शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

स्थायी समिती म्हणजे सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात बोलण्याचे जणू व्यासपीठच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

ठाणे : सध्या स्थायी समिती म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणावरून सत्ताधारी किंवा प्रशासनाविरोधात बोलणारे व्यासपीठ ठरल्याचा आरोप महापौर ...

ठाणे : सध्या स्थायी समिती म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणावरून सत्ताधारी किंवा प्रशासनाविरोधात बोलणारे व्यासपीठ ठरल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी केला. लसीकरणाच्या मुद्द्यावरून स्थायी समितीत महाविकास आघाडीतील घटक असलेल्या राष्ट्रवादीसह विरोधी बाकावरील भाजपनेदेखील सत्ताधारी आणि प्रशासनावर आरोप केला होता. त्यावर महापौरांनी पलटवार करीत स्थायी समितीचेच कान टोचले आहेत.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह भाजपचे कृष्णा पाटील आणि भरत चव्हाण यांनी लस वाटपात राजकारण केले जात असल्याचा आरोप केला होता. केवळ मर्जीतील नगरसेवकांनाच लस दिली जात असून इतर नगरसेवकांना डावलले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावरून महापौरांना छेडले असता, त्यांनी स्थायी समिती सध्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणारे व्यासपीठ झाल्याचा आरोप केला आहे. लस उपलब्ध होत नाही, त्यात खासगी रुग्णालयांना लस मिळते, यात महापालिकेची काय चूक आहे? असा सवालही त्यांनी केला. महापालिकेने लस खरेदी करण्याची तयारी ठेवली होती. परंतु केंद्राने निर्णय बदलल्याने राज्यांना लस खरेदी करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्याने राज्याला आणि त्यामुळेच महापालिकेला लस उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही खासगी रुग्णालयांना २५ टक्के लस देण्याचा अधिकार केंद्राने स्वत:कडे घेतला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना लस केंद्राकडून उपलब्ध होत आहे. त्याचे खापर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर फोडणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

स्थायी समितीत चर्चा काय करावी, यालासुद्धा महत्त्व आहे. केवळ टीका करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समितीत शिवसेनेचे सदस्य असले तरीदेखील त्यात अंतर्गत राजकारणाचा विषय नाही. बऱ्याचशा मुद्द्यांवर मलासुद्धा उत्तर देता येते. परंतु आपण पक्षाशी बांधली आहोत. महापौर असलो तरी मी जिल्हा प्रमुखदेखील आहे, याचे स्मरण करून देत त्यांनी अप्रत्यक्षपणे स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यावरही टीका केली.