शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या जनसुनावणीस ठाणेकरांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

ठाणे : मुंबई-नागपूर (बुलेट ट्रेन) हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दृष्टीने पर्यावरण आणि सामाजिक या विषयावर जनमत व सार्वजनिक सल्ला मसलतीची ...

ठाणे : मुंबई-नागपूर (बुलेट ट्रेन) हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दृष्टीने पर्यावरण आणि सामाजिक या विषयावर जनमत व सार्वजनिक सल्ला मसलतीची बैठक शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडली. जिल्ह्यातील ५६ गावे या प्रकल्पाने बाधित होत आहेत. त्यास अनुसरून नागरिकांची मते जाणून घेऊन ही सुनावणी पार पडली. मात्र, यावेळी फारच कमी जिल्हावासीयांनी उपस्थित दर्शविली. अनेकांनी दांडी मारल्याने सभागृह रिकामे होते.

या स्पीड रेल्वे प्रकल्पाने जिल्ह्यातील ५६ गाव या बाधित होणार आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील २८ गावे, कल्याण तालुक्यातील सात आणि भिवंडी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. या गावांतील भूमिपुत्र, शेतकरी, गावकऱ्यांपर्यंत जिल्ह्यातील पर्यावरण व सामाजिक विषयावर काम करणाऱ्या संस्था, तसेच तज्ज्ञ, जागरूक नागरिक आदींना या सुनावणीला उपस्थित राहणे आवश्यक होते, पण यावेळी फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. केवळ जिल्ह्याभरातून आठ ते नऊ जणच उपस्थित होते. उपस्थिती कमी असल्याने बैठक सुरू होण्यास दुपारचे तीन वाजले.

या बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वीच कल्याणच्या फळेगाव येथील चार ते पाच जागरूक भूमिपूत्र, गावकरी निघून गेले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांना बैठक पुढे ढकलण्यात यावी, याबाबत निवेदन दिले. त्यांनी निवेदन स्वीकारले, पण बैठक पुढे ढकलण्यात येणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते, असे येथील उपस्थितांपैकी गिरीश साळगांवकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील उपस्थित बाधित गावातील भूमिपुत्र, शेतकरी, गावकरी, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्ते याच्या सर्वाच्या वतीने सविस्तर सर्व मुद्दे बैठकीत उपस्थित करण्यात आले.

हा स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित सुरू करण्यापूर्वी (डीपीआर) डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. या विवाद क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते, स्थानिक भूमिपुत्रांच्या सल्लामसलतीची नितांत आवश्यकता आहे. ही उणीव राहू नये व भविष्यातील संघर्ष टाळावा, या उद्देशाने बैठक पुढे ढकलण्यात यावी व व्यापक स्वरूपात जनजागृती करावी, ही तोंडी व लेखी विनंती कोळीवाडे गावठाण सेवा समिती व‌ ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने साळगांवकर यांनी केली, पण त्यानंतरही सुनावणी रद्द केली नाही, असे त्यांनी सांगितले.