शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

ठाणे: मेट्रो मार्गांचं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने केलं सर्वेक्षण

By admin | Updated: April 8, 2017 18:04 IST

एमएमआर प्रदेशातील वेगवान वाहतुकीसाठी रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता असून मोटागाव-माणकोली खाडी पूल

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 8 - एमएमआर प्रदेशातील वेगवान वाहतुकीसाठी रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता असून मोटागाव-माणकोली खाडी पूल तसेच, दुर्गाडी खाडी पुलाच्या मार्गातील अडचणी तातडीने दूर करून या कामांना गती द्यावी लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भिवंडी येथे माणकोली पुलाच्या उद्घाटनप्रसंगी केले. वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम देखील तातडीने पूर्ण करण्याकरता नॅशनल हायवे ऑथॉरिटीसोबत बैठक आयोजित करण्याची विनंती श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यावर, हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता सरकार प्रयत्नशील असून पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनांनुसार  तातडीने पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले. 
 
एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या माणकोली पुलाच्या उजव्या बाजूच्या मार्गिकेचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री श्री. शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील,आमदार शांताराम मोरे, किसान कथोरे,गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, महेश चौघुले, ‘एमएमआरडीए’चे आयुक्त यू पी एस मदान आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.  
 
मोटागाव-माणकोली खाडीपुलासाठी अधिग्रहित करावी लागणारी जमीन सीआरझेडमध्ये असून त्यामुळे नुकसान भरपाईच्या संदर्भात अडचणी निर्मात होत असल्याकडे श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. डोंबिवलीहून ठाणे अथवा मुंबईला थेट जाण्यासाठी हा पुल अत्यंत गरजेचा असून त्यामुळे या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक लावण्यात यावी, असे श्री. शिंदे म्हणाले. तसेच, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोमध्ये कल्याण पश्चिमेचा भाग रिक्त राहात असून संपूर्ण कल्याण शहराचा मेट्रोमध्ये समावेश व्हावा, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण एमएमआर क्षेत्रासाठी मेट्रोचे सादरीकरण केले होते. त्यानुसार या मेट्रोमार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही आपण एमएमआरडीएला दिले होते, अशी आठवणही श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी करून दिली.
 
यावर बोलताना दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला यासंदर्भात आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.