शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १० वी, १२ वीच्या वगळता ५० टक्के शिक्षकांनीच जायचे शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

ठाणे - कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे ठाणे, मुंबईतील शाळा तर सुरू झालेल्या ...

ठाणे - कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे ठाणे, मुंबईतील शाळा तर सुरू झालेल्या नाहीत. मात्र, शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलेले असून, त्यानुसार १ ली ते ९ वीच्या आणि ११ वीच्या ५० टक्के शिक्षकांनी उपस्थित रहावे. तर, १० वी आणि १२ वीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे स्पष्ट केलेले आहे.

राज्यभरातील विविध जिल्हे, शहरे ही कोरोना निर्बंधांच्या विविध टप्प्यांत येतात. त्यामुळे सगळीकडचे शहरे अनलॉक होण्याचे नियम वेगळे. राज्यभरातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या. शाळांत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी एक पत्र काढले. तर, जिल्हानिहाय शिक्षणाधिकाऱ्यांनीही वेगळी पत्रके काढली, त्यामुळे राज्यात काही ठिकाणच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ठाण्यातही शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या १ ली ते ९ वीच्या आणि इयत्ता ११ वीच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. तर, १० वी आणि १२ वीच्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे ठाण्यातील शिक्षकांमध्ये या पत्रांवरून फारसा संभ्रम दिसला नाही.

----------------

शिक्षण संचालकांचे पत्र काय?

शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची शाळेत ५० टक्के उपस्थिती असेल. तर, १० वी आणि १२ वीचे काम पाहणारे शिक्षक यांना १०० टक्के उपस्थिती राहील. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचीही उपस्थिती १०० टक्के असेल.

-------------

ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानुसारही त्यांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के तर १० वी, १२ वीचे काम पाहणारे शिक्षक यांना १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तर, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनाही १०० टक्के उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

------------

आम्हाला शाळेत उपस्थित राहण्याबाबत कोणतीही अडचण नाही. संचालकांच्या पत्रानुसारच शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र असल्याने संभ्रम नव्हता. फक्त प्रवास करणे अवघड जाते, असे काही शिक्षकांनी सांगितले.

-----------

शाळेत उपस्थितीबाबतच्या पत्रांचा गोंधळ ठाण्यात नव्हता. मात्र, काही शाळांमध्ये वरिष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभारही आहे. मग अशा शिक्षकांना शिक्षक म्हणून की मुख्याध्यापक म्हणून उपस्थितीचा नियम लागू आहे, याबाबत संभ्रम आहे, अशी माहिती एका वरिष्ठ आणि सध्या मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या शिक्षिकेने दिली.

--------------

आपणही पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के तर १० वी, १२ वीचे काम पाहणाऱ्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. बाकी इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), ठाणे जिल्हा