शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

शाळा नाही की परीक्षा तरी विद्यार्थी झाले पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेले वर्षभर कोरोनामुळे शाळा भरल्याच नाहीत. ऑनलाईन वर्ग झाले. परंतु शाळेत जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेले वर्षभर कोरोनामुळे शाळा भरल्याच नाहीत. ऑनलाईन वर्ग झाले. परंतु शाळेत जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता आला नाही, की प्रत्यक्ष परीक्षांचे दडपण आले नाही. मात्र, तरीही गेल्या शैक्षणिक वर्षात सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत. ठाणे जिल्हा हद्दीतील मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा परिषदेच्या १,३२८ प्राथमिक शाळांतील सुमारे ७७ हजार ८५२ विद्यार्थी पास झाले आहेत.

गेल्या वर्षी मार्च २०२०मध्ये सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कमी झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनाचे नियम पाळून काही प्रमाणात शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, कोरोनाची भीती असल्याने बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नव्हते, तर त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अगदी काही दिवसांतच पुन्हा ग्रामीण भागातील शाळा बंद करण्यात आल्या. वर्षअखेरीस विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. ऑनलाईन वर्गाद्वारे या विद्यार्थ्यांना वर्षभरात शिक्षण मिळालेले असले तरी ठाणे जिल्ह्यातील बहुतांश मुले ही वर्षभरात शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे शाळा किंवा परीक्षेविना पास होणे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या दृष्टीने तितकेसे बरोबर नाही, असे मत काही पालकांनी व्यक्त केले.

-----------------

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे

कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी यावर्षी ऑनलाईन शिक्षण घेतले. अगदी संकटाच्या काळी हा पर्याय चांगला ठरला. घरात बसले तरी शिक्षणात खंड पडत नाही, हे यातून लक्षात आले. भविष्याच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षण चांगले माध्यम ठरले. अगदी ज्युनिअर, सिनिअर केजीची मुलेही ऑनलाईन वर्गात सहज रमलीत. मुले तंत्रज्ञानाशी अगदी सुपरिचित झालीत.

----------

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे

कोरोनामुळे वर्षभर शिक्षण ऑनलाईन झाले. पण, प्रत्यक्ष व ऑनलाईन शिक्षणात खूप फरक आहे. मुलांची अभ्यासाची सवय तुटली. इतर खेळ, ॲक्टिव्हिटी या सगळ्यात मुले मागे पडली. परीक्षा नसल्याने मुलांनी अभ्यासाचा ताण घेणे कमी केले.

------------

ग्रामीण व शहरी भागातील फरक

शहरी भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षणात फारसा व्यत्यय येत नाही. मात्र, ग्रामीण भागातील मुलांची आधीच आर्थिक परिस्थिती बेताची असते. मोबाईल असतातच असे नाही. एका घरात दोन मुले असली तरी त्यांच्या वेळेनुसार मोबाईल उपलब्ध होत नाहीत. असले तरी त्यात रिचार्ज कधी असते किंवा नाही, अनेकदा इंटरनेटमध्ये अडथळे येतात. त्यांना शेतातील कष्टाची कामे करावी लागतात. त्यातून वेळ मिळाल्यावर मुले अभ्यास करतात.