शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

ठाणे महापालिकेची तिजोरी रितीच (जोड बातमी आहे )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

ठाणे महापालिकेकडून दरमहिना विविध बाबींसाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. यामध्ये पाणी खरेदी, घंटागाडी योजना, रस्ते साफसफाई, सुरक्षारक्षक, ...

ठाणे महापालिकेकडून दरमहिना विविध बाबींसाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. यामध्ये पाणी खरेदी, घंटागाडी योजना, रस्ते साफसफाई, सुरक्षारक्षक, शिक्षण विभाग, इंधन खर्च, विजेचा खर्च, स्मशानभूमी, कळवा रुग्णालय साफसफाई, कर्ज परतफेड आदींसह इतर खर्च धरुन दरमहिना पालिकेकडून ३२ कोटींच्यावर निधी खर्च होत आहे.

जीएसटीच्या अनुदानावर कर्मचाऱ्यांचा पगार

ठाणे महापालिकेच्या विविध विभागांवर ३२ कोटींचा खर्च होत असताना, दुसरीकडे शासनाकडून पालिकेला दरमहा ७५ कोटींचे जीएसटीचे अनुदान प्राप्त होत आहे. त्यातूनच पालिका कर्मचाऱ्यांचा पगार दिला जात असल्याचे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

८०० कोटींची बिले द्यायची कशी?

ठाणे महापालिकेवर सध्याच्या घडीला ३२०० कोटींच्यावर दायित्व आहे. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून २०१८ पासून शहरात विविध स्वरुपाची कामे करण्यात आली आहेत. परंतु त्याची बिले काढण्यासाठी पालिकेकडे पैसा शिल्लक नाही. पालिकेच्या माध्यमातून २०१८-१९ मध्ये केलेल्या कामांची १०० टक्के बिले अदा केल्याचा दावा करण्यात आला आहे. २०१९-२० मध्ये केलेल्या कामांची २५ टक्के याप्रमाणे बिले काढली जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु एवढे करून पालिकेला ८०० कोटींची बिले अदा करायची असल्याची माहिती समोर आली आहे.