शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

लोकसाहित्यातील ‘सोनू’ वामनदादांचीच, नाही दुसऱ्या कोणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू साऱ्या चाळीतल्या बायका, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ’ हे गीत महाकवी वामनदादा कर्डक यांचे आहे. मध्यंतरी ते गीत व्हायरल झाले, तेव्हा ते आरजे मलिष्काच्या नावावर खपविले गेले. अस्सल लोकसाहित्यातील ‘सोनू’ ही वामनदादांचीच आहे, ती दुसऱ्या कोणाची नाही. मात्र सध्या साहित्यात जी उचलेगिरी चालली आहे, ती थांबली पाहिजे, असे खडे बोल उचलेगिरी करणाऱ्यांना ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत कवी यांनी सुनावले.

नाशिकच्या एका लहानशा गावात जन्माला आलेले वामनदादा हे साहित्यातील ‘दादा’ होते. लोकगीतांचे ते एक विद्यापीठ होते. त्यांचे शिक्षण अवघे इयत्ता तिसरीपर्यंत झाले होते, तरी त्यांच्या लेखणीची धार मोठी होती. त्यांनी लोकमनावर अधिराज्य केले. वामनदादा यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात कल्याणनगरीतून १४ ऑगस्टपासून होत आहे. लोककवी वामनदादा यांनी लिहिलेली अनेक गाणी, लोकगीते, लावण्या, भीम आणि बुद्धगीते आजही सगळ्य़ांच्या तोंडी आहेत. सोनू ही वामनदादांची आहे. मात्र उचलेगिरी करून लोककवींच्या रचना स्वत:च्या नावावर खपविल्या जात असल्याचा आरोप कवी मोरे यांनी केला आहे. शिक्षित माणसांनी तरी लबाडी बंद करावी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तीन वर्षांपूर्वी ‘नवनीत’चे गाईड आले होते. त्यात वामनदादांची कविता अनंत काणेकर यांच्या नावावर खपविली होती. त्यातून वामनदादांचे नाव गायब करण्यात आले होते.

वामनदादांनी चित्रपटात गाणी लिहिली. ‘सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला’ हे गाणे खूप गाजले. पतिपत्नीतील भांडण अत्यंत समर्पकपणे त्यांनी या गीतातून अधोरेखित केले. त्याचबरोबर ‘वारा हलता झुलता वारा, सांगे सख्याला तारा, टाका पलंग परस दारा’ ही लावणी रोशन सातारकर यांनी गायली. ती अजरामर झाली आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायिलेली ‘ह्यो ह्यो पाहुणा सखूचा मेव्हुणा माझ्याकडं बघून हसतोय गं,’ ही लावणीदेखील अत्यंत लोकप्रिय झाली.

वामनदादा हे चित्रपटाच्या व्यावसायिक धंद्यात रमले नाहीत. त्यांनी ती वाट सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला वाहून घेतले. ‘जरी संकटांची काळरात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती,’ मी वादळ वारा, पंचशिलाची ऋणीच राहील धरती सदा, मी बुद्धाची पायघडी, सांगू किती मी दादा - एकतेने येथे नांदा, चंदनाची छाया, नागनदीच्या काठी, एक जीवन विधाता, गौतम दूर रहने से गौतम न मिलेगा, त्याचबरोबर बिर्ला बाटा तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील, ही गीतसंपदा कालातीत आहे. त्याचे कारण व्यवस्था आणि समाज अद्याप बदललेला नाही. त्यामुळे ही कविता आजच्या काळातही कष्टकऱ्यांना तितकीच जवळची वाटते. कोरोना संकटकाळात ती आणखी आपलीशी वाटते. ती वेदना आणि दु:ख मांडणारी आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करणारी ठरते. वामनदादांनी कोणत्या पुरस्काराची अपेक्षा केली नाही. पुरस्काराने माणूस सीमित होतो. ते स्वत: एक विद्यापीठ होते. त्यांच्या काव्याचा जागर शताब्दी वर्षानिमित्त होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

....................