शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ठाण्यात येणार भगवे वादळ

By admin | Updated: February 17, 2017 01:56 IST

ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा आणि शेवटी मनसेकडूनही शिवसेनेवर जोरदार टीका

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा आणि शेवटी मनसेकडूनही शिवसेनेवर जोरदार टीका झाली आहे. त्यामुळे झालेल्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शुक्रवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, सभेच्या ठिकाणावरून गुरुवारी दिवसभर गोंधळ सुरू होता. सुरुवातीला ती मनोरुग्णालयाजवळ घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु, त्यानंतर ती सिध्देश्वर तलावाजवळील एका बाजूचा रस्त्यावर ही सभा घेण्याचे निश्चित झाले. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर सायंकाळपर्यंत जागानिश्चितीबाबत गोंधळ सुरूच होता. अखेर मासुंदा तलावा जवळील सेंट जॉन दी बापटीस्ट हायस्कुल जवळील एक रस्ता आता या सभेसाठी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला असून २५ वर्षे सत्तेत एकत्र असलेले मित्र आता एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या वेळी त्यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर चौफेर हल्ला चढवला होता. अगदी मागील २५ वर्षांत शिवसेनेने ठाण्याचा कोणताही विकास केलेला नसून शहर बकाल केल्याची टीका त्यांनी केली होती. यात त्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट मलनि:सारण प्रकल्प, सांडपाण्याची व्यवस्था ते सेनेतील गुंडगिरी आधींचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या टीकेतून अगदी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही सुटले नाहीत. त्याच वेळी ठाण्यात मागील काही महिन्यांत ज्या सुधारणा झाल्या आहेत, त्या आपण आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून केल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. त्यांच्या भाषणात टीकेचे प्रमुख लक्ष्य हे येथील स्थानिक शिवसेना आणि तिचा कारभार हेच होते. परिणामी, आता शिवसेनेकडून उद्धव ठाकरे त्याचे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुरुवातीला त्यांची सभा ही मनोरुग्णालयाजवळील मैदानात घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु, हे मैदान सभेसाठी छोटे होईल, असा कयास लावण्यात आला. त्यानंतर, ती सभा सिद्धेश्वर तलावाजवळील रस्त्यावर घेण्याचे निश्चित झाले. सांयकाळी पाच पर्यंत येथे गोंधळ सुरु होता. परंतु येथे वाहतुक कोंडी होऊ शकते असे कारण वाहतुक पोलिसांकडून देण्यात आल्या नंतर पुन्हा ही जागा हलविण्यात आली. त्यानंतर मासुंदा तलावाजवळी सेंट जॉन दि बापटीस्ट हायस्कुल जवळील एक रस्ता आता या सभेसाठी मोकळा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)