शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानुित भात बियाण्यांची मुदतीच्या ५० दिवस आधीच निसवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्हा परिषदेने वाटप केलेले भात बियाणे ११० ते १२० दिवसांत परिपक्व होणे अपेक्षित होते, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्हा परिषदेने वाटप केलेले भात बियाणे ११० ते १२० दिवसांत परिपक्व होणे अपेक्षित होते, पण ते आधीच म्हणजे ५० ते ६० दिवसांत मुदतीआधीच त्याची निसवणी होऊन ते परिपक्व होत असल्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ८२५ एकरांवर त्याची लागवड झाली असल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ठाणे जि.प.चे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली.

यंदाच्या पावसाळ्यात आधीच जुलैमध्ये शेतीचे मोठ्याप्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भात पीक वाहून जाण्यासह शेतीची बांधबंदिस्ती फुटली. यात शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या अतिवृष्टीच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला असून त्याची भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यात आता या बोगस बियाण्यांची भर पडली आहे. जिल्हा परिषदेने वाटप केलेल्या या ५० टक्के अनुदानाच्या भात बियाणांची लागवड निष्फळ जात असल्याचा मनस्ताप शेतकऱ्यांकडून ऐकवला जात आहे. कर्ज काढून घेतलेल्या शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाले आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सेस फंडातून ५० टक्के अनुदानाने जिल्ह्यातील शहापूर, अंबरनाथ आदी तालुक्यात महाबीज महामंडळाचे भात बियाणे वाटप केले आहे. शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कोईम्बतूर-५१ या भात बियाण्याची जवळपास ८२५ एकर क्षेत्रांवर लागवड केली आहे. या बियाण्याचे वाण ११० ते १२९ दिवसांत परिपक्व होणे अपेक्षित आहे. मात्र, ते ५० ते ६०दिवसांच्या मुदतीआधीच निसवणी व परिपक्व होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तक्रारीस अनुसरून चौकशी केली असता निमसे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसानभरपाईसाठी पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

--------