शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या जनसुनावणीस ठाणेकरांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

ठाणे : मुंबई-नागपूर (बुलेट ट्रेन) हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दृष्टीने पर्यावरण आणि सामाजिक या विषयावर जनमत व सार्वजनिक सल्ला मसलतीची ...

ठाणे : मुंबई-नागपूर (बुलेट ट्रेन) हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दृष्टीने पर्यावरण आणि सामाजिक या विषयावर जनमत व सार्वजनिक सल्ला मसलतीची बैठक शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडली. जिल्ह्यातील ५६ गावे या प्रकल्पाने बाधित होत आहेत. त्यास अनुसरून नागरिकांची मते जाणून घेऊन ही सुनावणी पार पडली. मात्र, यावेळी फारच कमी जिल्हावासीयांनी उपस्थित दर्शविली. अनेकांनी दांडी मारल्याने सभागृह रिकामे होते.

या स्पीड रेल्वे प्रकल्पाने जिल्ह्यातील ५६ गाव या बाधित होणार आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील २८ गावे, कल्याण तालुक्यातील सात आणि भिवंडी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. या गावांतील भूमिपुत्र, शेतकरी, गावकऱ्यांपर्यंत जिल्ह्यातील पर्यावरण व सामाजिक विषयावर काम करणाऱ्या संस्था, तसेच तज्ज्ञ, जागरूक नागरिक आदींना या सुनावणीला उपस्थित राहणे आवश्यक होते, पण यावेळी फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. केवळ जिल्ह्याभरातून आठ ते नऊ जणच उपस्थित होते. उपस्थिती कमी असल्याने बैठक सुरू होण्यास दुपारचे तीन वाजले.

या बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वीच कल्याणच्या फळेगाव येथील चार ते पाच जागरूक भूमिपूत्र, गावकरी निघून गेले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांना बैठक पुढे ढकलण्यात यावी, याबाबत निवेदन दिले. त्यांनी निवेदन स्वीकारले, पण बैठक पुढे ढकलण्यात येणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते, असे येथील उपस्थितांपैकी गिरीश साळगांवकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील उपस्थित बाधित गावातील भूमिपुत्र, शेतकरी, गावकरी, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्ते याच्या सर्वाच्या वतीने सविस्तर सर्व मुद्दे बैठकीत उपस्थित करण्यात आले.

हा स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित सुरू करण्यापूर्वी (डीपीआर) डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. या विवाद क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते, स्थानिक भूमिपुत्रांच्या सल्लामसलतीची नितांत आवश्यकता आहे. ही उणीव राहू नये व भविष्यातील संघर्ष टाळावा, या उद्देशाने बैठक पुढे ढकलण्यात यावी व व्यापक स्वरूपात जनजागृती करावी, ही तोंडी व लेखी विनंती कोळीवाडे गावठाण सेवा समिती व‌ ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने साळगांवकर यांनी केली, पण त्यानंतरही सुनावणी रद्द केली नाही, असे त्यांनी सांगितले.