शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

ठाण्यात ६७ हजार रिक्षाचालकांचे अनुदानासाठी अद्याप अर्जच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:49 IST

ठाणे : राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांसाठी लॉकडाऊनच्या काळात सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासाठी काही तांत्रिक अडचणींपैकी आधारकार्डचीही एक ...

ठाणे : राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांसाठी लॉकडाऊनच्या काळात सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासाठी काही तांत्रिक अडचणींपैकी आधारकार्डचीही एक समस्या आहे. ठाण्यात ८४ हजार परवानाधारकांपैकी १७ हजार रिक्षाचालकांनी अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. इतरांना आधारकार्डची समस्या उद्भवू नये, यासाठी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दोन ठिकाणी तात्पुरते विशेष आधार केंद्र सुरू केले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक रिक्षाचालकांना शासनाकडून दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित केले आहे. अर्थात, असे असले तरी तांत्रिक तसेच इतर काही अडचणींमुळे ते मिळविण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. यात प्रामुख्याने आधारकार्डवरील नाव अथवा मोबाइल क्रमांक जोडणे ही एक मोठी समस्या आहे. त्यात काही महिला रिक्षाचालकांचे माहेरचे नाव आणि सासरच्या नावात अधिकृत बदल न झाल्यामुळे त्यांनाही काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काहींचे तर बँकेत खातेही नाही. ज्यांना आधारकार्डमुळे अनुदान मिळविण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्या त्या दूर होण्यासाठी ठाणे आरटीओ कार्यालयात आधार केंद्राला परवानगी मिळावी, अशी मागणी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांच्याकडे रिक्षाचालकांच्या काही संघटनांनी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील उपप्रादेशिक कार्यालयात ही तात्पुरती स्वरूपाची आधारकेंद्र ३ जूनपासून कार्यान्वित केली. ठाण्यात जिल्हा कारागृहासमोरील तसेच एलआयसी कार्यालयाजवळ असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या आवारातही ही आधारकेंद्र रिक्षाचालकांसाठी सुरू झाली आहेत. आता या केंद्रांवर आधारकार्ड काढून त्याद्वारे अनुदान मिळविण्यासाठी त्यांना सुलभ होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी दिली. ठाणे विभागांतर्गत ८४ हजार रिक्षांची अधिकृत नोंदणी आहे. त्यातील आतापर्यंत १७ हजार चालकांनी अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. इतरांनीही योग्य कागदपत्रे जोडून या अनुदानासाठी अर्ज करावेत. तसेच ज्यांच्याकडे आधारकार्डची समस्या असेल त्यांनी ठाण्यातील आरटीओ कार्यालयाच्या आवारातील आधारकेंद्रावर ती काढून घ्यावीत, असे आवाहनही आरटीओ कार्यालयाने केले आहे.