शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी शिक्षणापासून वंंचित?

By admin | Updated: September 13, 2016 02:08 IST

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणासाठीची भटकंती थांबविण्याच्या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून २०१४ मध्ये ८ वीचे वर्ग सुरु झाले.

भार्इंदर : पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणासाठीची भटकंती थांबविण्याच्या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून २०१४ मध्ये ८ वीचे वर्ग सुरु झाले. मात्र राज्यातील युती सरकारने ही इयत्ता प्राथमिक शिक्षणात समाविष्ट केल्यामुळे त्यापुढील माध्यमिक शिक्षणासाठी पालिकेच्या स्वतंत्र शिक्षण समितीअभावी ८वी उत्तीर्ण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी भटकंती करावी लागते. अगोदरच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या विद्यार्थ्यांना खाजगी शाळांत प्रवेश मिळविण्यासाठी धडपडावे लागते. या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी मुकावे लागू नये, यासाठी पालिका दरवर्षी खाजगी शाळांतील प्रवेशाची मोहीम राबवते. या मोफत व सवलतीच्या मोहिमेला काही खाजगी शिक्षण संस्था चालक प्रतिसाद देत नसल्याने हे विद्यार्थी माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणासाठी होत असलेली कुचंबणा संपुष्टात आणण्याकरिता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आसिफ शेख यांनी २०१२ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्तांकडे माध्यमिक शिक्षणाचे वर्ग पालिका शाळांतच सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार डिसेंबर २०१३ मधील महासभेत माध्यमिक शिक्षणाचे वर्ग सुरु करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्याला राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पालिकेने ८वीचे ७ वर्ग सुरु केले. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणाचे दरवाजे खुले झाले असतानाच विद्यमान युती सरकारने ८ वीतील शिक्षणाला प्राथमिकचा दर्जा बहाल केला. त्या पुढील ९ वी ते १० वीपर्यंतच्या शिक्षणाला माध्यमिक दर्जा देत त्यासाठी स्वतंत्र शिक्षण समिती स्थापन करण्याची अट घातली. ही समिती संपूर्णपणे पालिकेच्या अखत्यारीत असली तरी त्याला शासनाकडून कोणतेही अनुदान देण्यास सरकारने असमर्थता दर्शविली आहे. यामुळे माध्यमिक शिक्षणासह त्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा खर्च पालिकेला सोसावा लागणार आहे. परिणामी माध्यमिक शिक्षणाचे वर्ग सुरु करण्याची प्रक्रिया तूर्तास गुंडाळण्यात आली आहे. पालिकेच्या तत्कालीन महासभेत शिक्षण समितीसह विविध समित्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतरही त्याची प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. यामुळे पुढील माध्यमिक शिक्षणासाठी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची भटकंती कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)