शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

ठाण्यात १० वी, १२ वीच्या वगळता ५० टक्के शिक्षकांनीच जायचे शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

ठाणे - कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे ठाणे, मुंबईतील शाळा तर सुरू झालेल्या ...

ठाणे - कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे ठाणे, मुंबईतील शाळा तर सुरू झालेल्या नाहीत. मात्र, शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलेले असून, त्यानुसार १ ली ते ९ वीच्या आणि ११ वीच्या ५० टक्के शिक्षकांनी उपस्थित रहावे. तर, १० वी आणि १२ वीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे स्पष्ट केलेले आहे.

राज्यभरातील विविध जिल्हे, शहरे ही कोरोना निर्बंधांच्या विविध टप्प्यांत येतात. त्यामुळे सगळीकडचे शहरे अनलॉक होण्याचे नियम वेगळे. राज्यभरातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या. शाळांत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी एक पत्र काढले. तर, जिल्हानिहाय शिक्षणाधिकाऱ्यांनीही वेगळी पत्रके काढली, त्यामुळे राज्यात काही ठिकाणच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ठाण्यातही शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या १ ली ते ९ वीच्या आणि इयत्ता ११ वीच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. तर, १० वी आणि १२ वीच्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे ठाण्यातील शिक्षकांमध्ये या पत्रांवरून फारसा संभ्रम दिसला नाही.

----------------

शिक्षण संचालकांचे पत्र काय?

शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची शाळेत ५० टक्के उपस्थिती असेल. तर, १० वी आणि १२ वीचे काम पाहणारे शिक्षक यांना १०० टक्के उपस्थिती राहील. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचीही उपस्थिती १०० टक्के असेल.

-------------

ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानुसारही त्यांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के तर १० वी, १२ वीचे काम पाहणारे शिक्षक यांना १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तर, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनाही १०० टक्के उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

------------

आम्हाला शाळेत उपस्थित राहण्याबाबत कोणतीही अडचण नाही. संचालकांच्या पत्रानुसारच शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र असल्याने संभ्रम नव्हता. फक्त प्रवास करणे अवघड जाते, असे काही शिक्षकांनी सांगितले.

-----------

शाळेत उपस्थितीबाबतच्या पत्रांचा गोंधळ ठाण्यात नव्हता. मात्र, काही शाळांमध्ये वरिष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभारही आहे. मग अशा शिक्षकांना शिक्षक म्हणून की मुख्याध्यापक म्हणून उपस्थितीचा नियम लागू आहे, याबाबत संभ्रम आहे, अशी माहिती एका वरिष्ठ आणि सध्या मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या शिक्षिकेने दिली.

--------------

आपणही पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के तर १० वी, १२ वीचे काम पाहणाऱ्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. बाकी इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), ठाणे जिल्हा