शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसाहित्यातील ‘सोनू’ वामनदादांचीच, नाही दुसऱ्या कोणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू साऱ्या चाळीतल्या बायका, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ’ हे गीत महाकवी वामनदादा कर्डक यांचे आहे. मध्यंतरी ते गीत व्हायरल झाले, तेव्हा ते आरजे मलिष्काच्या नावावर खपविले गेले. अस्सल लोकसाहित्यातील ‘सोनू’ ही वामनदादांचीच आहे, ती दुसऱ्या कोणाची नाही. मात्र सध्या साहित्यात जी उचलेगिरी चालली आहे, ती थांबली पाहिजे, असे खडे बोल उचलेगिरी करणाऱ्यांना ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत कवी यांनी सुनावले.

नाशिकच्या एका लहानशा गावात जन्माला आलेले वामनदादा हे साहित्यातील ‘दादा’ होते. लोकगीतांचे ते एक विद्यापीठ होते. त्यांचे शिक्षण अवघे इयत्ता तिसरीपर्यंत झाले होते, तरी त्यांच्या लेखणीची धार मोठी होती. त्यांनी लोकमनावर अधिराज्य केले. वामनदादा यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात कल्याणनगरीतून १४ ऑगस्टपासून होत आहे. लोककवी वामनदादा यांनी लिहिलेली अनेक गाणी, लोकगीते, लावण्या, भीम आणि बुद्धगीते आजही सगळ्य़ांच्या तोंडी आहेत. सोनू ही वामनदादांची आहे. मात्र उचलेगिरी करून लोककवींच्या रचना स्वत:च्या नावावर खपविल्या जात असल्याचा आरोप कवी मोरे यांनी केला आहे. शिक्षित माणसांनी तरी लबाडी बंद करावी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तीन वर्षांपूर्वी ‘नवनीत’चे गाईड आले होते. त्यात वामनदादांची कविता अनंत काणेकर यांच्या नावावर खपविली होती. त्यातून वामनदादांचे नाव गायब करण्यात आले होते.

वामनदादांनी चित्रपटात गाणी लिहिली. ‘सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला’ हे गाणे खूप गाजले. पतिपत्नीतील भांडण अत्यंत समर्पकपणे त्यांनी या गीतातून अधोरेखित केले. त्याचबरोबर ‘वारा हलता झुलता वारा, सांगे सख्याला तारा, टाका पलंग परस दारा’ ही लावणी रोशन सातारकर यांनी गायली. ती अजरामर झाली आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायिलेली ‘ह्यो ह्यो पाहुणा सखूचा मेव्हुणा माझ्याकडं बघून हसतोय गं,’ ही लावणीदेखील अत्यंत लोकप्रिय झाली.

वामनदादा हे चित्रपटाच्या व्यावसायिक धंद्यात रमले नाहीत. त्यांनी ती वाट सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला वाहून घेतले. ‘जरी संकटांची काळरात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती,’ मी वादळ वारा, पंचशिलाची ऋणीच राहील धरती सदा, मी बुद्धाची पायघडी, सांगू किती मी दादा - एकतेने येथे नांदा, चंदनाची छाया, नागनदीच्या काठी, एक जीवन विधाता, गौतम दूर रहने से गौतम न मिलेगा, त्याचबरोबर बिर्ला बाटा तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील, ही गीतसंपदा कालातीत आहे. त्याचे कारण व्यवस्था आणि समाज अद्याप बदललेला नाही. त्यामुळे ही कविता आजच्या काळातही कष्टकऱ्यांना तितकीच जवळची वाटते. कोरोना संकटकाळात ती आणखी आपलीशी वाटते. ती वेदना आणि दु:ख मांडणारी आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करणारी ठरते. वामनदादांनी कोणत्या पुरस्काराची अपेक्षा केली नाही. पुरस्काराने माणूस सीमित होतो. ते स्वत: एक विद्यापीठ होते. त्यांच्या काव्याचा जागर शताब्दी वर्षानिमित्त होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

....................