शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात पावसाचे ३० बळी

By admin | Updated: September 12, 2016 03:11 IST

जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जोरदार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सरासरी २२६२.७१ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षी तो केवळ १५४४.७९ मिमी होता

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जोरदार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सरासरी २२६२.७१ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षी तो केवळ १५४४.७९ मिमी होता. यंदा संततधार सुरू असलेल्या पावसादरम्यान विविध कारणांनी सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला असून ८९ जणांचा जीव वाचवण्यात यश मिळाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाद्वारे केला जात आहे. सुमारे सरासरी ७१७.९२ मिमी जादा पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२.३५ टक्के पाऊस पडला. यात सर्वाधिक पाऊस ठाणे शहरात (११४.५९ टक्के) पडला आहे. जिल्ह्यातील ४० गावांना या पावसाचा जोरदार फटका बसला असून त्यांची झळ ३३४ ग्रामस्थांना बसली. यादरम्यान दगावलेल्या ३० जणांपैकी कल्याण तालुक्यातील तीन, अंबरनाथमधील सहा, एक शहापूर, भिवंडी इमारत दुर्घटनेसह या तालुक्यातील १९ आणि ठाणे शहरातील एकाचा या पावसाळ्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे. या पावसाळ्यात ३३ व्यक्ती जखमी झाल्या असून चार जण बेपत्ता आहेत. मुसळधार पावसाच्या कालावधीत १३ घरे पडली असून ९७ घरे बाधित झाली आहेत. तीन मोठमोठ्या बांधकामांना या पावसाची झळ बसली आहे.