शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एसआरएकडे पाठ

By admin | Updated: July 7, 2017 06:26 IST

झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) योजनांना मंजुरी मिळवण्याकरिता ठाणेकरांना आता मुंबईला खेपा मारण्याची गरज नसली तरी

अजित मांडके/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) योजनांना मंजुरी मिळवण्याकरिता ठाणेकरांना आता मुंबईला खेपा मारण्याची गरज नसली तरी येथील झोपडपट्टी पुनर्विकासाकरिता विकासक तयार होत नसल्याने अनेक फायली प्रलंबित आहेत. केवळ एसआरएच्याच नाही तर यापूर्वी शहरात सुरु असलेल्या एसआरडी योजनेच्या फाईलदेखील विकासकांच्या थंड्या प्रतिसादामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ वाटाघाटी आणि पुनर्विकासाची योग्य हमी मिळत नसल्याने या कामांना अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. घोडबंदर येथील ठाणे महापालिकेच्या भाजी मंईडच्या दुसऱ्या मजल्यावर एसआरएचे कार्यालय सुरु झाले. पूर्वी एसआरए मंजुरीसाठी मुंबईला जावे लागत होते. त्यात सहा ते सात महिन्यांचा कालावधी जात होता. ठाण्यात हे कार्यालय सुरु झाल्यावर योजनांना एक ते दोन महिन्यांत मंजुरी मिळू शकेल, असा विश्वास एसआरएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात तसे काही झालेले नाही. पूर्वी ठाण्यात एसआरडीअंतर्गत कामे केली जात होती. त्याअंतर्गत आतापर्यंत पाच योजना मार्गी लागल्या त्यांना ओसीदेखील देण्यात आली आहे. तब्बल ५२३ झोपडीधारकांना या योजनेतून हक्काचे घर मिळाले आहे. आणखी ४ नव्या योजनांची कामे सुरु असून २२५ चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. एसआरडी बंद झाल्यानंतर एसआरए अंतर्गत काही योजना बदलण्यात आल्या असून त्यामध्ये २६ प्रकल्पांची कामे सुरु असून यामध्ये ७ हजार ७१५ झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार आहे. मात्र, मागील कित्येक वर्षापासून ८ योजनांमध्ये अद्यापही कोणतीही प्रगती झालेली नाही. यामध्ये ४ हजार ५३४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार आहे. परंतु, हे झोपडीधारक आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, झोपडपट्टीवासीयांमध्ये एकी नसणे हे योजना रखडण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच वाटाघाटी योग्य प्रकारे न होणे, योजना मंजुरीच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणे यासह इतर कारणांमुळे या प्रकरणांमध्ये प्रगती नाही. ओसीच्या प्रतीक्षेत २४ योजना अडकल्याएसआरएच्या योजनेत पात्र झालेल्या प्रस्तावांची संख्या १५ असून यामध्ये २८३३ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर मागील तीन महिन्यांत नव्याने दाखल झालेल्या प्रस्तावांची संख्या ही १० च्या आसपास आहे. यामध्ये २०३९ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यामध्ये नामदेवाडीचे दोन, वाकरवाडी, चिखलवाडी, फुलेनगर, पाचपाखाडी, पारशीवाडी, नागसेनगर, वर्तकनगर आणि शिवाईनगर या १० योजनांचा समावेश आहे. पूर्वी एसआरडी योजनेत ओसी मिळवायची झाली तर त्याचा खर्च कोट्यवधीच्या घरात जात होता. त्यामुळे विकासकांनी इमारती तर बांधल्या. परंतु, ओसीच्या प्रतीक्षेत आजही २४ योजना अडकल्या आहेत. यामध्ये २ हजार ७६५ झोपडीधारकांचे वास्तव्य आहे. परंतु, ही योजना बंद झाली आणि एसआरएअंतर्गत ओसीसाठी विशेष अभय योजना सुरु करण्यात आली. यामध्ये ओसीचा खर्च हा पहिल्या खर्चाच्या केवळ १० टक्केच होता. त्याचा लाभ आता सुमारे १२ योजनांनी घेतला आहे. या योजनांमधील रहिवाशांनी हा खर्च केला आहे. प्रत्यक्षात हा खर्च विकासकाने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता संबधींत विकासकांना नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, तरीदेखील त्यांनी हा खर्च केला नाही तर त्यांच्या विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा एसआरए योजनेचे अधिकारी नितीन पवार यांनी दिला.