शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दडीमुळे पेरण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

भातसानगर : जून महिन्यात पावसाने सुरुवातीच्या काही दिवसात नियमित हजेरी लावली खरी; मात्र नंतर दडी मारलेल्या पावसामुळे पेरण्या तर ...

भातसानगर : जून महिन्यात पावसाने सुरुवातीच्या काही दिवसात नियमित हजेरी लावली खरी; मात्र नंतर दडी मारलेल्या पावसामुळे पेरण्या तर रखडल्या आहेत.

पावसाळा सुरू झाला आणि पहिला आठवडाभर दररोज पावसाने हजेरी लावली खरी. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्यामुळे शहापूर तालुक्यातील पेरण्या आणि उखळण्या रखडल्या आहेत. उखळण्या रखडल्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस वेळेवर लागला तर शेतामध्ये पाणी साचते. शेत भरुन जाते आणि त्या साचलेल्या पाण्यामुळे शेताची उखळण चांगली होते. शेतामध्ये आलेले गवत हे त्यामध्ये विरघळून त्याचे एक प्रकारे खत तयार होते. त्या शेतामध्ये गवत अजिबात वाढत नसल्याने पुन्हा उखळणी करण्याची गरज भासत नाही.त्यामुळे वेळ वाचतो व मजुरीही; मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून कडक ऊन पडल्याने शेतात पाण्याचा थेंब नसल्याने नांगरणी करुनही पावसाअभावी गवत मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आता शेतकऱ्याला दोन ते तीन वेळा त्या शेतामध्ये नांगरणी करावी लागणार आहे. यासाठी त्याचा वेळ खर्च होणार आहे शिवाय मजुरीही वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.शिवाय शेतातील गवत मरेल किंवा नाही याची चिंता त्याला लागली आहे.

तालुक्यामध्ये आजही अनेक शेतकरी हे बैलजोडी व लाकडी नांगराचा उपयोग करत आहेत.भातपिकासाठी आवश्यक असलेला चिखल ट्रॅक्टरने होत नसून नांगराने तो व्यवस्थित होतो व त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन लावलेल्या भाताच्या वाढीला त्याचा फायदा होतो.त्यामुळे बैल व नांगर यांच्या मदतीने केलेली नांगरणी फायदेशीर असल्याचे शेतकरी बाळू भेरे यांनी सांगितले.