शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

ठाण्याला लॉकडाऊनचीच गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने नियमावली तयार केलेली आहे. परंतु त्याला हरताळ फासला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने नियमावली तयार केलेली आहे. परंतु त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत आजही गर्दी दिसत आहे. रिक्षांमध्ये दोनच प्रवासी घेण्याचा नियम असतानाही तीन ते पाच प्रवासी बसवले जात आहेत. परिवहनच्या बसमध्येही नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातल्या त्यात हॉटेलचालक मात्र रात्री साडेअकरा वाजता शटर डाऊन करुन पालिकेला सहकार्य करत असल्याचे दिसत आहे. परंतु येऊर, घोडबंदर भागातील ढाबे रात्री एक ते दोनपर्यंत सुरू असल्याची बाब समोर आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता ठाण्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिका हद्दीत मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसून आले आहेत. या रुग्णांसाठी पालिकेने कोविड सेंटरमध्ये ४ हजार २२१ बेड आरक्षित केले आहेत. त्यानुसार मागील १९ दिवसांत शहरात ५ हजार ८८० रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत शहरात ३०० ते ५०० रुग्ण दिवसाला आढळून येत असल्याने पालिकेची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेने निर्बंध आणखी कडक करण्यास सुरुवात केली आहे. ठाणेकरांना मात्र याची तमाच नसल्याचे पाहणीत दिसून आले. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. रिक्षातून दोनच प्रवासी नेण्याचे बंधन असताना तीन प्रवासी घेऊन जातात, तर शेअर रिक्षांवर जास्तीचे प्रवासी नेल्यास कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या रिक्षांमध्ये चार ते पाच प्रवासी आजही वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत नेले जात आहेत. दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून एका सीटवर एक प्रवासी असे स्पष्ट करण्यात आले असतानाही बस भरून जाताना दिसतात. त्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

...............

घोडबंदर, येऊरला मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरु

हॉटेल व्यावसायिक मात्र महापालिकेने रात्री साडेअकराच्या आधी शटर डाऊन करतात. परंतु येऊर किंवा घोडबंदर भागातील ढाबे, पब रात्री एक ते दोनपर्यंत राजरोस सुरू असून, त्याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. त्यातही अनेक मोठ्या गृहसंकुलांच्या ठिकाणी सकाळ किंवा सायंकाळच्या सत्रात फेरफटका करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून ते तोंडाला मास्क लावताना दिसत नाहीत. एकूणच परिस्थिती पाहता ठाण्यात लॉकडाऊनचीच गरज असल्याचे दिसत आहे.