शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याला लॉकडाऊनचीच गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने नियमावली तयार केलेली आहे. परंतु त्याला हरताळ फासला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने नियमावली तयार केलेली आहे. परंतु त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत आजही गर्दी दिसत आहे. रिक्षांमध्ये दोनच प्रवासी घेण्याचा नियम असतानाही तीन ते पाच प्रवासी बसवले जात आहेत. परिवहनच्या बसमध्येही नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातल्या त्यात हॉटेलचालक मात्र रात्री साडेअकरा वाजता शटर डाऊन करुन पालिकेला सहकार्य करत असल्याचे दिसत आहे. परंतु येऊर, घोडबंदर भागातील ढाबे रात्री एक ते दोनपर्यंत सुरू असल्याची बाब समोर आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता ठाण्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिका हद्दीत मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसून आले आहेत. या रुग्णांसाठी पालिकेने कोविड सेंटरमध्ये ४ हजार २२१ बेड आरक्षित केले आहेत. त्यानुसार मागील १९ दिवसांत शहरात ५ हजार ८८० रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत शहरात ३०० ते ५०० रुग्ण दिवसाला आढळून येत असल्याने पालिकेची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेने निर्बंध आणखी कडक करण्यास सुरुवात केली आहे. ठाणेकरांना मात्र याची तमाच नसल्याचे पाहणीत दिसून आले. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. रिक्षातून दोनच प्रवासी नेण्याचे बंधन असताना तीन प्रवासी घेऊन जातात, तर शेअर रिक्षांवर जास्तीचे प्रवासी नेल्यास कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या रिक्षांमध्ये चार ते पाच प्रवासी आजही वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत नेले जात आहेत. दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून एका सीटवर एक प्रवासी असे स्पष्ट करण्यात आले असतानाही बस भरून जाताना दिसतात. त्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

...............

घोडबंदर, येऊरला मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरु

हॉटेल व्यावसायिक मात्र महापालिकेने रात्री साडेअकराच्या आधी शटर डाऊन करतात. परंतु येऊर किंवा घोडबंदर भागातील ढाबे, पब रात्री एक ते दोनपर्यंत राजरोस सुरू असून, त्याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. त्यातही अनेक मोठ्या गृहसंकुलांच्या ठिकाणी सकाळ किंवा सायंकाळच्या सत्रात फेरफटका करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून ते तोंडाला मास्क लावताना दिसत नाहीत. एकूणच परिस्थिती पाहता ठाण्यात लॉकडाऊनचीच गरज असल्याचे दिसत आहे.