शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

उल्हासनगरातील धोकादायक इमारतींचा प्र्श्न निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

उल्हासनगर : शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तो त्वरित निकाली काढा. तसेच धोकादायक इमारतीचे भिजत घोंगडे ठेवून ...

उल्हासनगर : शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तो त्वरित निकाली काढा. तसेच धोकादायक इमारतीचे भिजत घोंगडे ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, असे निवेदन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. पालिका आयुक्तांनाही या निवेदनाची प्रत देत यातून मार्ग काढण्याचे सुचविले आहे.

गेल्या महिन्यात शहरातील मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचे बळी गेले. तसेच यापूर्वी स्लॅब कोसळून अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्याने, धोकादायक व जुन्या इमारतींमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्लॅब कोसळून बळी जाण्याची दुसरी घटना घडण्यापूर्वी राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. इमारत पडल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यापेक्षा धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी जिवंतपणी काय करता येईल याचा विचार करा, असे पाटील यांनी सुचविले आहे.

शहरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी वाढीव चटईक्षेत्र द्या, १० वर्षे जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी हजारो इमारतीला महापालिकेने नोटिसा दिल्या आहेत. त्या नोटिसा मागे घेऊन, नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने सरसकट स्ट्रक्टरल ऑडिट करा, इमारत पुनर्बांधणीसाठी एकाच ठिकाणाहून परवानगी द्या, स्ट्रक्चरल ऑडिटसाठी अधिकृत वास्तूविशारदाची यादी व संपर्क क्रमांक महापालिकने जाहीर करणे, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी निर्वासित छावणी उभारणे, बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करणे, आदी मागण्या केल्या आहेत.