शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

ठाणे: मेट्रो मार्गांचं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने केलं सर्वेक्षण

By admin | Updated: April 8, 2017 18:04 IST

एमएमआर प्रदेशातील वेगवान वाहतुकीसाठी रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता असून मोटागाव-माणकोली खाडी पूल

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 8 - एमएमआर प्रदेशातील वेगवान वाहतुकीसाठी रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता असून मोटागाव-माणकोली खाडी पूल तसेच, दुर्गाडी खाडी पुलाच्या मार्गातील अडचणी तातडीने दूर करून या कामांना गती द्यावी लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भिवंडी येथे माणकोली पुलाच्या उद्घाटनप्रसंगी केले. वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम देखील तातडीने पूर्ण करण्याकरता नॅशनल हायवे ऑथॉरिटीसोबत बैठक आयोजित करण्याची विनंती श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यावर, हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता सरकार प्रयत्नशील असून पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनांनुसार  तातडीने पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले. 
 
एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या माणकोली पुलाच्या उजव्या बाजूच्या मार्गिकेचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री श्री. शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील,आमदार शांताराम मोरे, किसान कथोरे,गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, महेश चौघुले, ‘एमएमआरडीए’चे आयुक्त यू पी एस मदान आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.  
 
मोटागाव-माणकोली खाडीपुलासाठी अधिग्रहित करावी लागणारी जमीन सीआरझेडमध्ये असून त्यामुळे नुकसान भरपाईच्या संदर्भात अडचणी निर्मात होत असल्याकडे श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. डोंबिवलीहून ठाणे अथवा मुंबईला थेट जाण्यासाठी हा पुल अत्यंत गरजेचा असून त्यामुळे या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक लावण्यात यावी, असे श्री. शिंदे म्हणाले. तसेच, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोमध्ये कल्याण पश्चिमेचा भाग रिक्त राहात असून संपूर्ण कल्याण शहराचा मेट्रोमध्ये समावेश व्हावा, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण एमएमआर क्षेत्रासाठी मेट्रोचे सादरीकरण केले होते. त्यानुसार या मेट्रोमार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही आपण एमएमआरडीएला दिले होते, अशी आठवणही श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी करून दिली.
 
यावर बोलताना दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला यासंदर्भात आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.