शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

दिवा ते पनवेल लोकल सेवा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST

कल्याण : दिवा ते पनवेल लोकल सेवा तसेच एमएमआर क्षेत्रातील ठाणे व रायगडमधील रेल्वेस्थानकांवर अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सर्वंकष आराखडा ...

कल्याण : दिवा ते पनवेल लोकल सेवा तसेच एमएमआर क्षेत्रातील ठाणे व रायगडमधील रेल्वेस्थानकांवर अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा, अशा मागण्या मनसे आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केल्या आहेत. पाटील यांनी दिल्लीत दानवे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

दिवा ते पनवेल लोकलची मागणी नागरिकांकडून होत आहे. दिवा ते पनवेलदरम्यान दातिवली, निळजे, तळोजा पंचानंद, नावडे रोड, कळंबोली, पनवेल अशी स्थानके असून, तेथे नागरी वस्ती वाढत आहे. सध्या दिवा ते रोहादरम्यान शटल सेवा आहे. मात्र, दररोज ठरावीक वेळेतच या गाड्या सुटतात. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे येथे जाण्यासाठी निळजे, तळोजा येथील नागरिकांना आधी कल्याण, डोंबिवली, दिवा अथवा मुंब्रा स्थानक गाठून पुढील प्रवास करावा लागतो. त्यात त्यांचा वेळ, पैसा वाया जातो. परिवहन सेवाही अपुरी पडत असल्याने त्यांची प्रचंड गैरसोयही होत आहे. सध्या नवी मुंबई विमानतळाचेही काम सुरू झालेले आहे. त्याचाही बराचसा भाग या परिसराला जोडलेला आहे. तसेच या परिसरातून केंद्र सरकारचा मल्टिमॉडेल कॉरिडॉर जाणार असून, त्याचेही काम सुरू आहे. अशा मोठमोठ्या प्रकल्पांमुळे लोकसंख्या वाढत असताना सोयीस्कर दळणवळणाच्या दृष्टिकोनातून लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी पाटील यांनी पत्रात केली आहे.

कपिल पाटील यांचीही घेतली भेट

आ. राजू पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ठाणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

------------