शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा नाही की परीक्षा तरी विद्यार्थी झाले पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेले वर्षभर कोरोनामुळे शाळा भरल्याच नाहीत. ऑनलाईन वर्ग झाले. परंतु शाळेत जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेले वर्षभर कोरोनामुळे शाळा भरल्याच नाहीत. ऑनलाईन वर्ग झाले. परंतु शाळेत जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता आला नाही, की प्रत्यक्ष परीक्षांचे दडपण आले नाही. मात्र, तरीही गेल्या शैक्षणिक वर्षात सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत. ठाणे जिल्हा हद्दीतील मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा परिषदेच्या १,३२८ प्राथमिक शाळांतील सुमारे ७७ हजार ८५२ विद्यार्थी पास झाले आहेत.

गेल्या वर्षी मार्च २०२०मध्ये सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कमी झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनाचे नियम पाळून काही प्रमाणात शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, कोरोनाची भीती असल्याने बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नव्हते, तर त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अगदी काही दिवसांतच पुन्हा ग्रामीण भागातील शाळा बंद करण्यात आल्या. वर्षअखेरीस विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. ऑनलाईन वर्गाद्वारे या विद्यार्थ्यांना वर्षभरात शिक्षण मिळालेले असले तरी ठाणे जिल्ह्यातील बहुतांश मुले ही वर्षभरात शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे शाळा किंवा परीक्षेविना पास होणे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या दृष्टीने तितकेसे बरोबर नाही, असे मत काही पालकांनी व्यक्त केले.

-----------------

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे

कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी यावर्षी ऑनलाईन शिक्षण घेतले. अगदी संकटाच्या काळी हा पर्याय चांगला ठरला. घरात बसले तरी शिक्षणात खंड पडत नाही, हे यातून लक्षात आले. भविष्याच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षण चांगले माध्यम ठरले. अगदी ज्युनिअर, सिनिअर केजीची मुलेही ऑनलाईन वर्गात सहज रमलीत. मुले तंत्रज्ञानाशी अगदी सुपरिचित झालीत.

----------

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे

कोरोनामुळे वर्षभर शिक्षण ऑनलाईन झाले. पण, प्रत्यक्ष व ऑनलाईन शिक्षणात खूप फरक आहे. मुलांची अभ्यासाची सवय तुटली. इतर खेळ, ॲक्टिव्हिटी या सगळ्यात मुले मागे पडली. परीक्षा नसल्याने मुलांनी अभ्यासाचा ताण घेणे कमी केले.

------------

ग्रामीण व शहरी भागातील फरक

शहरी भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षणात फारसा व्यत्यय येत नाही. मात्र, ग्रामीण भागातील मुलांची आधीच आर्थिक परिस्थिती बेताची असते. मोबाईल असतातच असे नाही. एका घरात दोन मुले असली तरी त्यांच्या वेळेनुसार मोबाईल उपलब्ध होत नाहीत. असले तरी त्यात रिचार्ज कधी असते किंवा नाही, अनेकदा इंटरनेटमध्ये अडथळे येतात. त्यांना शेतातील कष्टाची कामे करावी लागतात. त्यातून वेळ मिळाल्यावर मुले अभ्यास करतात.