शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन, तंत्रज्ञानासह ढिसाळ कामगिरीमुळे ठाणे, केडीएमसी,वसईची घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निवासासाठी उत्तम असलेल्या देशभरातील १० लाखांपेक्षा जास्त वस्तीच्या शहरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : निवासासाठी उत्तम असलेल्या देशभरातील १० लाखांपेक्षा जास्त वस्तीच्या शहरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीने बाजी मारली आहे. मात्र, केंद्रीय नागरी व्यवहार आणि गृह मंत्रालयाने यासाठी आखून दिलेल्या निकषांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवलीने प्रामुख्याने तंत्रज्ञान, शहर नियोजन आणि एकंदरीत महापालिकेचे कामकाज, नागरिकांना दिल्या जणार्या सुविधा यात मार खाल्ला आहे. महापालिकेच्या आर्थिक कमकुवततेचाही फटका कल्याण-डोंबिवलीला बसला आहे.वसई-विरार महापालिकेची याच निकषांत घसरगुंडी झाली आहे.

या यादीत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबईने बाजी मारली असून, पुण्यानंतर ते राज्यातील पहिल्या दहा शहरांमध्ये एकमेव शहर आहे. या यादीत पुणे दुसऱ्या तर नवी मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. ठाणे ११व्या आणि कल्याण-डोंबिवली १२व्या स्थानावर आहे. कल्याण-डोंबिवलीची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा सुधारली आहे. नवी मुंबईसह ठाणे शहराचा दर्जा गेल्या वर्षापेक्षा यंदा घसरल्याने दोन्ही महापालिकांच्या प्रशासनाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.तंत्रज्ञानात मार खाल्ल्याने स्मार्ट सिटीत भाग घेतलेल्या या सर्व शहरांनी चांगलीच घसरगुंडी झाली आहे. जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी या महानगरांची लोकसंख्या १० लाखांपेक्षा कमी असल्याने त्यांचा विचार यात केंद्राने केलेला नाही.

ठाणे

निकष गुण क्रमांक

राहण्यायोग्य शहर ५८.१६ ११

नागरिकांची आर्थिक क्षमता ४०.५२ ५

नागरिकांचा दृष्टिकोन ७२.८० ३७

जीवनमानाचा दर्जा ५५.०४ १६

शाश्वत ५४.०४ ३०

महापालिकेची कामगिरी ४७.०४ २५

महापालिकेची आर्थिक स्थिती ५०.६२ ३३

नियोजन ३९.१६ २३

सेवा ५९.६५ १६

तंत्रज्ञान २१.७६ ३८

प्रशासन ४९.४४ २०

...................

कल्याण-डोंबिवली

निकष गुण क्रमांक

राहण्यायोग्य शहर ५७.७१ १२

नागिरकांची आर्थिक क्षमता १९.८९ १७

नागरिकांचा दृष्टिकोन ७७.६० २१

जीवनमानाचा दर्जा ५७.८० ९

शाश्वत ५६.११ २५

महापालिकेची कामगिरी ४६.३६ २६

महापालिकेची आर्थिक स्थिती ४८.४७ ३८

नियोजन २९.१९ २३

सेवा ५९.६५ ३७

तंत्रज्ञान २५.८० २८

प्रशासन ५८.२५ ८

.................................................................................

वसई-विरार

निकष गुण क्रमांक

राहण्यायोग्य शहर ५१.२६ ३९

नागिरकांची आर्थिक क्षमता १०.८९ ३१

नागरिकांचा दृष्टिकोन ७२.६० ३८

जीवनमानाचा दर्जा ५१.८४ २८

शाश्वत ४८.५३ ४५

महापालिकेची कामगिरी ४०.८६ ४१

महापालिकेची आर्थिक स्थिती ५०.८८ ३२

नियोजन ३१.७९ ३५

सेवा ४५.३२ ४६

तंत्रज्ञान २२.०४ ३७

प्रशासन ४५.०६ २८