शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

अशी आहे रोहावरोहणाची ध्वजसंहिता

By admin | Updated: August 11, 2015 23:53 IST

कुठल्याही शासकीय काार्यालयात दररोज सुर्योदयाला ध्वजारोहण करण्याची आणि सुर्यास्ताच्यावेळी ध्वज उतरवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. यासाठी खास कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली

- भाग्यश्री प्रधान, ठाणेकुठल्याही शासकीय काार्यालयात दररोज सुर्योदयाला ध्वजारोहण करण्याची आणि सुर्यास्ताच्यावेळी ध्वज उतरवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. यासाठी खास कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असते. जिल्हा पोलीस मुख्यालयात व आयुक्तालयात ध्वजारोहण करतांना आणि ध्वज उतरविताना तीन कॉन्स्टेबल एक हवालदार आणि एक पोलीस उपस्थित असतात. ते राष्ट्रध्वजाला यावेळी मानवंदना देतात. तसेच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय आदी शासकीय कार्यालयातही दोन कर्मचारी हे काम करतात. ध्वज ज्या दोरीच्या आधारे फडकविला जातो ती दोरीही कॉटनचीच असते. ३० फुट लांबीच्या ध्वजस्तंभासाठी सुताची ६० फुट लांब दोरी वापरली जाते. ध्वज बांधण्यासाठी ध्वजाची शिलाई करतानाही ही दोरी ध्वजाशी जोडली जाते. ध्वज खांबावर टोकाशी असणाऱ्या लाकडी फिरत्या चकतीच्यामध्ये ही दोरी ठेवली जाते आणि त्यानंतर त्या ध्वजाच्या दोरीलाच मुख्य दोरी जोडून ध्वज चढविण्यासाठी व उतरविण्यासाठी तिचा वापर केला जातो. हा ध्वज उतरविल्या नंतर तो जमिनीला लागणार नाही अशा रितीने त्याची घडी घालून ती व्यवस्थित ठेवण्याची जबाबदीरीही सामान्य प्रशासन खात्याकडेच असते. या तिरंग्याची रचना मच्छलीपट्टणम येथे जन्मलेल्या पिंगी व्यंकैय्या यांनी केली आहे. त्यातील भगवा(केशरी) रंग हा त्यागाचे प्रतिक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतिक आहे तर हिरवा रंग समृध्दीचे प्रतिक असल्याचे मानले जाते. मधल्या पांढऱ्या पट्टयावर असलेले अशोकचिन्ह हे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असणाऱ्या सिंहमुद्रेवर असणाऱ्या अशोकचक्रासारखे आहे. जीवन गतीमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असेही हे अशोकचक्र दर्शविते. हे चक्र सागराची अथांगता, कालचक्र आणि त्याचबरोबर बदलत जाणारे जग सूचित करते, असा या राष्ट्रध्वजाचा अर्थ तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केला आहे. भारतीय राष्ट्रध्वजाला ६८ वर्षे पुर्ण झाली आहेत. या तिरंग्याचा सन्मान व्हावा यासाठी अनेक संस्थाही कार्यरत आहेत.