शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेवकाचे उपोषण

By admin | Updated: April 1, 2017 23:33 IST

केडीएमसी हद्दीत बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत आहे. अनेक मालमत्तांकडून करआकारणी होत नाही. त्यामुळे महापालिकेस वर्षाला ७० कोटींचा तोटा होत आहे

डोंबिवली : केडीएमसी हद्दीत बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत आहे. अनेक मालमत्तांकडून करआकारणी होत नाही. त्यामुळे महापालिकेस वर्षाला ७० कोटींचा तोटा होत आहे. या मुद्द्यांवर २०१० पासून शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे केडीएमसीकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, प्रशासन त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ शनिवारपासून त्यांनी पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर ७२ तासांचे उपोषण सुरू केले आहे.महापालिका हद्दीत २० हजारांपेक्षा जास्त बेकायदा नळजोडण्या आहेत. त्यावर, महापालिका कारवाई करीत नाही. त्यामुळे महापालिकेला त्याचा फटका बसत आहे. बेकायदा जोडण्या शोधून त्या नियमित करण्याचा ठराव मंजूर करण्याची म्हात्रे यांची २०१० पासूनची मागणी आहे. तसेच अनेक मालमत्तांकडून करआकारणीच होत नाही. त्यामुळे महापालिकेस आर्थिक नुकसान होत आहे.महापालिकेने बेकायदा जोडण्या व मालमत्ता शोधण्यासाठी एका एजन्सीला सर्वेक्षणाचे काम दिले आहे. मात्र, ही एजन्सी प्रभाग अधिकाऱ्यांकडूनच मालमत्तांची यादी घेऊन त्याच मालमत्तांना नोटिसा बजावत आहे. नवीन मालमत्तांचा शोध घेतलेला नाही. एजन्सीला कंत्राट देऊन वर्षे उलटली, तरी अजूनही त्यांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे किती मालमत्ता व चोऱ्या करणाऱ्या नळजोडण्या शोधल्या, याचा आकडाच समोर आलेला नाही.मागील सहा वर्षांत महापालिकेचे जवळपास ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. चोरीच्या नळजोडण्या व मालमत्ता करआकारणीसोबत महापालिकेत ई-निविदेमध्ये भ्रष्टाचार होत आहे. तो रोखावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. यापूर्वी म्हात्रे यांनी प्रभाग कार्यालयात, केडीएमसी मुख्यालयासमोर याच मागणीसाठी उपोषण केले आहे. प्रशासन त्यांना केवळ आश्वासनेच देत आहे. ठोस कारवाई होत नसल्याने म्हात्रे यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून अनेक वेळा पक्षश्रेष्ठी व पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मेसेज केले आहेत.महापालिका प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या उपोषणाची प्रशासन काय दखल घेते, तसेच काय कारवाई करते, याकडे म्हात्रे समर्थकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, म्हात्रे यांना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा आजार आहे. तरीही, भर उन्हात ते जनहितासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. (प्रतिनिधी)