शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

अनुदानुित भात बियाण्यांची मुदतीच्या ५० दिवस आधीच निसवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्हा परिषदेने वाटप केलेले भात बियाणे ११० ते १२० दिवसांत परिपक्व होणे अपेक्षित होते, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्हा परिषदेने वाटप केलेले भात बियाणे ११० ते १२० दिवसांत परिपक्व होणे अपेक्षित होते, पण ते आधीच म्हणजे ५० ते ६० दिवसांत मुदतीआधीच त्याची निसवणी होऊन ते परिपक्व होत असल्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ८२५ एकरांवर त्याची लागवड झाली असल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ठाणे जि.प.चे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली.

यंदाच्या पावसाळ्यात आधीच जुलैमध्ये शेतीचे मोठ्याप्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भात पीक वाहून जाण्यासह शेतीची बांधबंदिस्ती फुटली. यात शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या अतिवृष्टीच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला असून त्याची भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यात आता या बोगस बियाण्यांची भर पडली आहे. जिल्हा परिषदेने वाटप केलेल्या या ५० टक्के अनुदानाच्या भात बियाणांची लागवड निष्फळ जात असल्याचा मनस्ताप शेतकऱ्यांकडून ऐकवला जात आहे. कर्ज काढून घेतलेल्या शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाले आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सेस फंडातून ५० टक्के अनुदानाने जिल्ह्यातील शहापूर, अंबरनाथ आदी तालुक्यात महाबीज महामंडळाचे भात बियाणे वाटप केले आहे. शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कोईम्बतूर-५१ या भात बियाण्याची जवळपास ८२५ एकर क्षेत्रांवर लागवड केली आहे. या बियाण्याचे वाण ११० ते १२९ दिवसांत परिपक्व होणे अपेक्षित आहे. मात्र, ते ५० ते ६०दिवसांच्या मुदतीआधीच निसवणी व परिपक्व होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तक्रारीस अनुसरून चौकशी केली असता निमसे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसानभरपाईसाठी पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

--------