शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकांची परवड थांबता थांबेना!

By admin | Updated: February 7, 2017 03:54 IST

कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेली बायोमेट्रीक हजेरी प्रणाली येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

कल्याण : कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेली बायोमेट्रीक हजेरी प्रणाली येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या प्रणालीत सुविधा नसल्याने कामावर हजर राहूनही बायोमेट्रीकमध्ये गैरहजर म्हणून नोंद झाली आहे. ही घटना ताजी असताना आता रात्रपाळीतील सुरक्षारक्षकांना ड्युटी संपण्यापूर्वीच पंचिंग करण्याची सक्ती केली जात आहे. बायोमेट्रीक पंचिंग मशीन काही ठिकाणी दूर असल्याने तेथे जाण्यासाठी लागणारा कालावधी पाहता या वेळेतील सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल केला जात आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी २००६ मध्ये तत्कालीन आयुक्त आर.डी. शिंदे यांनी बायोमेट्रीक हजेरी सुरू केली होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी या यंत्राला सिगारेटचे चटके, टोकदार साधनांनी ते नादुरुस्त करणे, सुटी नाणी टाकणे, असा प्रताप करून ही यंत्रे नादुरुस्त केली. त्यानंतर, आता आयुक्त ई. रवींद्रन यांनी पुन्हा बायोमेट्रीक हजेरी प्रणाली सुरू केली आहे. महापालिका मुख्यालय, सर्व प्रभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा, अग्निशमन केंद्रे येथे ही प्रणाली बसवण्यात आली आहे. बायोमेट्रीक यंत्रातील हजेरीच्या नोंदीवर मासिक वेतन निघत आहे. मात्र, ही प्रणाली सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरली आहे. सुरक्षारक्षकांना कराव्या लागत असलेल्या शिफ्ट आणि त्यानंतर कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त कामांची नोंद या प्रणालीत होत नाही. त्याचा फटका सुरक्षारक्षक व अधिकाऱ्यांना बसला आहे. ते इमानेइतबारे काम करत असताना अनेक दिवस गैरहजर असल्याची नोंद प्रणालीत झाल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. त्यानंतर, आतारात्रपाळीतील सुरक्षारक्षकांना ड्युटी संपण्यापूर्वी पंचिंगची सक्ती करण्यात आली आहे. रात्रपाळीतील सुरक्षारक्षकांची ड्युटी रात्री १० ते सकाळी ६ असते. कामावर हजर होताना रात्री १० वाजता पंचिंग केल्यानंतर सकाळी ६ वाजता ड्युटी संपण्यापूर्वी म्हणजेच पहाटे ५.५० ते ५.५५ दरम्यान बायोमेट्रीक हजेरी केंद्रावर जाऊन पंचिंग करावे, असा आदेश नुकताच काढण्यात आला. मात्र, हा आदेश त्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरत आहे.शहरांतील स्मशानभूमी, रुग्णालये आणि प्रभाग कार्यालये येथे सहसा सुरक्षा पुरवली जाते. परंतु, काही ठिकाणे ही बायोमेट्रीक हजेरी केंद्रापासून दूर आहेत. त्यामुळे ड्युटी संपण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या कामाचे ठिकाण सोडून हजेरी केंद्रावर धाव घ्यावी लागणार आहे. या काळात तेथील सुरक्षा कोणी पाहायची, असा यक्षप्रश्न संबंधितांना पडला आहे. यासंदर्भात सहायक सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात बदल करण्याच्या सूचना संगणक विभागाला केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)