शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

एसआरएकडे पाठ

By admin | Updated: July 7, 2017 06:26 IST

झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) योजनांना मंजुरी मिळवण्याकरिता ठाणेकरांना आता मुंबईला खेपा मारण्याची गरज नसली तरी

अजित मांडके/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) योजनांना मंजुरी मिळवण्याकरिता ठाणेकरांना आता मुंबईला खेपा मारण्याची गरज नसली तरी येथील झोपडपट्टी पुनर्विकासाकरिता विकासक तयार होत नसल्याने अनेक फायली प्रलंबित आहेत. केवळ एसआरएच्याच नाही तर यापूर्वी शहरात सुरु असलेल्या एसआरडी योजनेच्या फाईलदेखील विकासकांच्या थंड्या प्रतिसादामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ वाटाघाटी आणि पुनर्विकासाची योग्य हमी मिळत नसल्याने या कामांना अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. घोडबंदर येथील ठाणे महापालिकेच्या भाजी मंईडच्या दुसऱ्या मजल्यावर एसआरएचे कार्यालय सुरु झाले. पूर्वी एसआरए मंजुरीसाठी मुंबईला जावे लागत होते. त्यात सहा ते सात महिन्यांचा कालावधी जात होता. ठाण्यात हे कार्यालय सुरु झाल्यावर योजनांना एक ते दोन महिन्यांत मंजुरी मिळू शकेल, असा विश्वास एसआरएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात तसे काही झालेले नाही. पूर्वी ठाण्यात एसआरडीअंतर्गत कामे केली जात होती. त्याअंतर्गत आतापर्यंत पाच योजना मार्गी लागल्या त्यांना ओसीदेखील देण्यात आली आहे. तब्बल ५२३ झोपडीधारकांना या योजनेतून हक्काचे घर मिळाले आहे. आणखी ४ नव्या योजनांची कामे सुरु असून २२५ चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. एसआरडी बंद झाल्यानंतर एसआरए अंतर्गत काही योजना बदलण्यात आल्या असून त्यामध्ये २६ प्रकल्पांची कामे सुरु असून यामध्ये ७ हजार ७१५ झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार आहे. मात्र, मागील कित्येक वर्षापासून ८ योजनांमध्ये अद्यापही कोणतीही प्रगती झालेली नाही. यामध्ये ४ हजार ५३४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार आहे. परंतु, हे झोपडीधारक आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, झोपडपट्टीवासीयांमध्ये एकी नसणे हे योजना रखडण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच वाटाघाटी योग्य प्रकारे न होणे, योजना मंजुरीच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणे यासह इतर कारणांमुळे या प्रकरणांमध्ये प्रगती नाही. ओसीच्या प्रतीक्षेत २४ योजना अडकल्याएसआरएच्या योजनेत पात्र झालेल्या प्रस्तावांची संख्या १५ असून यामध्ये २८३३ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर मागील तीन महिन्यांत नव्याने दाखल झालेल्या प्रस्तावांची संख्या ही १० च्या आसपास आहे. यामध्ये २०३९ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यामध्ये नामदेवाडीचे दोन, वाकरवाडी, चिखलवाडी, फुलेनगर, पाचपाखाडी, पारशीवाडी, नागसेनगर, वर्तकनगर आणि शिवाईनगर या १० योजनांचा समावेश आहे. पूर्वी एसआरडी योजनेत ओसी मिळवायची झाली तर त्याचा खर्च कोट्यवधीच्या घरात जात होता. त्यामुळे विकासकांनी इमारती तर बांधल्या. परंतु, ओसीच्या प्रतीक्षेत आजही २४ योजना अडकल्या आहेत. यामध्ये २ हजार ७६५ झोपडीधारकांचे वास्तव्य आहे. परंतु, ही योजना बंद झाली आणि एसआरएअंतर्गत ओसीसाठी विशेष अभय योजना सुरु करण्यात आली. यामध्ये ओसीचा खर्च हा पहिल्या खर्चाच्या केवळ १० टक्केच होता. त्याचा लाभ आता सुमारे १२ योजनांनी घेतला आहे. या योजनांमधील रहिवाशांनी हा खर्च केला आहे. प्रत्यक्षात हा खर्च विकासकाने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता संबधींत विकासकांना नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, तरीदेखील त्यांनी हा खर्च केला नाही तर त्यांच्या विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा एसआरए योजनेचे अधिकारी नितीन पवार यांनी दिला.