शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

अशी आहे रोहावरोहणाची ध्वजसंहिता

By admin | Updated: August 11, 2015 23:53 IST

कुठल्याही शासकीय काार्यालयात दररोज सुर्योदयाला ध्वजारोहण करण्याची आणि सुर्यास्ताच्यावेळी ध्वज उतरवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. यासाठी खास कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली

- भाग्यश्री प्रधान, ठाणेकुठल्याही शासकीय काार्यालयात दररोज सुर्योदयाला ध्वजारोहण करण्याची आणि सुर्यास्ताच्यावेळी ध्वज उतरवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. यासाठी खास कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असते. जिल्हा पोलीस मुख्यालयात व आयुक्तालयात ध्वजारोहण करतांना आणि ध्वज उतरविताना तीन कॉन्स्टेबल एक हवालदार आणि एक पोलीस उपस्थित असतात. ते राष्ट्रध्वजाला यावेळी मानवंदना देतात. तसेच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय आदी शासकीय कार्यालयातही दोन कर्मचारी हे काम करतात. ध्वज ज्या दोरीच्या आधारे फडकविला जातो ती दोरीही कॉटनचीच असते. ३० फुट लांबीच्या ध्वजस्तंभासाठी सुताची ६० फुट लांब दोरी वापरली जाते. ध्वज बांधण्यासाठी ध्वजाची शिलाई करतानाही ही दोरी ध्वजाशी जोडली जाते. ध्वज खांबावर टोकाशी असणाऱ्या लाकडी फिरत्या चकतीच्यामध्ये ही दोरी ठेवली जाते आणि त्यानंतर त्या ध्वजाच्या दोरीलाच मुख्य दोरी जोडून ध्वज चढविण्यासाठी व उतरविण्यासाठी तिचा वापर केला जातो. हा ध्वज उतरविल्या नंतर तो जमिनीला लागणार नाही अशा रितीने त्याची घडी घालून ती व्यवस्थित ठेवण्याची जबाबदीरीही सामान्य प्रशासन खात्याकडेच असते. या तिरंग्याची रचना मच्छलीपट्टणम येथे जन्मलेल्या पिंगी व्यंकैय्या यांनी केली आहे. त्यातील भगवा(केशरी) रंग हा त्यागाचे प्रतिक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतिक आहे तर हिरवा रंग समृध्दीचे प्रतिक असल्याचे मानले जाते. मधल्या पांढऱ्या पट्टयावर असलेले अशोकचिन्ह हे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असणाऱ्या सिंहमुद्रेवर असणाऱ्या अशोकचक्रासारखे आहे. जीवन गतीमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असेही हे अशोकचक्र दर्शविते. हे चक्र सागराची अथांगता, कालचक्र आणि त्याचबरोबर बदलत जाणारे जग सूचित करते, असा या राष्ट्रध्वजाचा अर्थ तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केला आहे. भारतीय राष्ट्रध्वजाला ६८ वर्षे पुर्ण झाली आहेत. या तिरंग्याचा सन्मान व्हावा यासाठी अनेक संस्थाही कार्यरत आहेत.