शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

ठाण्यात रविवारपर्यंतच रेमडेसिविरचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

ठाणे : राज्यात प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने महत्त्वाच्या शहरांमध्ये नागरिकांची रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड सुरू असून ठाणे महापालिकेने ...

ठाणे : राज्यात प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने महत्त्वाच्या शहरांमध्ये नागरिकांची रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड सुरू असून ठाणे महापालिकेने मात्र आहे त्या दरात इंजेक्शन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. कारण, ठाण्यात रेमडेसिविरचा साठा संपुष्टात आला असून दोन दिवसांत तो उपलब्ध झाला नाही, तर सोमवारी रुग्णांना इंजेक्शन देण्यासाठी एकही डोस उपलब्ध नसेल, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज पंधराशे ते सतराशेच्या घरात रुग्ण सापडत असून यामुळे नागरिकांना बेडदेखील मिळेनासे झालेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबतही चिंता व्यक्त होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याशिवाय, सर्वात मोठे संकट निर्माण झाले आहे, ते रेमडेसिविरचे. त्यावर मोठ्या संख्येने नागरिक ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयांवर अवलंबून आहेत. खाजगी रुग्णालयांनी तर याबाबत हात वर केले असून नागरिकांनाच इंजेक्शन आणून देण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धडपड सुरू आहे. राजकीय मंडळींकडून प्रयत्न करून दोन ते तीन इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. मात्र, सर्वच गरजवंतांना ती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईकही हवालदिल झाले आहेत.

ठाणे महापालिकेकडील रेमडेसिविरचा साठा संपत आला असून अगदी काटकसर करून जेमतेम रविवारी संध्याकाळपर्यंत ते उपलब्ध होऊ शकते. मात्र, या दोन दिवसांत जर ते उपलब्ध झाले नाही, तर मात्र ठाण्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

"दोन दिवसांचाच रेमडेसिविरचा साठा उपलब्ध असून राज्य शासनाकडून तो उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांत तो मिळण्याची शक्यता आहे. राज्यातच टंचाई असल्याने गंभीर परिस्थिती असून आहे त्या दराने रेमडेसिविर खरेदीची तयारी ठाणे महापालिकेची आहे." - गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठा.म.पा.