शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील निर्बंध उठवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:24 IST

सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरचे सर्व निर्बंध उठवले असल्याचा दावा ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीने केला असून मानवी मनोरे रचून त्यांनी आपला आनंद साजरा केला.

ठाणे : सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरचे सर्व निर्बंध उठवले असल्याचा दावा ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीने केला असून मानवी मनोरे रचून त्यांनी आपला आनंद साजरा केला. मात्र सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील निर्बंध उठवले असल्याला दुजोरा देणारा न्यायालयाचा आदेश अजून सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरही उपलब्ध नाही.हायकोर्टाने २०१४ साली दहीहंडीतील गोविंदाच्या वयाबाबत १८ वर्षांच्या वरील मर्यादेचे बंधन घातले. तसेच दहीहंडीची उंची २० फुटापर्यंतच असावी हेही निर्बंध घातले. त्यावेळी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आणि उत्सव साजरा झाला. ही स्थगिती ५६ दिवसांची होती. त्यानंतर स्थगिती उठली आणि २०१५ व २०१६ साली या उत्सवावर हे निर्बंध कायम राहीले. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून गोविंदा पथक नाराजी व्यक्त करीत होते. गेल्या वर्षी या दोन अटींविरोधात दहीहंडी समन्वय समिती आणि जय जवान गोविंदा पथकाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर्षी तरी दहीहंडीवरचे निर्बंध उठावे यासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील गोविंदा पथकांनी गणरायाला साकडेही घातले होते. १आॅगस्ट रोजी होणाºया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे गोविंदा पथकांचे डोळे लागले होते.दरम्यानच्या काळात गोविंदा पथकांनी सराव सुरू केला होता. मात्र त्याचा वेग मंदावला होता. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील सर्व निर्बंध रद्द केले असून पुन्हा नव्याने हायकोर्टात सोमवार ७ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यात सुरक्षितेतच्या उपाययोजनांबाबत राज्य शासनाने आपले म्हणणे मांडावयाचे आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय गोविंदांना दिलासा देणारा आहे म्हणून आम्ही सर्व गोविंदा पथकांनी याचा आनंद व्यक्त केला, असे महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.