकून पैसे मिळवत असल्याचे ऐकायला आले आहे; पण त्यांनी घेतलेल्या अन्नधान्याला अन्यत्र विकू नये, अशी जनजागृती सामाजिक संघटनांनी करणे आवश्यक आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा उद्देश सफल झाला पाहिजे.

- राजू थोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे

--