शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे दहा बळी; वारसांना ५० लाखांचे अर्थसाह्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेत वाढ झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेत वाढ झाली आहे. मात्र, पावसाने आतापर्यंत तब्बल दहा जणांचा बळी घेतला आहे. यातील मृतांच्या नातेवाइकांना शासनाने जाहीर केलेले प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचे वाटप ठाणे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर केले आहे.

पावसाच्या या कालावधीत जिल्ह्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत सर्वाधिक १० जणांचा बळी गेला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात भूस्खलनाने पाच जणांचा बळी गेला आहे. तर या दरम्यान इतर दुर्घटनांत मीरा-भाईंदर मनपा परिसरातील एकाचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात भिवंडीतील एकासह उल्हासनगर आणि शहापूरमधील प्रत्येकी एक जण मयत झाला आहे. याच शहापूरमधील एकाचा इतर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. या मृतांच्या नातेवाइकांना शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या निधीचे चार लाख आणि सीएम निधीतून एक लाख असे मिळून प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना आतापर्यंत ५० लाखांचे अर्थसाह्य वाटप केल्याच्या वृत्ताला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या २४ घटना

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी जुलैमध्ये सर्वाधिक आपत्तीला तोंड द्यावे लागले. या कालावधीत जिल्ह्यातील पूरस्थितीसह भूस्खलन, रोड अपघात, पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याच्या दुर्घटनांचा समावेश आहे. या अतिवृष्टीमुळे ठाणे शहरात दोन जीवघेण्या घटनांनी नोंद आहे. याशिवाय शहापूर परिसरात सर्वाधिक २० ठिकाणांची नोंद आहे. तर भिवंडी आणि उल्हासनगर या परिसरात प्रत्येकी एक दुर्घटना आदी आतापर्यंत जिल्ह्यात २४ ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या दुर्दैवी घटना घडल्या असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. या दुर्घटनांपैकी जिल्ह्यात भूस्खलनाने पाच जणांचा जीव गेलेला आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर जीवघेण्या घटनांत दोन जण असे १० मृत्यू यंदाच्या पावसात आतापर्यंत झालेले आहेत.