शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

पावसाच्या दडीमुळे पेरण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

भातसानगर : जून महिन्यात पावसाने सुरुवातीच्या काही दिवसात नियमित हजेरी लावली खरी; मात्र नंतर दडी मारलेल्या पावसामुळे पेरण्या तर ...

भातसानगर : जून महिन्यात पावसाने सुरुवातीच्या काही दिवसात नियमित हजेरी लावली खरी; मात्र नंतर दडी मारलेल्या पावसामुळे पेरण्या तर रखडल्या आहेत.

पावसाळा सुरू झाला आणि पहिला आठवडाभर दररोज पावसाने हजेरी लावली खरी. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्यामुळे शहापूर तालुक्यातील पेरण्या आणि उखळण्या रखडल्या आहेत. उखळण्या रखडल्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस वेळेवर लागला तर शेतामध्ये पाणी साचते. शेत भरुन जाते आणि त्या साचलेल्या पाण्यामुळे शेताची उखळण चांगली होते. शेतामध्ये आलेले गवत हे त्यामध्ये विरघळून त्याचे एक प्रकारे खत तयार होते. त्या शेतामध्ये गवत अजिबात वाढत नसल्याने पुन्हा उखळणी करण्याची गरज भासत नाही.त्यामुळे वेळ वाचतो व मजुरीही; मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून कडक ऊन पडल्याने शेतात पाण्याचा थेंब नसल्याने नांगरणी करुनही पावसाअभावी गवत मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आता शेतकऱ्याला दोन ते तीन वेळा त्या शेतामध्ये नांगरणी करावी लागणार आहे. यासाठी त्याचा वेळ खर्च होणार आहे शिवाय मजुरीही वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.शिवाय शेतातील गवत मरेल किंवा नाही याची चिंता त्याला लागली आहे.

तालुक्यामध्ये आजही अनेक शेतकरी हे बैलजोडी व लाकडी नांगराचा उपयोग करत आहेत.भातपिकासाठी आवश्यक असलेला चिखल ट्रॅक्टरने होत नसून नांगराने तो व्यवस्थित होतो व त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन लावलेल्या भाताच्या वाढीला त्याचा फायदा होतो.त्यामुळे बैल व नांगर यांच्या मदतीने केलेली नांगरणी फायदेशीर असल्याचे शेतकरी बाळू भेरे यांनी सांगितले.