शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

गळक्या वर्गात सुरू आहे शिक्षण

By admin | Updated: July 14, 2016 01:42 IST

शहरातील पद्मानगर येथील शाळा क्र मांक ५९ च्या वर्गातील पत्रे तुटल्यामुळे पाणी गळत असून पत्रा पडण्याच्या भीतीने पालकांनी महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली

भिवंडी : शहरातील पद्मानगर येथील शाळा क्र मांक ५९ च्या वर्गातील पत्रे तुटल्यामुळे पाणी गळत असून पत्रा पडण्याच्या भीतीने पालकांनी महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली. अशा गळक्या वर्गातच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील गळक्या वर्ग खोल्या, परिसरातील अस्वच्छता, नादुरु स्त स्वच्छतागृह, उघड्यावरील वीज वाहिन्या यामुळे विद्यार्थ्यांना अशा वातावरणाचा उबग आल्याने शेवटी सोमवारी तेलगू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह भिवंडी महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिका अधिकाऱ्यांनी सात दिवसात दुरु स्तीचे आश्वासन विद्यार्थी व पालकांना दिले. २०१४ मध्ये प्रभाग समिती कार्यालयाची इमारत झाल्यानंतर येथील इमारतीत महापालिकेच्यावतीने माध्यमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रात तर दुपारच्या सत्रात मराठी प्राथमिक शाळेचे वर्ग भरविले जातात. या शाळेच्या वर्ग खोल्यांवरील पत्रे तुटलेले असल्याने पावसाळ््यात वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असून अशा वर्गात बसणे विद्यार्थ्यांच्या नशिबी आले आहे. खिडक्यांची तावदाने तुटलेली असल्याने पावसाची झड खिडक्यांमधून येते. याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वर्गातील वायर लटकत आहेत. पंखा, ट्यूूब सुरु करण्यासाठी गेले असता विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागला आहे. त्यासोबतच येथील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारांमुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसोबत महापालिका मुख्यालयात आयुक्तांचा दरवाजा ठोठावला. आयुक्त कार्यालयात नसल्याने विद्यार्थी व पालकांनी कार्यालया बाहेर सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले. आयुक्त आल्यानंतर त्यांनी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करुन सात दिवसात शाळा इमारतीची दुरु स्ती करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. या शाळेच्या परिसरात अस्वच्छता असून शाळेच्या मागील बाजूस उकिरडा झाला आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. नगरसेवक मुरली मच्छा यांच्याकडे तक्र ार करुनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. जो पर्यंत शाळेतील वर्गखोल्या दुरु स्त होत नाहीत तो पर्यंत पाल्यांना शाळेत पाठविणार नसल्याचे पालक सांगतात.