शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

ठाण्याचा बिहार होतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:50 IST

ठाणे : कर्जाचा हप्ता थकविल्याने पत्नीला उचलून नेण्याची धमकी एका खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीने दिली. यावरून ठाण्यातील विविध संघटनांच्या ...

ठाणे : कर्जाचा हप्ता थकविल्याने पत्नीला उचलून नेण्याची धमकी एका खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीने दिली. यावरून ठाण्यातील विविध संघटनांच्या महिलांमधून निषेधाचा सूर व्यक्त होत आहे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, ठाण्याचे बिहार होत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अशी धमकी देणाऱ्यावर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.

दहा लाखांच्या व्यावसायिक कर्जाचा हप्ता थकविल्यामुळे व्यावसायिकेच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी मॅन्टिफी फायनान्स कंपनीच्या राज शुक्ला या प्रतिनिधीने दिली होती. यावरून पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहे. ही घटना दखलपात्र गुन्ह्याची असल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून त्या प्रतिनिधीला अटक करण्याची मागणी समस्थ महिलावर्गाकडून होत आहे. ही अत्यंत असंस्कृत आणि असभ्यपणाची लक्षणे आहे. महाराष्ट्राने स्त्रियांचा नेहमीच आदर केला आहे आणि अशी घटना महाराष्ट्रात घडत असेल तर त्या घटनेची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे, असे मतदेखील व्यक्त होत आहे.

---------------

हे अत्यंत असंस्कृत, असभ्य आणि विकृत लक्षण आहे. जर समोरची व्यक्ती हप्ते भरू शकत नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. त्या वित्तीय कंपनीसोबत झालेल्या करारात बायको उचलून नेऊ असे लिहिले आहे का? पत्नीला उचलून नेऊ हे बोलणे हे असभ्य आहे. हा सर्व फाजिलपणा आहे. वित्तीय कंपनीचा जो प्रतिनिधी असा बोलला आहे त्याच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा. पोलिसांनी योग्य कारवाई करून त्या प्रतिनिधीला अटक करावी. कायदेशीर कारवाई न करता कायदा हातात घेणे चुकीचे आहे.

- शारदा साठे, विश्वस्त,

पत्नीला उचलून नेऊ असे बोलणे हा मोठा गुन्हा आहे. मुळात आजची परिस्थिती पाहता कर्जाचा हप्ता भरण्याचा तगादा ती वित्तीय कंपनी लावू शकत नाही, तसे आदेशही आहेत. पत्नीला उचलून नेऊ असे म्हणणाऱ्याला अटक झालीच पाहिजे. ही तर माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आपण कोणत्या काळात आहोत ?

- वंदना शिंदे, सदस्य, भारतीय महिला फेडरेशन

अशी धमी देणे यावरून महाराष्ट्र मागे जातोय का? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र हे सुसंकृत राज्य आहे. चांगल्या गोष्टींची प्रथा महाराष्ट्राने पाडली आहे. आता महाराष्ट्राचा बिहार होतोय का? असे वाटत आहे. जर असे बोलू शकत तर त्यांची मानसिकता तशीच आहे. अशा लोकांवर कोणाचाही वचक किंवा धाक राहिलेला नाहीये.

- सुमीता दिघे, सामाजिक कार्यकर्त्या

आताच्या काळात अशी दिली जाणारी धमकी ऐकल्यावर विचित्र वाटत आहे. जुलूमशाही परत आली की काय असे वाटत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे.

- यामिनी पानगावकर, लेखिका