शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांनाे आरोग्य सांभाळा, जुलै महिन्यात वाढला तापमानाचा पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारल्याने पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. त्यात कधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारल्याने पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. त्यात कधी पाऊस तर कधी ऊन पडत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसू लागला आहे. यंदा जुलै महिन्यात तापमानाने ३७ अंशाचा पल्ला पार केला आहे. मागील दहा वर्षांत कधी नव्हे अशा पद्धतीने ठाण्यात तापमानाचा पारा चढतांना दिसून आला. त्यामुळे आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत.

पावसाने विश्रांती घेतल्याने काही दिवसांपासून ठाणे शहराचे तापमान वाढत आहे. त्यामुळे हवेतील उष्मा वाढत आहे. शहरात झालेली बेसुमार वृक्षतोड वाढलेले काँक्रीटचे जंगल यामुळे तापमान मागील काही वर्षांत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच जूनमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता; परंतु काही दिवसांपासून तो गायब झाल्याने शहरातील तापमानात पुन्हा वाढ झाली. गुरुवारी पाऊस पडला असला तरी त्याच्या आदल्या दिवशी ठाण्याचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले हाेते. परिणामी, नागरिकांना दुपारच्या वेळेस बाहेर पडणेही मुश्कील झाले होते. पावसाळ्यात पावसाचा नव्हे तर उष्म्याचा सामना करण्यासाठी नागरिक छत्रीचा वापर करीत असल्याचे दिसून आले. त्यातही तापमानाच्या सततच्या या चढ-उतारामुळे नागरिकांना आता आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ताप, थंडी, हगवण आदींसह इतर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

असा मोडला ‘जुलै’चा रेकॉर्ड

२००१ -२७ अंश

२००५ - २९

२०१० - २८

२०१५ - ३०

२०१८ - ३१

२०२० - २९

२०२१ - ३७ अंश

सरासरी तापमानात सात अंशांची वाढ

दरवर्षी जुलै महिन्यात ठाण्याचे तापमान हे साधारणपणे ३० अंश सेल्सिअसच्या आसपास दिसून येत आहे; परंतु यंदा पहिल्या आठवड्य़ात हेच तापमान ३३ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. त्यामुळे यंदा तापमानात सरासरी ६ अंश सेल्सिअसची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

एक आठवडा असा जाणार

मागील आठवडाभर तापमानात वाढ होताना दिसत होती; परंतु आता ८ जुलैपासून पुढील काही दिवस पाऊस पडणार असल्याने शहराचे तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील असे दिसून येत आहे. त्यामुळे आठवडाभर ठाणेकरांना वाढीव तापमानाचे चटके सहन करावे लागणार नसल्याचे दिसत आहे.

ठाण्यात किती दिवस तापमान असेच राहील

ठाण्यात गुरुवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुढील महिनाभर पाऊस राहणार असल्याने, तापमानात फारशी वाढ होणार नसल्याचे दिसत आहे. ८ जुलै रोजी तापमान ३२ अंश सेल्सिअस दिसून आले आहे. तर ३१ जुलैपर्यंत पाऊस असाच पडला तर ठाण्याचे तापमान हे २८ अंश सेल्सिअस एवढे राहणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

आरोग्य सांभाळा

जुलै महिन्यात कधी नव्हे एवढ्य़ा प्रमाणात वाढ होताना दिसून आली आहे. त्यात कधी पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन पडत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होताना दिसून आला आहे. त्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकणार आहे. ताप, थंडी, सर्दी, हगवण असे आजार बळावण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उघड्य़ावरचे पदार्थ खाणे टाळावे, पावसात भिजू नये. शक्यतो पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे मत डॉ. आर. टी. केंद्रे यांनी व्यक्त केले आहे.

.............

ठाणे खाडीत वाढलेले प्रदूषण, खाडीत गाळ साचल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होत आहे. हा हरित वायू असल्याने शहराचे तापमान वाढवत आहे. तसेच शहरात लाखोंच्या संख्येत वाढलेली वाहनांची संख्या त्यातून निघणारा धूर याला कारणीभूत असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून आता तरी त्याबाबत उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भविष्यात याची मोठी किंमत ठाणेकरांना चुकवावी लागणार असल्याचेही सांगितले जात आहे.