शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लोकसाहित्यातील ‘सोनू’ वामनदादांचीच, नाही दुसऱ्या कोणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू साऱ्या चाळीतल्या बायका, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ’ हे गीत महाकवी वामनदादा कर्डक यांचे आहे. मध्यंतरी ते गीत व्हायरल झाले, तेव्हा ते आरजे मलिष्काच्या नावावर खपविले गेले. अस्सल लोकसाहित्यातील ‘सोनू’ ही वामनदादांचीच आहे, ती दुसऱ्या कोणाची नाही. मात्र सध्या साहित्यात जी उचलेगिरी चालली आहे, ती थांबली पाहिजे, असे खडे बोल उचलेगिरी करणाऱ्यांना ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत कवी यांनी सुनावले.

नाशिकच्या एका लहानशा गावात जन्माला आलेले वामनदादा हे साहित्यातील ‘दादा’ होते. लोकगीतांचे ते एक विद्यापीठ होते. त्यांचे शिक्षण अवघे इयत्ता तिसरीपर्यंत झाले होते, तरी त्यांच्या लेखणीची धार मोठी होती. त्यांनी लोकमनावर अधिराज्य केले. वामनदादा यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात कल्याणनगरीतून १४ ऑगस्टपासून होत आहे. लोककवी वामनदादा यांनी लिहिलेली अनेक गाणी, लोकगीते, लावण्या, भीम आणि बुद्धगीते आजही सगळ्य़ांच्या तोंडी आहेत. सोनू ही वामनदादांची आहे. मात्र उचलेगिरी करून लोककवींच्या रचना स्वत:च्या नावावर खपविल्या जात असल्याचा आरोप कवी मोरे यांनी केला आहे. शिक्षित माणसांनी तरी लबाडी बंद करावी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तीन वर्षांपूर्वी ‘नवनीत’चे गाईड आले होते. त्यात वामनदादांची कविता अनंत काणेकर यांच्या नावावर खपविली होती. त्यातून वामनदादांचे नाव गायब करण्यात आले होते.

वामनदादांनी चित्रपटात गाणी लिहिली. ‘सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला’ हे गाणे खूप गाजले. पतिपत्नीतील भांडण अत्यंत समर्पकपणे त्यांनी या गीतातून अधोरेखित केले. त्याचबरोबर ‘वारा हलता झुलता वारा, सांगे सख्याला तारा, टाका पलंग परस दारा’ ही लावणी रोशन सातारकर यांनी गायली. ती अजरामर झाली आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायिलेली ‘ह्यो ह्यो पाहुणा सखूचा मेव्हुणा माझ्याकडं बघून हसतोय गं,’ ही लावणीदेखील अत्यंत लोकप्रिय झाली.

वामनदादा हे चित्रपटाच्या व्यावसायिक धंद्यात रमले नाहीत. त्यांनी ती वाट सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला वाहून घेतले. ‘जरी संकटांची काळरात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती,’ मी वादळ वारा, पंचशिलाची ऋणीच राहील धरती सदा, मी बुद्धाची पायघडी, सांगू किती मी दादा - एकतेने येथे नांदा, चंदनाची छाया, नागनदीच्या काठी, एक जीवन विधाता, गौतम दूर रहने से गौतम न मिलेगा, त्याचबरोबर बिर्ला बाटा तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील, ही गीतसंपदा कालातीत आहे. त्याचे कारण व्यवस्था आणि समाज अद्याप बदललेला नाही. त्यामुळे ही कविता आजच्या काळातही कष्टकऱ्यांना तितकीच जवळची वाटते. कोरोना संकटकाळात ती आणखी आपलीशी वाटते. ती वेदना आणि दु:ख मांडणारी आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करणारी ठरते. वामनदादांनी कोणत्या पुरस्काराची अपेक्षा केली नाही. पुरस्काराने माणूस सीमित होतो. ते स्वत: एक विद्यापीठ होते. त्यांच्या काव्याचा जागर शताब्दी वर्षानिमित्त होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

....................