शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
3
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
4
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
6
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
7
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
8
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
9
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
10
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
11
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
12
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
13
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
14
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
15
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
16
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
17
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
18
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
19
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
20
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी

पावसाच्या दडीमुळे पेरण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

भातसानगर : जून महिन्यात पावसाने सुरुवातीच्या काही दिवसात नियमित हजेरी लावली खरी; मात्र नंतर दडी मारलेल्या पावसामुळे पेरण्या तर ...

भातसानगर : जून महिन्यात पावसाने सुरुवातीच्या काही दिवसात नियमित हजेरी लावली खरी; मात्र नंतर दडी मारलेल्या पावसामुळे पेरण्या तर रखडल्या आहेत.

पावसाळा सुरू झाला आणि पहिला आठवडाभर दररोज पावसाने हजेरी लावली खरी. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्यामुळे शहापूर तालुक्यातील पेरण्या आणि उखळण्या रखडल्या आहेत. उखळण्या रखडल्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस वेळेवर लागला तर शेतामध्ये पाणी साचते. शेत भरुन जाते आणि त्या साचलेल्या पाण्यामुळे शेताची उखळण चांगली होते. शेतामध्ये आलेले गवत हे त्यामध्ये विरघळून त्याचे एक प्रकारे खत तयार होते. त्या शेतामध्ये गवत अजिबात वाढत नसल्याने पुन्हा उखळणी करण्याची गरज भासत नाही.त्यामुळे वेळ वाचतो व मजुरीही; मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून कडक ऊन पडल्याने शेतात पाण्याचा थेंब नसल्याने नांगरणी करुनही पावसाअभावी गवत मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आता शेतकऱ्याला दोन ते तीन वेळा त्या शेतामध्ये नांगरणी करावी लागणार आहे. यासाठी त्याचा वेळ खर्च होणार आहे शिवाय मजुरीही वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.शिवाय शेतातील गवत मरेल किंवा नाही याची चिंता त्याला लागली आहे.

तालुक्यामध्ये आजही अनेक शेतकरी हे बैलजोडी व लाकडी नांगराचा उपयोग करत आहेत.भातपिकासाठी आवश्यक असलेला चिखल ट्रॅक्टरने होत नसून नांगराने तो व्यवस्थित होतो व त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन लावलेल्या भाताच्या वाढीला त्याचा फायदा होतो.त्यामुळे बैल व नांगर यांच्या मदतीने केलेली नांगरणी फायदेशीर असल्याचे शेतकरी बाळू भेरे यांनी सांगितले.