शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

ठाण्यात १० वी, १२ वीच्या वगळता ५० टक्के शिक्षकांनीच जायचे शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

ठाणे - कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे ठाणे, मुंबईतील शाळा तर सुरू झालेल्या ...

ठाणे - कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे ठाणे, मुंबईतील शाळा तर सुरू झालेल्या नाहीत. मात्र, शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलेले असून, त्यानुसार १ ली ते ९ वीच्या आणि ११ वीच्या ५० टक्के शिक्षकांनी उपस्थित रहावे. तर, १० वी आणि १२ वीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे स्पष्ट केलेले आहे.

राज्यभरातील विविध जिल्हे, शहरे ही कोरोना निर्बंधांच्या विविध टप्प्यांत येतात. त्यामुळे सगळीकडचे शहरे अनलॉक होण्याचे नियम वेगळे. राज्यभरातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या. शाळांत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी एक पत्र काढले. तर, जिल्हानिहाय शिक्षणाधिकाऱ्यांनीही वेगळी पत्रके काढली, त्यामुळे राज्यात काही ठिकाणच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ठाण्यातही शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या १ ली ते ९ वीच्या आणि इयत्ता ११ वीच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. तर, १० वी आणि १२ वीच्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे ठाण्यातील शिक्षकांमध्ये या पत्रांवरून फारसा संभ्रम दिसला नाही.

----------------

शिक्षण संचालकांचे पत्र काय?

शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची शाळेत ५० टक्के उपस्थिती असेल. तर, १० वी आणि १२ वीचे काम पाहणारे शिक्षक यांना १०० टक्के उपस्थिती राहील. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचीही उपस्थिती १०० टक्के असेल.

-------------

ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानुसारही त्यांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के तर १० वी, १२ वीचे काम पाहणारे शिक्षक यांना १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तर, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनाही १०० टक्के उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

------------

आम्हाला शाळेत उपस्थित राहण्याबाबत कोणतीही अडचण नाही. संचालकांच्या पत्रानुसारच शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र असल्याने संभ्रम नव्हता. फक्त प्रवास करणे अवघड जाते, असे काही शिक्षकांनी सांगितले.

-----------

शाळेत उपस्थितीबाबतच्या पत्रांचा गोंधळ ठाण्यात नव्हता. मात्र, काही शाळांमध्ये वरिष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभारही आहे. मग अशा शिक्षकांना शिक्षक म्हणून की मुख्याध्यापक म्हणून उपस्थितीचा नियम लागू आहे, याबाबत संभ्रम आहे, अशी माहिती एका वरिष्ठ आणि सध्या मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या शिक्षिकेने दिली.

--------------

आपणही पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के तर १० वी, १२ वीचे काम पाहणाऱ्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. बाकी इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), ठाणे जिल्हा