शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेवकाचे उपोषण

By admin | Updated: April 1, 2017 23:33 IST

केडीएमसी हद्दीत बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत आहे. अनेक मालमत्तांकडून करआकारणी होत नाही. त्यामुळे महापालिकेस वर्षाला ७० कोटींचा तोटा होत आहे

डोंबिवली : केडीएमसी हद्दीत बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत आहे. अनेक मालमत्तांकडून करआकारणी होत नाही. त्यामुळे महापालिकेस वर्षाला ७० कोटींचा तोटा होत आहे. या मुद्द्यांवर २०१० पासून शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे केडीएमसीकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, प्रशासन त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ शनिवारपासून त्यांनी पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर ७२ तासांचे उपोषण सुरू केले आहे.महापालिका हद्दीत २० हजारांपेक्षा जास्त बेकायदा नळजोडण्या आहेत. त्यावर, महापालिका कारवाई करीत नाही. त्यामुळे महापालिकेला त्याचा फटका बसत आहे. बेकायदा जोडण्या शोधून त्या नियमित करण्याचा ठराव मंजूर करण्याची म्हात्रे यांची २०१० पासूनची मागणी आहे. तसेच अनेक मालमत्तांकडून करआकारणीच होत नाही. त्यामुळे महापालिकेस आर्थिक नुकसान होत आहे.महापालिकेने बेकायदा जोडण्या व मालमत्ता शोधण्यासाठी एका एजन्सीला सर्वेक्षणाचे काम दिले आहे. मात्र, ही एजन्सी प्रभाग अधिकाऱ्यांकडूनच मालमत्तांची यादी घेऊन त्याच मालमत्तांना नोटिसा बजावत आहे. नवीन मालमत्तांचा शोध घेतलेला नाही. एजन्सीला कंत्राट देऊन वर्षे उलटली, तरी अजूनही त्यांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे किती मालमत्ता व चोऱ्या करणाऱ्या नळजोडण्या शोधल्या, याचा आकडाच समोर आलेला नाही.मागील सहा वर्षांत महापालिकेचे जवळपास ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. चोरीच्या नळजोडण्या व मालमत्ता करआकारणीसोबत महापालिकेत ई-निविदेमध्ये भ्रष्टाचार होत आहे. तो रोखावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. यापूर्वी म्हात्रे यांनी प्रभाग कार्यालयात, केडीएमसी मुख्यालयासमोर याच मागणीसाठी उपोषण केले आहे. प्रशासन त्यांना केवळ आश्वासनेच देत आहे. ठोस कारवाई होत नसल्याने म्हात्रे यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून अनेक वेळा पक्षश्रेष्ठी व पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मेसेज केले आहेत.महापालिका प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या उपोषणाची प्रशासन काय दखल घेते, तसेच काय कारवाई करते, याकडे म्हात्रे समर्थकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, म्हात्रे यांना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा आजार आहे. तरीही, भर उन्हात ते जनहितासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. (प्रतिनिधी)