शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकांची परवड थांबता थांबेना!

By admin | Updated: February 7, 2017 03:54 IST

कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेली बायोमेट्रीक हजेरी प्रणाली येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

कल्याण : कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेली बायोमेट्रीक हजेरी प्रणाली येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या प्रणालीत सुविधा नसल्याने कामावर हजर राहूनही बायोमेट्रीकमध्ये गैरहजर म्हणून नोंद झाली आहे. ही घटना ताजी असताना आता रात्रपाळीतील सुरक्षारक्षकांना ड्युटी संपण्यापूर्वीच पंचिंग करण्याची सक्ती केली जात आहे. बायोमेट्रीक पंचिंग मशीन काही ठिकाणी दूर असल्याने तेथे जाण्यासाठी लागणारा कालावधी पाहता या वेळेतील सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल केला जात आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी २००६ मध्ये तत्कालीन आयुक्त आर.डी. शिंदे यांनी बायोमेट्रीक हजेरी सुरू केली होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी या यंत्राला सिगारेटचे चटके, टोकदार साधनांनी ते नादुरुस्त करणे, सुटी नाणी टाकणे, असा प्रताप करून ही यंत्रे नादुरुस्त केली. त्यानंतर, आता आयुक्त ई. रवींद्रन यांनी पुन्हा बायोमेट्रीक हजेरी प्रणाली सुरू केली आहे. महापालिका मुख्यालय, सर्व प्रभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा, अग्निशमन केंद्रे येथे ही प्रणाली बसवण्यात आली आहे. बायोमेट्रीक यंत्रातील हजेरीच्या नोंदीवर मासिक वेतन निघत आहे. मात्र, ही प्रणाली सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरली आहे. सुरक्षारक्षकांना कराव्या लागत असलेल्या शिफ्ट आणि त्यानंतर कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त कामांची नोंद या प्रणालीत होत नाही. त्याचा फटका सुरक्षारक्षक व अधिकाऱ्यांना बसला आहे. ते इमानेइतबारे काम करत असताना अनेक दिवस गैरहजर असल्याची नोंद प्रणालीत झाल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. त्यानंतर, आतारात्रपाळीतील सुरक्षारक्षकांना ड्युटी संपण्यापूर्वी पंचिंगची सक्ती करण्यात आली आहे. रात्रपाळीतील सुरक्षारक्षकांची ड्युटी रात्री १० ते सकाळी ६ असते. कामावर हजर होताना रात्री १० वाजता पंचिंग केल्यानंतर सकाळी ६ वाजता ड्युटी संपण्यापूर्वी म्हणजेच पहाटे ५.५० ते ५.५५ दरम्यान बायोमेट्रीक हजेरी केंद्रावर जाऊन पंचिंग करावे, असा आदेश नुकताच काढण्यात आला. मात्र, हा आदेश त्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरत आहे.शहरांतील स्मशानभूमी, रुग्णालये आणि प्रभाग कार्यालये येथे सहसा सुरक्षा पुरवली जाते. परंतु, काही ठिकाणे ही बायोमेट्रीक हजेरी केंद्रापासून दूर आहेत. त्यामुळे ड्युटी संपण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या कामाचे ठिकाण सोडून हजेरी केंद्रावर धाव घ्यावी लागणार आहे. या काळात तेथील सुरक्षा कोणी पाहायची, असा यक्षप्रश्न संबंधितांना पडला आहे. यासंदर्भात सहायक सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात बदल करण्याच्या सूचना संगणक विभागाला केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)