शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

शहापूरच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचे ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती मिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

ठाणे : केंद्र शासनाच्या एमएचआरडी मंत्रालयाचा उपक्रम असलेली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता आठवीच्या वर्गातील आर्थिक ...

ठाणे : केंद्र शासनाच्या एमएचआरडी मंत्रालयाचा उपक्रम असलेली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता आठवीच्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) अत्यंत महत्त्वाची आहे. या शिष्यवृत्तीचा शहापूर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक एकत्र येऊन त्यांनी एनएमएमएस हे शिष्यवृत्ती मिशन म्हणून हाती घेतली आहे. यासाठी गुरुवारी बैठकही पार पडली आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ही आठवीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी परीक्षा आहे. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत झळकतात, त्यांना पुढील चार वर्षे दरवर्षी १२ हजार रुपयेप्रमाणे एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळत असते. या रकमेवर त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण होऊ शकते. अशा या शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर तालुक्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रविष्ठ करून त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करण्याचे मिशन या तालुक्यातील शिक्षकांनी हाती घेतले आहे. शहापूर तालुका मुख्याध्यापक संघ आणि शहापूर तालुका नॉलेज ॲकॅडमीने तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि आठवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे चिंतन शिबिर गुरुवारी म.ना. बरोरा विद्यालयात आयोजित केले होते. त्यात या शिक्षकांनी एकमत करून शिष्यवृत्ती मिशन हाती घेतले. वरिष्ठ शिक्षक दत्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शिबिरात शेलवली बांगर शाळेचे सहशिक्षक सुधाकर पाटील आणि डॉ. हरिश्चंद्र भोईर यांनी उपस्थित शिक्षकांना या परीक्षेविषयी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी दत्तात्रेय किरपण, विजय पडवळ, गुजरे यांच्यासह आर.के. पाटील, गणेश तळेले, चिंतामण वेखंडे, भगवान देसले, बाळू वेखंडे, रामराव खैरे आदी शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.