शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

उल्हासनगरातील बाजारपेठ पूर्णवेळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST

उल्हासनगर : शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांच्या हाताला काम मिळण्यासाठी व व्यापाऱ्यांसाठी बाजारपेठा पूर्णवेळ सुरू करा, अशी ...

उल्हासनगर : शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांच्या हाताला काम मिळण्यासाठी व व्यापाऱ्यांसाठी बाजारपेठा पूर्णवेळ सुरू करा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. व्यापारी व नागरिकांची लॉकडाऊनमुळे दैनावस्था झाल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.

उल्हासनगर औद्याेगिक शहर आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने गेल्या दीड वर्षापासून व्यापार ठप्प पडला आहे. तर कामगारांच्या हातचे काम गेले. कोरोनाची संख्या कमी झाल्यावर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविण्यात आले. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना झाला नाही. शहरातील व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून त्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून बाजारपेठ पूर्णवेळ उघडी ठेवण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली.

शहरातील व्यापाऱ्यांना पूर्णवेळ दुकाने उघडण्याची परवानगी न दिल्यास मनसे व्यापारी आणि बाजारपेठेत काम करणाऱ्या कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करेल, असा इशारा पक्षाच्या वतीने देशमुख यांनी दिला. या वेळी पक्षाचे जिल्हा सचिव संजय घुगे, शालिग्राम सोनवणे, मुकेश सेठपलानी, अनिल गोधडे, तन्मेश देशमुख यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.