शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

ग्रामीण भागात एक लाख ८६ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

ठाणे : दोन ते तीन महिन्यांपासून ग्रामीण भागात आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ...

ठाणे : दोन ते तीन महिन्यांपासून ग्रामीण भागात आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. असे असले तरी, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा आरोग्य विभागाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून, रुग्ण सापडलेल्या ठिकाणाचा परिसर कंटेन्टमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात येत आहे. या क्षेत्रात ४१९ सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाख ८६ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. कालांतराने या आजाराने ग्रामीण भागातदेखील दस्तक दिली. ग्रामीण भागात या आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात सध्याच्या घडीला मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी या ग्रामीण भागात आतापर्यंत २० हजार ६६० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत १९ हजार ३२४ जणांनी कोरोनावर मात केली असली तरी, या आजाराने ६०५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्याच्या घडीला ७३१ जण विविध रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे काम ग्रामपंचायतनिहाय केले जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य अधिकारी आणि विविध कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी तालुक्यात कार्यरत आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी आरोग्याच्या कर्मचाऱ्यांसह, महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती अशा एकूण ४१९ सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू असून, आतापर्यंत एक लाख ८६ हजार ४६० नागरिकांचे सर्वेक्षण केल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

.....................भिवंडी तालुक्यात सर्वाधिक कंटेन्टमेंट झाेन

ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडले तो परिसर कंटेन्टमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील पाच तालुक्यांमध्ये दोन हजार ८६४ कंटेन्टमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार ६७३ कंटेन्टमेंट झोनचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून, सध्याच्या घडीला १९१ कंटेन्टमेंट झोन आहेत. यामध्ये भिवंडी तालुक्यात सर्वाधिक ६३ कंटेन्टमेंट झोन असून, त्याखालोखाल शहापूर तालुक्यात ४९, कल्याणमध्ये ४८, मुरबाडमध्ये २४, तर अंबरनाथ तालुक्यात सर्वात कमी सात ठिकाणी कंटेन्टमेंट झोन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.