शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

ठाणे महापालिकेतील टक्केवारीची गोष्ट न संपणारी!

By admin | Updated: November 16, 2015 02:12 IST

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर आता ठाणे महापालिकेतील अनेक नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर आता ठाणे महापालिकेतील अनेक नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामध्ये टप्प्याटप्प्याने नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरु केल्याने, त्यांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वीही ठाणे महापालिकेच्या ४२ टक्के निधीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नगरसेवकांवर झाला होता. त्या चौकशीकरिता बसवलेल्या नंदलाल समितीचे भूत अद्यापही काही नगरसेवकांच्या मानगुटीवरुन हटलेले नाही. आता पुन्हा परमार आत्महत्येनंतर नगरसेवकांच्या मागे लागलेल्या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे ठाणे महापालिकेतील नगरसेवक अडचणीत सापडले आहेत. सर्वसामान्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. परंतु, या सर्वाला जबाबदार कोण, दोषी नगरसेवक? ठाणे महापालिकेची सिस्टीम? की निवडणुकीत खर्चलेला पैसा पुन्हा कमावण्याचा कुहेतू? असे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.७ आॅक्टोबरला सूरज परमार यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये चार नगरसेवकांची नावी पुढे आली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, कॉंग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचा समावेश आहे. परंतु, त्यांच्या बरोबरच आता पोलिसांनी इतर नगरसेवकांचीही चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे आता इतरांंकडेही त्याच नजरेने बघण्याचा दृष्टीकोन होऊ लागला आहे. या महिन्यात झालेल्या महासभेत काही नगरसेवकांनी हा मुद्दा खोडून काढताना एक-दोघांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सर्वांना कशाला असा सवाल केला. प्रशासनही यात तितकेच दोषी असल्याचा आरोप केला. हाताची पाचही बोटे सारखी नसतात, त्यानुसार चार नगरसेवक तसे असले तर इतरही तसेच असतील असे नाही, असे पटवून देण्याची धडपड काही नगरसेवकांनी केली. ठाणे महापालिका आणि नगरसेवकांची नावे घोटाळ्यात येणे ही नवीन बाब नाही. महापालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत अनेक घोटाळे झाले, काही उघडकीस आले तर काही थातूरमातूर चौकशीच्या नावाने बासनात गुंडाळले गेले. यापूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनीच महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत ४२ टक्के घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणाची चौकशीही लावली होती. त्यानंतर १८ नगरसेवकांवर नंदलाल समितीने ठपका ठेवला. यातील काहींची चौकशी आजही सुरुच आहे. याचा अर्थ गेल्या २० वर्षांहून अधिक काळ ठाणे महापालिकेतील नगरसेवक, प्रशासन यांच्या कारभाराची ओळख टक्केवारीमुळेच ठाणेकरांना होत आली आहे. त्या परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही. गेल्या काही वर्षांत ठाणे महापालिकेत गाजलेला पाईप घोटाळा, शिक्षण मंडळ घोटाळा, कर्मचारी भरती घोटाळा, परिवहन मधील डिझेल घोटाळा, आदींसह इतर काही महत्वाच्या घोटाळ्यांमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांसह नगरसेवकांवर दोषारोप ठेवले आहेत. परिवहन घोटाळ्यात तर सहा नगरसेवकांना शिक्षाही ठोठावली गेली. गेल्या कित्येक वर्षापासून असे प्रकार घडत आहेत. २०१२ नंतर तर ठाणे महापालिकेतील टक्केवारीच्या राजकारणाला संघटीत गुन्हेगारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कारण गोल्डन गँग नावाने काही नगरसेवकांची टोळीच यात सक्रीय झाली असून टक्केवारीची सर्व कामे या गँगच्या माध्यमातून सुरु असल्याची चर्चा आहे. एखादा विषय हाताळायचा झाला तर तो कशा पद्धतीने हाताळायचा यावर हीच टोळी अधिक लक्ष ठेवून असते. इतर नगरसेवकांच्या हाती काही लागत नसल्याने त्यांनी ही नाराजीही जाहीरपणे बोलून दाखविली. किंबहुना संपूर्ण पालिकेचा कारभारच या गोल्डन गँगच्या माध्यमातून होतो.