शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोकसाहित्यातील ‘सोनू’ वामनदादांचीच, नाही दुसऱ्या कोणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ‘सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, नायलॉनची साडी घे गोलगोल, लाजू साऱ्या चाळीतल्या बायका, थांब होऊ दे सकाळ, थांब होऊ दे सकाळ’ हे गीत महाकवी वामनदादा कर्डक यांचे आहे. मध्यंतरी ते गीत व्हायरल झाले, तेव्हा ते आरजे मलिष्काच्या नावावर खपविले गेले. अस्सल लोकसाहित्यातील ‘सोनू’ ही वामनदादांचीच आहे, ती दुसऱ्या कोणाची नाही. मात्र सध्या साहित्यात जी उचलेगिरी चालली आहे, ती थांबली पाहिजे, असे खडे बोल उचलेगिरी करणाऱ्यांना ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत कवी यांनी सुनावले.

नाशिकच्या एका लहानशा गावात जन्माला आलेले वामनदादा हे साहित्यातील ‘दादा’ होते. लोकगीतांचे ते एक विद्यापीठ होते. त्यांचे शिक्षण अवघे इयत्ता तिसरीपर्यंत झाले होते, तरी त्यांच्या लेखणीची धार मोठी होती. त्यांनी लोकमनावर अधिराज्य केले. वामनदादा यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात कल्याणनगरीतून १४ ऑगस्टपासून होत आहे. लोककवी वामनदादा यांनी लिहिलेली अनेक गाणी, लोकगीते, लावण्या, भीम आणि बुद्धगीते आजही सगळ्य़ांच्या तोंडी आहेत. सोनू ही वामनदादांची आहे. मात्र उचलेगिरी करून लोककवींच्या रचना स्वत:च्या नावावर खपविल्या जात असल्याचा आरोप कवी मोरे यांनी केला आहे. शिक्षित माणसांनी तरी लबाडी बंद करावी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तीन वर्षांपूर्वी ‘नवनीत’चे गाईड आले होते. त्यात वामनदादांची कविता अनंत काणेकर यांच्या नावावर खपविली होती. त्यातून वामनदादांचे नाव गायब करण्यात आले होते.

वामनदादांनी चित्रपटात गाणी लिहिली. ‘सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला’ हे गाणे खूप गाजले. पतिपत्नीतील भांडण अत्यंत समर्पकपणे त्यांनी या गीतातून अधोरेखित केले. त्याचबरोबर ‘वारा हलता झुलता वारा, सांगे सख्याला तारा, टाका पलंग परस दारा’ ही लावणी रोशन सातारकर यांनी गायली. ती अजरामर झाली आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायिलेली ‘ह्यो ह्यो पाहुणा सखूचा मेव्हुणा माझ्याकडं बघून हसतोय गं,’ ही लावणीदेखील अत्यंत लोकप्रिय झाली.

वामनदादा हे चित्रपटाच्या व्यावसायिक धंद्यात रमले नाहीत. त्यांनी ती वाट सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला वाहून घेतले. ‘जरी संकटांची काळरात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती,’ मी वादळ वारा, पंचशिलाची ऋणीच राहील धरती सदा, मी बुद्धाची पायघडी, सांगू किती मी दादा - एकतेने येथे नांदा, चंदनाची छाया, नागनदीच्या काठी, एक जीवन विधाता, गौतम दूर रहने से गौतम न मिलेगा, त्याचबरोबर बिर्ला बाटा तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील, ही गीतसंपदा कालातीत आहे. त्याचे कारण व्यवस्था आणि समाज अद्याप बदललेला नाही. त्यामुळे ही कविता आजच्या काळातही कष्टकऱ्यांना तितकीच जवळची वाटते. कोरोना संकटकाळात ती आणखी आपलीशी वाटते. ती वेदना आणि दु:ख मांडणारी आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करणारी ठरते. वामनदादांनी कोणत्या पुरस्काराची अपेक्षा केली नाही. पुरस्काराने माणूस सीमित होतो. ते स्वत: एक विद्यापीठ होते. त्यांच्या काव्याचा जागर शताब्दी वर्षानिमित्त होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

....................