शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे दहा बळी; वारसांना ५० लाखांचे अर्थसाह्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेत वाढ झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेत वाढ झाली आहे. मात्र, पावसाने आतापर्यंत तब्बल दहा जणांचा बळी घेतला आहे. यातील मृतांच्या नातेवाइकांना शासनाने जाहीर केलेले प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचे वाटप ठाणे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर केले आहे.

पावसाच्या या कालावधीत जिल्ह्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत सर्वाधिक १० जणांचा बळी गेला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात भूस्खलनाने पाच जणांचा बळी गेला आहे. तर या दरम्यान इतर दुर्घटनांत मीरा-भाईंदर मनपा परिसरातील एकाचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात भिवंडीतील एकासह उल्हासनगर आणि शहापूरमधील प्रत्येकी एक जण मयत झाला आहे. याच शहापूरमधील एकाचा इतर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. या मृतांच्या नातेवाइकांना शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या निधीचे चार लाख आणि सीएम निधीतून एक लाख असे मिळून प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना आतापर्यंत ५० लाखांचे अर्थसाह्य वाटप केल्याच्या वृत्ताला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या २४ घटना

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी जुलैमध्ये सर्वाधिक आपत्तीला तोंड द्यावे लागले. या कालावधीत जिल्ह्यातील पूरस्थितीसह भूस्खलन, रोड अपघात, पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याच्या दुर्घटनांचा समावेश आहे. या अतिवृष्टीमुळे ठाणे शहरात दोन जीवघेण्या घटनांनी नोंद आहे. याशिवाय शहापूर परिसरात सर्वाधिक २० ठिकाणांची नोंद आहे. तर भिवंडी आणि उल्हासनगर या परिसरात प्रत्येकी एक दुर्घटना आदी आतापर्यंत जिल्ह्यात २४ ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या दुर्दैवी घटना घडल्या असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. या दुर्घटनांपैकी जिल्ह्यात भूस्खलनाने पाच जणांचा जीव गेलेला आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर जीवघेण्या घटनांत दोन जण असे १० मृत्यू यंदाच्या पावसात आतापर्यंत झालेले आहेत.