शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

सुरणाच्या शेतीने फुलले टकीपठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

भातसानगर : ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे टाकीपठार येथील मठाधिपती बाबा फुलनाथ महाराज यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीव्यतिरिक्त ...

भातसानगर : ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे टाकीपठार येथील मठाधिपती बाबा फुलनाथ महाराज यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीव्यतिरिक्त कंदमुळे शेतीकडे वळल्यास जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल, असा केवळ संदेश न देता कृती करून दाखवली आहे. त्यामुळे शेतकरी प्रोत्साहित होऊन तालुक्यात कंदमुळांची शेती करू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा हा पहिलाच; पण फलदायी उपक्रम ठरल्याने आता पुढील वर्षी याची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बाबांनी स्वतः दोन एकर जागेत एक हजार ५०० क्विंटल सुरण या बियाण्याची लागवड केली. अनेक वर्षांपासून ही लागवड करीत असताना आपल्या शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता सुरणाची शेती केल्यास ती फलदायी ठरेल, असे बाबांच्या मनात आले आणि त्यांनी अनेक शेतकऱ्यांना त्यासाठी प्रवृत्त केले, तसेच तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करून दिले. यामुळे शहापूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन ही सुरण या कंदमुळे शेतीच्या लागवडीखाली आली आहे.

कंदमुळे ही माळरानावर भुसभुशीत जागी कुठेही येतात. केवळ मातीची भर दिली की झाले. कोणतीही मेहनत नाही. खतांची गरज नाही की, कोणत्या रोगाची भीती नाही. मुबलक पाऊस. मग केवळ उत्पादन, अशी अनेक कंदमुळे आहेत, जी जीवनावश्यक आहेत आणि आयुर्वेदिकही आहेत. जी आपणास आवश्यक आहेत. रताळी व सुरण यासारखी पिके घेतल्यास शेतकऱ्यांना नक्कीच समृद्ध करण्यास मदत हाेईल, असा सल्ला बाबांनी दिला. ही सर्वच कंदमुळे दाटीवाटीने लावली तरी चालतात. त्यापैकी सुरण हे पाव किलो, अर्धा किलोच्या वजनाचे एक फळ याप्रमाणे बियाणे असते. ते तीस ते चाळीस रुपयांना पडते. त्यापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. एकदा बियाणे उपलब्ध झाले की, मग त्याच सुरणाच्या रोपापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. हेच फळ साठ ते सत्तर रुपयांना विकले जाते, अशी अनेक रोपे तयार झाल्याने ते अधिक फायदेशीर ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना तालुक्यात बाजारपेठही उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील मनोहर वेखंडे, काळूराम दिनकर, दशरथ साबळे, वसंत कुडव, जानू विशे यांच्यासह अनेकांनी ही शेती केली आहे.

काेट

बाबांच्या सल्ल्यानुसार सुरणाची शेती माळरानावर केली आहे. मे महिन्यात ती केल्याने आता सहा ते सात किलो वजनाचे सुरण तयार झाले आहेत. रोपेही तयार झाल्याने ही शेती अधिक फलदायी ठरणार आहे.

-बाळाराम निचिते, शेतकरी

..................................

तालुक्यातील शेतकरी कंदमुळांच्या शेतीकडे वळत असल्याने ती शेती नक्कीच उपयुक्त ठरेल. सध्या शेकडो एकर माळरानावर ती केली जात आहे. ही चांगली बाब आहे.

-अमोल आगवणे, शहापूर तालुका कृषी अधिकारी