शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींचे निराकरण आता मोबाइलद्वारे

By admin | Updated: February 17, 2017 02:04 IST

महावितरणसंदर्भात असलेल्या अनेक अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी महावितरणने मोबाइल आणि ई-मेल माध्यम निवडले

ठाणे : महावितरणसंदर्भात असलेल्या अनेक अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी महावितरणने मोबाइल आणि ई-मेल माध्यम निवडले आहे. महावितरणने सुरू केलेल्या मोबाइल एसएमएस सेवेला भांडुप परिमंडळामधून चांगला प्रतिसाद मिळाला असून या सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी संपूर्ण भांडुप परिमंडळामधून तब्बल ११ लाख ७० हजार ग्राहकांनी आपल्या मोबाइल नंबरची नोंदणी महावितरणकडे केली आहे. यामध्ये ठाणे सर्कलमध्ये ५ लाख ८७ हजार, तर वाशी सर्कलमध्ये तेवढ्याच ग्राहकांनी नोंदणी केली आहे. महावितरणने एसएमएसवर वीजबिल व वीजपुरवठ्यासंदर्भात माहिती देण्याची सुविधा सुरू केली आहे. सहा महिन्यांपूर्वी या सुविधेला कमी प्रतिसाद मिळाला असला तरी आता बहुसंख्य ग्राहकांनी तिचा लाभ घेण्यास सुरु वात केली आहे. यासाठी ग्राहक केंद्रासोबतच अ‍ॅप, संकेतस्थळ व ‘एसएमएस’द्वारे मोबाइल नंबरनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांचा मोबाइल क्र मांक जर महावितरणकडे नोंद असेल, तर ग्राहकांना त्यांचे वीजबिल एसएमएसद्वारे मिळू शकणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस काही अडचणींमुळे वीजबिल मिळाले नाही किंवा मिळालेले वीजबिल हरवले, तर या एसएमएसचा फायदा ग्राहकांना होणार आहे. तसेच बिल भरण्याची अंतिम तारीख संपत आली असल्यास त्याचीही सूचना एसएमएसद्वारे मिळणार आहे. काही वेळा देखभाल दुरु स्तीसाठी जर महावितरणकडून वीजपुरवठा बंद करण्यात येणार असेल, तर त्याची पूर्वसूचना ग्राहकांना देण्याची सुविधा या एसएमएस सुविधेमध्ये असल्याने याचा चांगलाच फायदा आता वीजग्राहकांना झाला आहे. महावितरणच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी या सुविधेला सुरु वात केली होती. या सहा महिन्यांत ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. भांडुप परिमंडळामध्ये १७ लाख ३३ हजार ग्राहक असून यापैकी तब्बल ६७.५० टक्के ग्राहकांनी आपल्या मोबाइलची नोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)