शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सुरणाच्या शेतीने फुलले टकीपठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

भातसानगर : ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे टाकीपठार येथील मठाधिपती बाबा फुलनाथ महाराज यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीव्यतिरिक्त ...

भातसानगर : ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे टाकीपठार येथील मठाधिपती बाबा फुलनाथ महाराज यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीव्यतिरिक्त कंदमुळे शेतीकडे वळल्यास जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल, असा केवळ संदेश न देता कृती करून दाखवली आहे. त्यामुळे शेतकरी प्रोत्साहित होऊन तालुक्यात कंदमुळांची शेती करू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा हा पहिलाच; पण फलदायी उपक्रम ठरल्याने आता पुढील वर्षी याची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बाबांनी स्वतः दोन एकर जागेत एक हजार ५०० क्विंटल सुरण या बियाण्याची लागवड केली. अनेक वर्षांपासून ही लागवड करीत असताना आपल्या शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता सुरणाची शेती केल्यास ती फलदायी ठरेल, असे बाबांच्या मनात आले आणि त्यांनी अनेक शेतकऱ्यांना त्यासाठी प्रवृत्त केले, तसेच तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करून दिले. यामुळे शहापूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन ही सुरण या कंदमुळे शेतीच्या लागवडीखाली आली आहे.

कंदमुळे ही माळरानावर भुसभुशीत जागी कुठेही येतात. केवळ मातीची भर दिली की झाले. कोणतीही मेहनत नाही. खतांची गरज नाही की, कोणत्या रोगाची भीती नाही. मुबलक पाऊस. मग केवळ उत्पादन, अशी अनेक कंदमुळे आहेत, जी जीवनावश्यक आहेत आणि आयुर्वेदिकही आहेत. जी आपणास आवश्यक आहेत. रताळी व सुरण यासारखी पिके घेतल्यास शेतकऱ्यांना नक्कीच समृद्ध करण्यास मदत हाेईल, असा सल्ला बाबांनी दिला. ही सर्वच कंदमुळे दाटीवाटीने लावली तरी चालतात. त्यापैकी सुरण हे पाव किलो, अर्धा किलोच्या वजनाचे एक फळ याप्रमाणे बियाणे असते. ते तीस ते चाळीस रुपयांना पडते. त्यापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. एकदा बियाणे उपलब्ध झाले की, मग त्याच सुरणाच्या रोपापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. हेच फळ साठ ते सत्तर रुपयांना विकले जाते, अशी अनेक रोपे तयार झाल्याने ते अधिक फायदेशीर ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना तालुक्यात बाजारपेठही उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील मनोहर वेखंडे, काळूराम दिनकर, दशरथ साबळे, वसंत कुडव, जानू विशे यांच्यासह अनेकांनी ही शेती केली आहे.

काेट

बाबांच्या सल्ल्यानुसार सुरणाची शेती माळरानावर केली आहे. मे महिन्यात ती केल्याने आता सहा ते सात किलो वजनाचे सुरण तयार झाले आहेत. रोपेही तयार झाल्याने ही शेती अधिक फलदायी ठरणार आहे.

-बाळाराम निचिते, शेतकरी

..................................

तालुक्यातील शेतकरी कंदमुळांच्या शेतीकडे वळत असल्याने ती शेती नक्कीच उपयुक्त ठरेल. सध्या शेकडो एकर माळरानावर ती केली जात आहे. ही चांगली बाब आहे.

-अमोल आगवणे, शहापूर तालुका कृषी अधिकारी