शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

सुरणाच्या शेतीने फुलले टकीपठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

भातसानगर : ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे टाकीपठार येथील मठाधिपती बाबा फुलनाथ महाराज यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीव्यतिरिक्त ...

भातसानगर : ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे टाकीपठार येथील मठाधिपती बाबा फुलनाथ महाराज यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीव्यतिरिक्त कंदमुळे शेतीकडे वळल्यास जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल, असा केवळ संदेश न देता कृती करून दाखवली आहे. त्यामुळे शेतकरी प्रोत्साहित होऊन तालुक्यात कंदमुळांची शेती करू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा हा पहिलाच; पण फलदायी उपक्रम ठरल्याने आता पुढील वर्षी याची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बाबांनी स्वतः दोन एकर जागेत एक हजार ५०० क्विंटल सुरण या बियाण्याची लागवड केली. अनेक वर्षांपासून ही लागवड करीत असताना आपल्या शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता सुरणाची शेती केल्यास ती फलदायी ठरेल, असे बाबांच्या मनात आले आणि त्यांनी अनेक शेतकऱ्यांना त्यासाठी प्रवृत्त केले, तसेच तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करून दिले. यामुळे शहापूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन ही सुरण या कंदमुळे शेतीच्या लागवडीखाली आली आहे.

कंदमुळे ही माळरानावर भुसभुशीत जागी कुठेही येतात. केवळ मातीची भर दिली की झाले. कोणतीही मेहनत नाही. खतांची गरज नाही की, कोणत्या रोगाची भीती नाही. मुबलक पाऊस. मग केवळ उत्पादन, अशी अनेक कंदमुळे आहेत, जी जीवनावश्यक आहेत आणि आयुर्वेदिकही आहेत. जी आपणास आवश्यक आहेत. रताळी व सुरण यासारखी पिके घेतल्यास शेतकऱ्यांना नक्कीच समृद्ध करण्यास मदत हाेईल, असा सल्ला बाबांनी दिला. ही सर्वच कंदमुळे दाटीवाटीने लावली तरी चालतात. त्यापैकी सुरण हे पाव किलो, अर्धा किलोच्या वजनाचे एक फळ याप्रमाणे बियाणे असते. ते तीस ते चाळीस रुपयांना पडते. त्यापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. एकदा बियाणे उपलब्ध झाले की, मग त्याच सुरणाच्या रोपापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. हेच फळ साठ ते सत्तर रुपयांना विकले जाते, अशी अनेक रोपे तयार झाल्याने ते अधिक फायदेशीर ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना तालुक्यात बाजारपेठही उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील मनोहर वेखंडे, काळूराम दिनकर, दशरथ साबळे, वसंत कुडव, जानू विशे यांच्यासह अनेकांनी ही शेती केली आहे.

काेट

बाबांच्या सल्ल्यानुसार सुरणाची शेती माळरानावर केली आहे. मे महिन्यात ती केल्याने आता सहा ते सात किलो वजनाचे सुरण तयार झाले आहेत. रोपेही तयार झाल्याने ही शेती अधिक फलदायी ठरणार आहे.

-बाळाराम निचिते, शेतकरी

..................................

तालुक्यातील शेतकरी कंदमुळांच्या शेतीकडे वळत असल्याने ती शेती नक्कीच उपयुक्त ठरेल. सध्या शेकडो एकर माळरानावर ती केली जात आहे. ही चांगली बाब आहे.

-अमोल आगवणे, शहापूर तालुका कृषी अधिकारी