शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; शाहबाज सरकारने बनवले फील्ड मार्शल...
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
6
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
7
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
8
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
9
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
10
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
11
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
12
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
13
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
14
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
15
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
16
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
17
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
18
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
19
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
20
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

अंगणवाडी संघाचा जि.प.समोर थाळीनाद

By admin | Updated: December 24, 2015 01:30 IST

सातव्या वेतन आयोगाचा लाभ केवळ कायम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याने शासकीय सेवेत असूनही अंगणवाडी आशा स्वयंसेविका व कंत्राटी कामगारांना या शिफारशींचा फायदा मिळणार नसल्याने

पालघर : सातव्या वेतन आयोगाचा लाभ केवळ कायम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याने शासकीय सेवेत असूनही अंगणवाडी आशा स्वयंसेविका व कंत्राटी कामगारांना या शिफारशींचा फायदा मिळणार नसल्याने ‘‘सबका साथ सबका विकास’’ ही मोदी सरकारची घोषणा फक्त काही मूठभर कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी तर इतर कर्मचाऱ्यांचे जीवन भकास करणार असल्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या हजारो कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात पालघर जिल्हापरिषदेवर थाळीनाद मोर्चा बुधवारी नेला होता, त्यावेळी हा आरोप करण्यात आला होता.भारत सरकारने नेमलेल्या सातव्यावेतन आयोगाने शिफारशी सादर केल्यानंतर केंद्रसरकारच्या ४७ लाख कर्मचाऱ्यांना २३ टक्के पगारवाढ होणार आहे. तर केंद्र सरकारच्या ४२ लाख पेन्शनर्सच्या पेन्शनमध्ये २४ टक्के वाढ करताना अत्युच्च अधिकाऱ्यांचे पगार ९० हजारावरून थेट २.५० लाखापर्यंत वाढविण्यात आले आहेत. या शिफारशी जाहीर केल्यानंतर राज्यशासनाचा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी शासकीय व निमशासकीय सेवामधील चतुर्थ श्रेणीमधील सुमारे १.७५ लाख पदे टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रयत्न शासन करणार असल्याचे मोर्चेकरांचे म्हणणे आहे. या नोकर कपातीमुळे काही खातील तुपाशी व बहुसंख्य राहतील उपाशी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. हा वेतन आयोगाचा बोजा भरून काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासनाचा डाव आहे, असा आरोप करण्यात आला.सातव्या वेतन आयोगाचा लाभ केवळ कायम कर्मचाऱ्यांनाच मिळणार असल्याने शासकीय सेवेत असूनसुद्धा लाखो कर्मचारी व आशा स्वयंसेविका, कंत्राटी, आरोग्यसेविका, सफाई कामगार यांना त्यांचा काहीही फायदा मिळणार नाही.संघटीत कामगार क्षेत्रातील सेवाशर्ती ठरविताना असंघटीत क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने समन्यायी व सर्वसमावेशक विचार केला पाहिजे असे कर्मचारी संघाचे म्हणणे आहे. तसेच कंत्राटी व मानधनी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, त्यांना वेतन आयोगाचा लाभ द्या, अनुसूचित क्षेत्रातील गरोदर मातांना एकवेळच्या सकस आहार देण्यासाठी अमृत आहार योजनेसाठी शासनाने प्रती दिन फक्त २५ रू. खर्चाची तरतूद केली असल्याने ती दुप्पट करावी. अंगणवाडी सेविका व मदतनिसाना गरोदर माता व स्तनदा माताना शिजवून देण्यासाठी मिळणारा २५० रू. चा मोबदला वाढवून १ हजार करण्यात यावा. इ. मागणीसाठी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा एम. ए. पाटील, उपाध्यक्ष मंगला सराफ, सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता.